शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Drought In Marathwada : तब्बल पाच किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागते चोरून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:14 IST

पाणीबाणी : पाण्याची चोरी करायची आणि पाणी गावात आणल्यानंतर त्या टाकीला कुलूप लावून सुरक्षा करायची,

- गजानन वाखरकर, टाकळखोपा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

तब्बल पाच कि. मी. पायी अंतर चालून पाण्याची चोरी करायची आणि पाणी गावात आणल्यानंतर त्या टाकीला कुलूप लावून सुरक्षा करायची, हे वास्तव चित्र औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळखोपा या गावात पाहायला मिळते.  येथील महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यातच जात आहे. 

युती शासनाच्या काळात मंत्री असताना डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी २० गाव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. तिचे पाणी या गावाला मिळत नव्हते. तत्कालीन आ.जयप्रकाश दांडेगाकर यांनी २०१४ मध्ये या योजनेला हे गाव जोडले. नंतर पाणी फक्त दोन महिने मिळाले. त्यानंतर ही योजना बंद पडली. ती आजतागायत सुरूच झाली नाही. टाकळखोपा गावाची लोकसंख्या तीनशे आहे. या गावात नळ योजना नाही. 

दोन विहिरी असून, त्या आता कोरड्या पडल्या आहेत. एक विंधन विहीर आटली आहे. पावसाळ्यापुरता या तिन्ही स्रोतांचा आधार होतो. येथे एप्रिल-मेमध्ये टँकर सुरू होते. एरवी लोक शंकर जाधव आणि पुरभाजी जाधव या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी आणतात. हे स्रोत गावापासून तीन ते चार कि. मी. अंतरावर आहेत. तेथेही २० दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे ते दोघेही आता पाणी देण्यास नकार देत आहेत. स्वत:ला व जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक ठेवत आहेत. 

गावकऱ्यांना सध्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. तरीही हा शेतकरी कुठे बाहेर गेला तर तेथून गावकरी चोरून पाणी भरतात. नाईलाजाने हे करावे लागते, असे गावकऱ्यांनी सांगितले.  शाळेतही पाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना घरूनच पाणी न्यावे लागते. माणसांचीच ही अवस्था असल्याने गुरांचे हाल तर विचारायलाच नको. ग्रामसेवकही गावात येत नाही. आमदार, खासदार, जि. प., पं. स. सदस्यांचे तोंड निवडणुकीच्या काळातच दिसते. हे कोणीच फिरकत नसल्याने समस्या कायम आहेत. 

सरपंच काय म्हणतात?टाकळखोपा हे ग्रुप ग्रामपंचायत शिरला अंतर्गत येते. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने काहीच उपाययोजना केली नाही. गतवर्षी विहीर अधिग्रहण केली होती. त्याचे पैसे दिले नसल्याने यंदा अधिग्रहण करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा ठराव दिला आहे.    - रमेश राऊत, सरपंच  

ग्रामस्थांचे हे आहे म्हणे :  

- आमच्या गावामध्ये पाणी नाही. आम्हाला हंडाभर पाण्यासाठी एक एक दिवस घालावा लागतो. पाणी आणायला गेल्यावर तेथेही आम्हाला दिवसभर बसावे लागते.  - गिरजाबाई जाधव

- आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा पाणी स्रोत नाही. शासनाची पाण्याची योजना आमच्या गावात अद्यापपर्यंत आलीच नाही. त्यामुळे आम्हाला पाच किलोमीटरवरून शेतामधून पाणी आणावे लागते. आमचे सर्व पुरुष माणसे कामाला जातात. त्यामुळे आम्हाला व म्हाताऱ्या माणसालाच पाणी आणावे लागते. - चतुराबाई  टेकाळे   

- अद्यापपर्यंत शासनाची पाण्याची योजना आलेलीच नाही. त्यामुळे पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकावे लागते. एका हंड्यासाठी आमचा दिवस दिवस जातो. - लक्ष्मीबाई जाधव

- आमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे कोणी पोरगी देत नाही. पाणी आणण्यात आणि घरातील कामातच महिलांचा दिवस निघून जातो. - रुक्मिणी जाधव

- आमच्या गावामध्ये दोन विहिरी असल्या तरीही त्या आटल्या आहेत. एक हातपंप आहे. मात्र त्याला पाणी नाही. एका शेतकऱ्याच्या शेतामधून पाणी आणावे लागते. तोही आणू देत नसल्याने चक्क पाण्याची चोरी करण्याचे दुर्दैव ओढवले आहे. - चंद्रभागा जाधव 

जिल्ह्यातील प्रकल्पस्थितीमोठे प्रकल्प : 02 / 69 / 4.25%मध्यम प्रकल्प : 00 / -- / --लघु प्रकल्प : 26 / 19.204 / 36%

टॅग्स :droughtदुष्काळHingoliहिंगोलीWaterपाणी