शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पीककर्ज वाटप केवळ ७.७९ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:07 IST

जिल्ह्यात विविध राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावतीने १७ हजार ७८ शेतकऱ्यांना ७४.७0 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. महसूलच्या संपर्क अभियानाने चार्ज झालेल्या बँका पावसामुळे पुन्हा मरगळल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावतीने १७ हजार ७८ शेतकऱ्यांना ७४.७0 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. महसूलच्या संपर्क अभियानाने चार्ज झालेल्या बँका पावसामुळे पुन्हा मरगळल्याचे चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यात यावर्षी कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकºयांना नव्याने कर्ज मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी अजूनही बँकांमध्ये खेटे मारत आहेत. जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११ हजार २१२ शेतकºयांना २१३0 लक्ष रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपाचे या बँकेला १३६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टाच्या केवळ १५.६६ टक्के कर्जवाटप झाले आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ३0९५ शेतकºयांना ३१२७ लक्ष रुपये कर्ज वाटप केले. ७२0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना ४.३४% उद्दिष्टच पूर्ण केले आहे.महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सर्वाधिक २१ टक्के कर्ज वाटप केले. या बँकेला एकशे तीन कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आह.े बँकेने २ हजार ७७१ शेतकºयांना २२१३ लक्ष रुपयांचे कर्जवाटप केले आहे. एकंदर जिल्ह्यात ९५९ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना या बँकांनी ७५ कोटी रुपये एवढेच कर्ज वाटप केले आहे. मराठवाड्यात सर्वात मागे असलेल्या जिल्ह्यांमध्ये हिंगोलीचा समावेश आहे. जवळपास १३ ते १५ टक्के कर्ज वाटप झाल्याचे इतर जिल्ह्यांचे आकडे असताना हिंगोलीत मात्र वेगळे चित्र आहे.महसूल विभागाने हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपास गती यावी. यासाठी प्रत्येक तालुक्याला एक उपजिल्हाधिकारी संपर्क अधिकारी म्हणून नेमला आहे. त्यानंतर पीक कर्ज वाटपाच्या कामाला गती आल्याचे दिसत होते. मात्र ही गती पुढे कायम राहिली नसल्याचे आता प्रत्यक्ष आकडेवारीवरूनदिसून येत आहे. यामध्ये पूवीर्पेक्षा थोडीबहुत सुधारणा झाली, हेही तेवढेच खरे. मागील पाच ते सहा दिवसांत पावसामुळे शेतीची कामे करता येत नसल्याने शेतकरी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात चकरा मारताना दिसत होते. मात्र त्यांना रिकामेच परतावे लागत आहे.जिल्हाधिकाºयांनी संपर्क अधिकाºयांना आदेश दिल्यानंतर एकेकच बैठक झाली. काहींनी तर तीही तसदी घेतली नाही. त्यामुळे पीककर्ज वाटपाचा टक्का वाढीसाठी संपर्क अधिकारीही तोकडे पडताना दिसत आहेत.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी