शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विकासासाठी समाजाने एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:05 AM

मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले. हिंगोली येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर रविवारी दुपारी मातंग समाज आरक्षण व एकता क्रांती महामेळावा आयोजित केला होता.

हिंगोली : मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले. हिंगोली येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर रविवारी दुपारी मातंग समाज आरक्षण व एकता क्रांती महामेळावा आयोजित केला होता.साठे पुढे म्हणाले की, मातंग समाजाच्या विकासासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण होणे काळाजी गरज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समाजाकडून आरक्षण वर्गीकरणाची मागणी होत आहे; परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. आरक्षणाशिवाय समाजाचा विकास होवू शकत नाही. आज प्रत्येक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे. मातंग समाजाने आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे असे त्यांनी सांगितले.संभाजीराव मंडगीकर म्हणाले की, समाज विकासाकडे वाटचाल करत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहा. माजी नगराध्यक्ष बबन शिखरे यांनी मेळाव्यात मातंग समाजाच्या विकासासाठी अनेक ठराव वाचून दाखविले. अनु.जातीसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचे अ, ब, क,ड वर्गवारी झाले पाहिजे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास १ हजार कोटींची तरतूद करावी असे ११ ठराव त्यांनी वाचून दाखविले. महामेळाव्यात अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे, हुतात्मा पोचीराम कांबळे यांच्या पत्नी धोंडाबाई कांबळे यांचा सत्कार झाला. समितीचे अध्यक्ष भागवत डोंगरे, प्रदीप खंदारे, मीराताई गायकवाड, गणेश भगत, अनिल सरोदे, चंद्रकांत कांबळे, राधाकृष्ण साठे, डॉ.संजय लोखंडे, सुनीलभाऊ सौदागर, संजयभाऊ इंचे, संजूबाबा गायकवाड, विनोद वैरागड, शिवराज जाधव, विश्वनाथ गवारे, चंद्रकांत कारके, गजानन खंदारे, प्रल्हाद दगड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. नगरसेवक रविकिरण वाघमारे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहिले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक