शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पीकविम्याची रक्कम मिळत नसल्याची ओरड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षी ३.०२ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र ऐन काढणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, ...

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षी ३.०२ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र ऐन काढणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाली. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही भागात तुरीच्या पिकालाही अतिपावसाचा फटका बसला होता. त्यातच सोयाबीनची तर पसरच शेतात असल्याने ती पूर्णपणे वाया गेली. काहींच्या सुड्या वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून पीकविमा कंपनीकडे जवळपास तीस ते चाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. तर काहींनी ऑफलाइन तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे ७५ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदा १०७ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यापैकी जवळपास ८० कोटी रुपयांची मदत वाटण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र उर्वरित २७ कोटी रुपयांची मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली नाही. त्यामुळे जिल्हाभरातून ओरड वाढत आहे. मागच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा विषय निघाला होता. मात्र त्याला पुढे कोणी उचलून धरले नाही.

कंपनीची कार्यालये गायब

पीकविमा कंपनीने मागच्या वेळी नुकसानीच्या तक्रारींबाबत लोकप्रतिनिधींनी फैलावर घेतल्यानंतर काही काळासाठी कार्यालये स्थापन करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी यंत्रणा निर्माण केली होती. आता पुन्हा या कार्यालयांमध्ये कोणीच भेटत नसल्याची बोंब शेतकरी करीत आहेत. विमा कंपनीने काही काळासाठीच ही यंत्रणा नेमली होती की काय? असा प्रश्न आहे.

कृषी विभागही दाद देईना

पीकविम्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यावर कृषी अधीक्षक कार्यालयही दाद देत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कार्यालयाच्या चकरा मारल्या. मात्र कुणीच प्रतिसाद देत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कृषी कार्यालयातील अधिकारी आपली जबाबदारी नसल्यासारखे अंग झटकतात, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.