शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

Drought In Marathwada : तब्बल पाच किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागते चोरून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:14 IST

पाणीबाणी : पाण्याची चोरी करायची आणि पाणी गावात आणल्यानंतर त्या टाकीला कुलूप लावून सुरक्षा करायची,

- गजानन वाखरकर, टाकळखोपा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

तब्बल पाच कि. मी. पायी अंतर चालून पाण्याची चोरी करायची आणि पाणी गावात आणल्यानंतर त्या टाकीला कुलूप लावून सुरक्षा करायची, हे वास्तव चित्र औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळखोपा या गावात पाहायला मिळते.  येथील महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यातच जात आहे. 

युती शासनाच्या काळात मंत्री असताना डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी २० गाव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. तिचे पाणी या गावाला मिळत नव्हते. तत्कालीन आ.जयप्रकाश दांडेगाकर यांनी २०१४ मध्ये या योजनेला हे गाव जोडले. नंतर पाणी फक्त दोन महिने मिळाले. त्यानंतर ही योजना बंद पडली. ती आजतागायत सुरूच झाली नाही. टाकळखोपा गावाची लोकसंख्या तीनशे आहे. या गावात नळ योजना नाही. 

दोन विहिरी असून, त्या आता कोरड्या पडल्या आहेत. एक विंधन विहीर आटली आहे. पावसाळ्यापुरता या तिन्ही स्रोतांचा आधार होतो. येथे एप्रिल-मेमध्ये टँकर सुरू होते. एरवी लोक शंकर जाधव आणि पुरभाजी जाधव या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी आणतात. हे स्रोत गावापासून तीन ते चार कि. मी. अंतरावर आहेत. तेथेही २० दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे ते दोघेही आता पाणी देण्यास नकार देत आहेत. स्वत:ला व जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक ठेवत आहेत. 

गावकऱ्यांना सध्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. तरीही हा शेतकरी कुठे बाहेर गेला तर तेथून गावकरी चोरून पाणी भरतात. नाईलाजाने हे करावे लागते, असे गावकऱ्यांनी सांगितले.  शाळेतही पाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना घरूनच पाणी न्यावे लागते. माणसांचीच ही अवस्था असल्याने गुरांचे हाल तर विचारायलाच नको. ग्रामसेवकही गावात येत नाही. आमदार, खासदार, जि. प., पं. स. सदस्यांचे तोंड निवडणुकीच्या काळातच दिसते. हे कोणीच फिरकत नसल्याने समस्या कायम आहेत. 

सरपंच काय म्हणतात?टाकळखोपा हे ग्रुप ग्रामपंचायत शिरला अंतर्गत येते. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने काहीच उपाययोजना केली नाही. गतवर्षी विहीर अधिग्रहण केली होती. त्याचे पैसे दिले नसल्याने यंदा अधिग्रहण करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा ठराव दिला आहे.    - रमेश राऊत, सरपंच  

ग्रामस्थांचे हे आहे म्हणे :  

- आमच्या गावामध्ये पाणी नाही. आम्हाला हंडाभर पाण्यासाठी एक एक दिवस घालावा लागतो. पाणी आणायला गेल्यावर तेथेही आम्हाला दिवसभर बसावे लागते.  - गिरजाबाई जाधव

- आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा पाणी स्रोत नाही. शासनाची पाण्याची योजना आमच्या गावात अद्यापपर्यंत आलीच नाही. त्यामुळे आम्हाला पाच किलोमीटरवरून शेतामधून पाणी आणावे लागते. आमचे सर्व पुरुष माणसे कामाला जातात. त्यामुळे आम्हाला व म्हाताऱ्या माणसालाच पाणी आणावे लागते. - चतुराबाई  टेकाळे   

- अद्यापपर्यंत शासनाची पाण्याची योजना आलेलीच नाही. त्यामुळे पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकावे लागते. एका हंड्यासाठी आमचा दिवस दिवस जातो. - लक्ष्मीबाई जाधव

- आमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे कोणी पोरगी देत नाही. पाणी आणण्यात आणि घरातील कामातच महिलांचा दिवस निघून जातो. - रुक्मिणी जाधव

- आमच्या गावामध्ये दोन विहिरी असल्या तरीही त्या आटल्या आहेत. एक हातपंप आहे. मात्र त्याला पाणी नाही. एका शेतकऱ्याच्या शेतामधून पाणी आणावे लागते. तोही आणू देत नसल्याने चक्क पाण्याची चोरी करण्याचे दुर्दैव ओढवले आहे. - चंद्रभागा जाधव 

जिल्ह्यातील प्रकल्पस्थितीमोठे प्रकल्प : 02 / 69 / 4.25%मध्यम प्रकल्प : 00 / -- / --लघु प्रकल्प : 26 / 19.204 / 36%

टॅग्स :droughtदुष्काळHingoliहिंगोलीWaterपाणी