जिल्ह्यात रॅपिड ॲंटीजेन टेस्ट कॅम्पमध्ये ८०२ जणांची तपासणी केली असता यात १० कोरोना बाधित रूग्ण आढळले. हिंगोली परिसरातील ५ रूग्ण असून यात शिवराम नगर १, कपडा गल्ली १, खुशालनगर १, अंतुले नगर १, बियाणी नगर १ येथील रूग्णांचा समावेश आहे. वसमत परिसरात २ रूग्ण आढळले असून यात पांगरा शिंदे १, रांजोना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. कळमनुरी परिसरातील वारंगा फाटा १, सेनगाव परिसरातील सापटगाव १, तसेच औंढा परिसरातील जवळा बाजार येथे १ रूग्ण आढळून आला. आरटीपीसीआर टेस्टमध्येही एकूण २४ रूग्ण आढळून आले. हिंगोली परिसरात २० रूग्ण आढळले असून यात गंगानगर २, सरस्वतीनगर २, श्रीनगर १, ग्रामीण पोलीस ठाणे जवळ १, तिरूपती नगर १, सुराणा नगर १, रिसाला बाजार ३, अकोला बायपास १, सामान्य रूग्णालय १, देव गल्ली १, टी.व्ही. सेंटर १, आमला १, एनटीसी २, गाडीपुरा १, लासीना येथील १ रूग्णांचा समावेश आहे. औंढा परिसरात २ रूग्ण आढळले असून यात लाख १, जवळा बाजार येथील १ रूग्णाचा समावेश आहे. तसेच कळमनुरी परिसरात २ रूग्ण आढळले असून यात भीमनगर १, येळी येथील १ रूग्णाचा समावेश आहे. हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या माळहिवरा येथील एका ८० वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णाचा आकडा ६४ वर पोहचला आहे.
दरम्यान, ८ मार्च रोजी ३२ रूग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यात जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेणाऱ्या २७, तर लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील ५ रूग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना रूग्णांचा संख्या ४ हजार ४३७ झाली असून यापैकी ४ हजार १४ रूग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ३५९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या २२ रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच ४ रूग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.