शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

हिंगोलीत सहापैकी चार वर्षे गेली दुष्काळात; यंदा पुन्हा दुष्काळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:24 IST

दुबार पेरणीची शेतकऱ्यांना भीती

ठळक मुद्दे २0१३ मध्ये शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ पाहिला. २0१८ मध्येही ७५ टक्के पर्जन्य झाले. २0१९ च्या जानेवारीपासूनच टंचाईचा सामना

- विजय पाटील 

हिंगोली : जिल्ह्यात सहा वर्षांत केवळ दोन वर्षे जिल्ह्याच्या सरासरीशी बरोबरी करणारे पर्जन्य झाले. इतर चार वर्षांत शेतकऱ्यांना कमी-अधिक प्रमाणात दुष्काळाचाच सामना करावा लागला. वसमत तालुक्यात तर सातत्याने कमी पर्जन्य होत आहे.

हिंगोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८९२ मि.मी. आहे. २0१३ मध्ये शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ पाहिला. तब्बल १३६ टक्के पर्जन्यमान झाले होते. हेच ते वर्षे आहे जेव्हा सर्वच तालुक्यात पावसाच्या सरासरीचे शतक ओलांडले. त्यानंतर गारपीट व इतर बाबींमुळे पुन्हा रबी व उन्हाळी हंगामातही फटका बसला.  २0१४ हे वर्षे निवडणुकीचे होते. मात्र या वर्षात पावसाचा पत्ता नव्हता.  या वर्षी अवघे ५२.२२ टक्के पर्जन्यमान राहिले. २0१५ ला शेतकऱ्यांना चांगल्या पर्जन्याची अपेक्षा होती. मात्र सलग दुसऱ्या वर्षी पर्जन्याचा टक्का घसरलेलाच राहिला. या वर्षीही ६४.२५ टक्के पर्जन्य झाले. त्यामुळे खरिपासह रबीलाही फटका बसला होता.

२0१६ मध्ये मात्र पावसाने समतोल राखल्याने जिल्ह्यात १0४ टक्के पर्जन्यमान झाले. मात्र यावर्षी हिंगोली ११८ तर औंढा नागनाथ १२२ टक्के अशा दोन तालुक्यांनी सरासरी ओलांडली होती. यावर्षी शेतीमालाला भाव नसल्याने हमीभावाचा प्रश्न पुढे आला. शेतकरी संपासारख्या बाबी घडल्या. अनेक हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागत टोकन, आॅनलाईन नोंदणी व चुकारे न मिळाल्याने हे वर्ष गाजले. त्यानंतर २0१७ मध्ये पुन्हा पावसाची सरासरी ७३.१८ टक्क्यांवर थांबली. यावर्षी केवळ औंढा तालुक्यात ९७ टक्के सरासरी होती. २0१८ मध्येही ७५ टक्के पर्जन्य झाले. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांना खरिपावरच समाधान मानावे लागले. नंतर २0१९ च्या जानेवारीपासूनच टंचाईचा सामना करण्याची वेळ आली. कधी नव्हे, एवढी गावे टँकरग्रस्त झाली. 

दुष्काळ घेऊन उगवलेले वर्षदुष्काळ घेऊनच २0१९ चा पावसाळा आला. आधीच पावसाने जूनच्या शेवटच्या टप्प्यात हजेरी लावली. त्यानंतर सरी बरसल्या. मात्र एकही दमदार पाऊस नाही. पेरण्यांचे प्रमाण ७0 टक्क्यांच्या पुढे गेले नाही. १६ जुलै उजाडला तरीही पर्जन्यमान १४.९१ टक्केच आहे. जे की ४0 टक्क्यांच्याही पुढे राहणे अपेक्षित आहे. गतवर्षी आॅगस्टनंतर एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी पावसाअभावी दुष्काळाकडे वाटचाल सुरू आहे. आणखी दोन-चार दिवस पाऊस झाला नाही तर अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळHingoliहिंगोलीWaterपाणीRainपाऊस