शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

पीकविम्याची रक्कम मिळत नसल्याची ओरड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षी ३.०२ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र ऐन काढणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, ...

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षी ३.०२ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र ऐन काढणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही भागात तुरीच्या पिकालाही अतिपावसाचा फटका बसला होता. त्यातच सोयाबीनची तर पसरच शेतात असल्याने ती पूर्णपणे वाया गेली. काहींच्या सुड्या वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून पीकविमा कंपनीकडे जवळपास तीस ते चाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. तर काहींनी ऑफलाइन तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे ७५ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदा १०७ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यापैकी जवळपास ८० कोटी रुपयांची मदत वाटण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र उर्वरित २७ कोटी रुपयांची मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली नाही. त्यामुळे जिल्हाभरातून ओरड वाढत आहे. मागच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा विषय निघाला होता. मात्र त्याला पुढे कोणी उचलून धरले नाही.

कंपनीची कार्यालये गायब

पीकविमा कंपनीने मागच्या वेळी नुकसानीच्या तक्रारींबाबत लोकप्रतिनिधींनी फैलावर घेतल्यानंतर काही काळासाठी कार्यालये स्थापन करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी यंत्रणा निर्माण केली होती. आता पुन्हा या कार्यालयांमध्ये कोणीच भेटत नसल्याची बोंब शेतकरी करीत आहेत. विमा कंपनीने काही काळासाठीच ही यंत्रणा नेमली होती की काय? असा प्रश्न आहे.

कृषी विभागही दाद देईना

पीकविम्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यावर कृषी अधीक्षक कार्यालयही दाद देत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कार्यालयाच्या चकरा मारल्या. मात्र कुणीच प्रतिसाद देत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कृषी कार्यालयातील अधिकारी आपली जबाबदारी नसल्यासारखे अंग झटकतात, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.