शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

हिंगोलीत सहापैकी चार वर्षे गेली दुष्काळात; यंदा पुन्हा दुष्काळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:24 IST

दुबार पेरणीची शेतकऱ्यांना भीती

ठळक मुद्दे २0१३ मध्ये शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ पाहिला. २0१८ मध्येही ७५ टक्के पर्जन्य झाले. २0१९ च्या जानेवारीपासूनच टंचाईचा सामना

- विजय पाटील 

हिंगोली : जिल्ह्यात सहा वर्षांत केवळ दोन वर्षे जिल्ह्याच्या सरासरीशी बरोबरी करणारे पर्जन्य झाले. इतर चार वर्षांत शेतकऱ्यांना कमी-अधिक प्रमाणात दुष्काळाचाच सामना करावा लागला. वसमत तालुक्यात तर सातत्याने कमी पर्जन्य होत आहे.

हिंगोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८९२ मि.मी. आहे. २0१३ मध्ये शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ पाहिला. तब्बल १३६ टक्के पर्जन्यमान झाले होते. हेच ते वर्षे आहे जेव्हा सर्वच तालुक्यात पावसाच्या सरासरीचे शतक ओलांडले. त्यानंतर गारपीट व इतर बाबींमुळे पुन्हा रबी व उन्हाळी हंगामातही फटका बसला.  २0१४ हे वर्षे निवडणुकीचे होते. मात्र या वर्षात पावसाचा पत्ता नव्हता.  या वर्षी अवघे ५२.२२ टक्के पर्जन्यमान राहिले. २0१५ ला शेतकऱ्यांना चांगल्या पर्जन्याची अपेक्षा होती. मात्र सलग दुसऱ्या वर्षी पर्जन्याचा टक्का घसरलेलाच राहिला. या वर्षीही ६४.२५ टक्के पर्जन्य झाले. त्यामुळे खरिपासह रबीलाही फटका बसला होता.

२0१६ मध्ये मात्र पावसाने समतोल राखल्याने जिल्ह्यात १0४ टक्के पर्जन्यमान झाले. मात्र यावर्षी हिंगोली ११८ तर औंढा नागनाथ १२२ टक्के अशा दोन तालुक्यांनी सरासरी ओलांडली होती. यावर्षी शेतीमालाला भाव नसल्याने हमीभावाचा प्रश्न पुढे आला. शेतकरी संपासारख्या बाबी घडल्या. अनेक हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागत टोकन, आॅनलाईन नोंदणी व चुकारे न मिळाल्याने हे वर्ष गाजले. त्यानंतर २0१७ मध्ये पुन्हा पावसाची सरासरी ७३.१८ टक्क्यांवर थांबली. यावर्षी केवळ औंढा तालुक्यात ९७ टक्के सरासरी होती. २0१८ मध्येही ७५ टक्के पर्जन्य झाले. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांना खरिपावरच समाधान मानावे लागले. नंतर २0१९ च्या जानेवारीपासूनच टंचाईचा सामना करण्याची वेळ आली. कधी नव्हे, एवढी गावे टँकरग्रस्त झाली. 

दुष्काळ घेऊन उगवलेले वर्षदुष्काळ घेऊनच २0१९ चा पावसाळा आला. आधीच पावसाने जूनच्या शेवटच्या टप्प्यात हजेरी लावली. त्यानंतर सरी बरसल्या. मात्र एकही दमदार पाऊस नाही. पेरण्यांचे प्रमाण ७0 टक्क्यांच्या पुढे गेले नाही. १६ जुलै उजाडला तरीही पर्जन्यमान १४.९१ टक्केच आहे. जे की ४0 टक्क्यांच्याही पुढे राहणे अपेक्षित आहे. गतवर्षी आॅगस्टनंतर एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी पावसाअभावी दुष्काळाकडे वाटचाल सुरू आहे. आणखी दोन-चार दिवस पाऊस झाला नाही तर अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळHingoliहिंगोलीWaterपाणीRainपाऊस