शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भाववाढीने तूर लावणारे मालामाल, तर सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच

By रमेश वाबळे | Updated: February 1, 2024 18:12 IST

यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली.

हिंगोली : येथील मोंढ्यात तुरीने १० हजार ६०० रुपयांचा पल्ला पार केला असून, काही दिवसांत अकरा हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनच्या भावात मात्र घसरण सुरूच आहे. १ फेब्रुवारी रोजी सोयाबीनला सरासरी केवळ ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. परंतु, यंदा उत्पादनात घट झाली. त्यामुळे भाव तरी समाधानकारक मिळेल, अशी आशा होती. किमान सहा हजार रुपयांचा भाव अपेक्षित असताना सोयाबीनने पाच हजारांचाही पल्ला गाठला नाही. डिसेंबरमध्ये ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० दरम्यान भाव मिळत होता. भाव वाढतील, अशी अशा असताना घसरण झाली. मागील पंधरवड्यापासून सोयाबीनचे भाव गडगडले असून, १ फेब्रुवारी रोजी सरासरी केवळ ४ हजार २०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत होती.

तर तुरीला सध्या समाधानकारक भाव मिळत असला तरी यंदा उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. ज्या काही शेतकऱ्यांकडे तूर आहे, ते विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, मोंढ्यात अपेक्षित आवक होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी मोंढ्यात दररोज किमान ५०० ते ६०० क्विंटल तूर विक्रीसाठी येते. यंदा मात्र ३०० क्विंटलवर आवक होत नसल्याचे चित्र आहे. सध्या मोंढ्यात तुरीला ९ हजार ९०० ते १० हजार ६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. भाव समाधानकारक असला तरी उत्पादन घटल्याने विक्रीसाठी तूर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गव्हाची आवक मंदावली...नवीन गहू येण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे जो काही गहू शिल्लक आहे. तो विक्रीसाठी येत आहे. परंतु, आवक मंदावली असून, गुरुवारी जवळपास ६० क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. १ हजार ६०० ते ३ हजार १५५ रुपये भाव मिळाला.

हळद वधारली...ऑक्टोबरपासून घसरलेले हळदीचे भाव मागील चार दिवसांपासून वधारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान ११ हजारांपर्यंत भाव घसरले होते. जानेवारीअखेर भावात वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी एक हजार क्विंटलची आवक झाली होती. ११ हजार ५०० ते १४ हजार १०० रुपये भाव मिळाला. हळदीचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हरभऱ्याला मिळाला ५५०० चा भाव...येथील मोंढ्यात हरभऱ्याची आवक अत्यल्प आहे. त्यामुळे भावात किंचित वाढ झाली असून, ४ हजार ७०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडे नवीन हरभरा येण्यासाठी किमान एक महिना लागणार आहे. नवीन हरभऱ्यालाही समाधानकारक भाव मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली