शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

निरीक्षणगृहाविना बालकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:57 PM

जिल्ह्यात मुलांचे निरीक्षणगृह नसल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकांना परभणी येथे घेऊन जावे लागत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र मुला-मुलींचे निरीक्षणगृह असणे आवश्यक आहे. मात्र निरीक्षणगृहाची व्यवस्था नसल्याने या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मुलांचे निरीक्षणगृह नसल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकांना परभणी येथे घेऊन जावे लागत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र मुला-मुलींचे निरीक्षणगृह असणे आवश्यक आहे. मात्र निरीक्षणगृहाची व्यवस्था नसल्याने या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे.हरविलेले मुले-मुली तसेच अनाथ व विधीसंघर्षग्रस्त बालकांना काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून निरीक्षणगृहात ठेवले जाते. हिंगोली येथे मुलींचे निरीक्षणगृह असले तरी, मागील अनेक वर्षांपासून मुलांचे निरीक्षणगृहच नाही. त्यामुळे हिंगोली येथील विधीसंघर्षग्रस्त बालकांना परभणी येथील निरीक्षणगृहात ठेवले जात आहे. निरीक्षणगृह नसल्याने नाईलाजाने परभणीपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. तर परभणी येथे मुलींचे निरीक्षणगृह नसल्याने तेथील मुलींना हिंगोली येथे आणावे लागत आहे. या कारणामुळे मात्र मुलींची गैरसोय होत आहे. त्यामुळे हिंगोली व परभणी जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र निरीक्षणगृहाची आवश्यकता आहे.बालगुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी, प्रत्येक्षात मात्र दिवसेंदिवस बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. परंतु कायद्याने बालगुन्हेगार हा शब्दच हद्दपार केला आहे. एखाद्या परिस्थितीत बालकांनी गुन्ह्याचे कृत्य केले असेल तर या बालकांना कायद्याच्या प्रकियेतून जाव लागते. यासाठी कायदा त्याला विधिसंघर्षग्रस्त मूल असे संबोधतो. या मुलांना निरीक्षणगृहात ठेऊन संरक्षण व सुधारण्याची संधी दिली जाते.समूपदेशन व मार्गदर्शन-निरीक्षणगृहातील बालकांचे समूपदेशन केले जाते. त्यांना शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मार्गदर्शन केले जाते. तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांची काळजी व त्यांना संरक्षणात ठेवण्यात येते. विशेष म्हणजे विधीसंघर्षतग्रस्त बालकांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातात. अशी माहिती परभणी येथील संदीप बेंडसुरे यांनी दिली. तसेच हिंगोली व परभणी येथे मुला-मुलींचे स्वतंत्र निरीक्षणगृह असल्यास बालकांची गैरसोय टळेल.हिंगोली येथे मुलींचे निरीक्षण गृह आहे. बालकांची काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुलींना येथे ठेवण्यात आले आहे. समितीकडे १६ मुलींची जबाबदारी आहे. यामध्ये १ विधीसंघर्षग्रस्त मुलीचा समावेश असून सदर मुलीस पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.मागील तीन महिन्यात बाल न्यायमंडळाकडील प्राप्त झालेल्या २८ प्रकरणापैंकी २१ प्रकरणे निकाली लागली आहेत. तर ७ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.हिंगोली व परभणी येथील निरीक्षणगृहातील मुला-मुलींच्या आकडेवारीवरून मागील तीन वर्षांत विधीसंघर्षग्रस्त मुलींचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealth Tipsहेल्थ टिप्स