शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

पीकविम्याची रक्कम मिळत नसल्याची ओरड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षी ३.०२ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र ऐन काढणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, ...

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षी ३.०२ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र ऐन काढणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही भागात तुरीच्या पिकालाही अतिपावसाचा फटका बसला होता. त्यातच सोयाबीनची तर पसरच शेतात असल्याने ती पूर्णपणे वाया गेली. काहींच्या सुड्या वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून पीकविमा कंपनीकडे जवळपास तीस ते चाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. तर काहींनी ऑफलाइन तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे ७५ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदा १०७ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यापैकी जवळपास ८० कोटी रुपयांची मदत वाटण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र उर्वरित २७ कोटी रुपयांची मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली नाही. त्यामुळे जिल्हाभरातून ओरड वाढत आहे. मागच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा विषय निघाला होता. मात्र त्याला पुढे कोणी उचलून धरले नाही.

कंपनीची कार्यालये गायब

पीकविमा कंपनीने मागच्या वेळी नुकसानीच्या तक्रारींबाबत लोकप्रतिनिधींनी फैलावर घेतल्यानंतर काही काळासाठी कार्यालये स्थापन करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी यंत्रणा निर्माण केली होती. आता पुन्हा या कार्यालयांमध्ये कोणीच भेटत नसल्याची बोंब शेतकरी करीत आहेत. विमा कंपनीने काही काळासाठीच ही यंत्रणा नेमली होती की काय? असा प्रश्न आहे.

कृषी विभागही दाद देईना

पीकविम्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यावर कृषी अधीक्षक कार्यालयही दाद देत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कार्यालयाच्या चकरा मारल्या. मात्र कुणीच प्रतिसाद देत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कृषी कार्यालयातील अधिकारी आपली जबाबदारी नसल्यासारखे अंग झटकतात, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.