शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

CoronaVirus : उपासमारीची वेळ आल्याने जालन्यातून ३३ मजूर रातोरात गेले मध्यप्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 6:07 PM

बदनापूर तालुक्यातील महामार्गाच्या कामावर होते मजुरीवर

ठळक मुद्देशुक्रवारी सगळे झाले गायबमध्य प्रदेशातील गावात पोहनचले

- दिलीप सारडा 

बदनापूर : तालुक्यातील केळीगव्हाण शिवारातील केळीगव्हाण- समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेले मध्य प्रदेशातील ३३ मजूर आपल्या मुलाबाळांसह रातोरात मध्यप्रदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागासही थांगपत्ता लागलेला नाही.  

तालुक्यातील केळीगव्हाण शिवारात पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटरचे काम सुरू आहे. हे काम केळीगव्हाण ते समृध्दी महामार्ग व पठार देऊळगाव ते बावणे पांगरी या दोन टप्प्यांमध्ये आहे. यापैकी पठार देऊळगाव ते बावणे पांगरी हा टप्पा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, केळीगव्हाण ते समृध्दी महामार्ग या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाकरीता मध्यप्रदेशातील एकूण ३३ मजुरांना येथे आणण्यात आले होते. यामध्ये (बनहुर, जि. खरगोन धुलकोट, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) अशा विविध गावातील महिला व पुरूषांचा समावेश होता.

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्वत्र ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर कुणीही अन्न- पाण्यावाचून राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. परंतु, या कामावरील मजुरांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु, त्यांनी केळीगव्हाण येथे जावून अन्नपाणी देण्याची मागणी केली. त्यानंतर तेथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या मजुरांविषयी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांनी मजुरांची भेट घेतली. त्यांना एक गोणी तांदूळ व एक गोणी गव्हाचे वाटप केले होते. तसेच ग्रामस्थांनीही मिठ- मिरची, तेल, हळद अशा वस्तू या मजुरांना दिल्या होत्या.

शुक्रवारी सगळे मजूर गायब गुरूवारपर्यंत या कामाच्या ठिकाणी हे सर्व मजूर उपस्थित होते. परंतु, शुक्रवारी सकाळी या ठिकाणी हे मजूर व त्यांचे सामान नसल्याचे ग्रामस्थांना दिसले. पोलीस पाटील रामेश्वर मदन म्हणाले, हे मजूर गुरूवारपर्यंत मी स्वत: बघीतले होते. शुक्रवारी सकाळी मी तेथे गेलो असता तेथे मध्य प्रदेशातुन आलेले एकही मजूर नसून, त्यांचे साहित्यही नव्हते. हे मजूर रात्री एखाद्या वाहनाने येथून गेल्याचे दिसत आहे. 

संबंधित विभागाला खबरच नाहीअभियंता सुदाम शिंदे म्हणाले, मी ‘लॉकडाऊन’च्या काळात या मजुरांना अन्नधान्य पुरविण्यासंदर्भात संबंधित गुत्तेदाराला सूचना केली होती. गुरूवारपर्यंत मजूर तेथेच होते. शुक्रवारी हे मजूर गेल्याची मला माहिती नाही.

मजूर गावी पोहनचले

मी शुक्रवारी मजुरांविषयी संबंधित गुत्तेदाराशी संपर्क साधला. त्यांनी हे मजूर आपापल्या गावी गेल्याचे सांगितले. या मजुरांपैकी एका महिलेसोबत माझे मोबाईलवरून बोलणे झाले असून, त्या महिलेने आम्ही आमच्या गावी पोहचल्याचे मला सांगितले आहे. - छाया पवार, तहसीलदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना