शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : तब्बल पाच किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावे लागते चोरून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:14 IST

पाणीबाणी : पाण्याची चोरी करायची आणि पाणी गावात आणल्यानंतर त्या टाकीला कुलूप लावून सुरक्षा करायची,

- गजानन वाखरकर, टाकळखोपा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

तब्बल पाच कि. मी. पायी अंतर चालून पाण्याची चोरी करायची आणि पाणी गावात आणल्यानंतर त्या टाकीला कुलूप लावून सुरक्षा करायची, हे वास्तव चित्र औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळखोपा या गावात पाहायला मिळते.  येथील महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यातच जात आहे. 

युती शासनाच्या काळात मंत्री असताना डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी २० गाव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. तिचे पाणी या गावाला मिळत नव्हते. तत्कालीन आ.जयप्रकाश दांडेगाकर यांनी २०१४ मध्ये या योजनेला हे गाव जोडले. नंतर पाणी फक्त दोन महिने मिळाले. त्यानंतर ही योजना बंद पडली. ती आजतागायत सुरूच झाली नाही. टाकळखोपा गावाची लोकसंख्या तीनशे आहे. या गावात नळ योजना नाही. 

दोन विहिरी असून, त्या आता कोरड्या पडल्या आहेत. एक विंधन विहीर आटली आहे. पावसाळ्यापुरता या तिन्ही स्रोतांचा आधार होतो. येथे एप्रिल-मेमध्ये टँकर सुरू होते. एरवी लोक शंकर जाधव आणि पुरभाजी जाधव या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी आणतात. हे स्रोत गावापासून तीन ते चार कि. मी. अंतरावर आहेत. तेथेही २० दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे ते दोघेही आता पाणी देण्यास नकार देत आहेत. स्वत:ला व जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक ठेवत आहेत. 

गावकऱ्यांना सध्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. तरीही हा शेतकरी कुठे बाहेर गेला तर तेथून गावकरी चोरून पाणी भरतात. नाईलाजाने हे करावे लागते, असे गावकऱ्यांनी सांगितले.  शाळेतही पाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना घरूनच पाणी न्यावे लागते. माणसांचीच ही अवस्था असल्याने गुरांचे हाल तर विचारायलाच नको. ग्रामसेवकही गावात येत नाही. आमदार, खासदार, जि. प., पं. स. सदस्यांचे तोंड निवडणुकीच्या काळातच दिसते. हे कोणीच फिरकत नसल्याने समस्या कायम आहेत. 

सरपंच काय म्हणतात?टाकळखोपा हे ग्रुप ग्रामपंचायत शिरला अंतर्गत येते. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने काहीच उपाययोजना केली नाही. गतवर्षी विहीर अधिग्रहण केली होती. त्याचे पैसे दिले नसल्याने यंदा अधिग्रहण करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा ठराव दिला आहे.    - रमेश राऊत, सरपंच  

ग्रामस्थांचे हे आहे म्हणे :  

- आमच्या गावामध्ये पाणी नाही. आम्हाला हंडाभर पाण्यासाठी एक एक दिवस घालावा लागतो. पाणी आणायला गेल्यावर तेथेही आम्हाला दिवसभर बसावे लागते.  - गिरजाबाई जाधव

- आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा पाणी स्रोत नाही. शासनाची पाण्याची योजना आमच्या गावात अद्यापपर्यंत आलीच नाही. त्यामुळे आम्हाला पाच किलोमीटरवरून शेतामधून पाणी आणावे लागते. आमचे सर्व पुरुष माणसे कामाला जातात. त्यामुळे आम्हाला व म्हाताऱ्या माणसालाच पाणी आणावे लागते. - चतुराबाई  टेकाळे   

- अद्यापपर्यंत शासनाची पाण्याची योजना आलेलीच नाही. त्यामुळे पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकावे लागते. एका हंड्यासाठी आमचा दिवस दिवस जातो. - लक्ष्मीबाई जाधव

- आमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे कोणी पोरगी देत नाही. पाणी आणण्यात आणि घरातील कामातच महिलांचा दिवस निघून जातो. - रुक्मिणी जाधव

- आमच्या गावामध्ये दोन विहिरी असल्या तरीही त्या आटल्या आहेत. एक हातपंप आहे. मात्र त्याला पाणी नाही. एका शेतकऱ्याच्या शेतामधून पाणी आणावे लागते. तोही आणू देत नसल्याने चक्क पाण्याची चोरी करण्याचे दुर्दैव ओढवले आहे. - चंद्रभागा जाधव 

जिल्ह्यातील प्रकल्पस्थितीमोठे प्रकल्प : 02 / 69 / 4.25%मध्यम प्रकल्प : 00 / -- / --लघु प्रकल्प : 26 / 19.204 / 36%

टॅग्स :droughtदुष्काळHingoliहिंगोलीWaterपाणी