शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाडा विभागातील १९ जिल्ह्यांमध्ये राबविणार दुग्ध विकास प्रकल्प

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 19, 2024 19:45 IST

राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दुग्ध व्यावसाय एकवटलेला असून, त्या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय केला जात नाही.

हिंगोली : विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षांच्या कालवधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दोन वर्षानंतर प्रकल्पाच्या फलश्रुतीबाबत आढावा घेऊन सन २०२६-२७ मध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय १६ सप्टेंबर रोजी शासनाने घेतला आहे.

राज्याच्या विकासाला गती देत असताना आधीच अस्तित्वात असलेला असमतोल कमी करण्याचा विचार केला पाहिजे, असे नमूद करून ज्या जिल्ह्याचा राज्याच्या ‘सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये’ कमी सहभाग आहे, अशा जिल्ह्यांमध्ये सर्वसमावेशक, शाश्वत आणि संतुलित विकासात्मक वाढ होईल, याची खात्री करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे.

सन २०२२-२३ मधील आकडेवाडीनुसार दुग्धोत्पादनात देशपातळीवर महाराष्ट्राचा ६वा क्रमांक लागतो. देशात दरडोई दूध सेवनाचे प्रमाण ४५९ ग्रॅम प्रतिव्यक्ती दिन असे असून, पंजाब राज्यामध्ये हेच प्रमाण १२८३ ग्रॅम प्रतिव्यक्ती प्रतिदिन आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३२९ ग्रॅम प्रतिव्यक्ती प्रतिदिन इतके आहे. त्यामुळे राज्यात दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यास वाव आहे. राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दुग्ध व्यावसाय एकवटलेला असून, त्या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय केला जात नाही. दुग्ध व्यावसाय हा शेतीपूरक व्यावसाय असून, त्याद्वारे पशुपालक, शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. विदर्भ व मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे सदर भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. यासाठी तेथील शेतकऱ्यांना जोड उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

यापूर्वी ११ जिल्ह्यांमध्ये राबविला कार्यक्रमयापूर्वी विदर्भ व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सन २०१६ ते २०२२ या कालावधीत ‘विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा १’ हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची फलश्रुती कार्यक्रम राबविताना आलेले अनुभव विचारात घेऊन विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्धोत्पादनाच्या वाढीस चालना देण्यासाठी ‘दुग्ध विकास प्रकल्प दोन’ राबविण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने १३ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

असे असतील लाभार्थ्यांचे निकषदूध उत्पादक शेतकऱ्यांकडे किमान पाच दुधाळ जनावरे असावीत. शास्त्रोक्त पशु आहार पद्धतीने ज्ञान असलेले दुग्ध उत्पादक, शेतकरी. पशुधनाच्या भावी पिढ्यांची पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्यास इच्छुक असलेले पशुपालक.

टॅग्स :milkदूधHingoliहिंगोली