शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

भाववाढीने तूर लावणारे मालामाल, तर सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच

By रमेश वाबळे | Updated: February 1, 2024 18:12 IST

यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली.

हिंगोली : येथील मोंढ्यात तुरीने १० हजार ६०० रुपयांचा पल्ला पार केला असून, काही दिवसांत अकरा हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनच्या भावात मात्र घसरण सुरूच आहे. १ फेब्रुवारी रोजी सोयाबीनला सरासरी केवळ ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. परंतु, यंदा उत्पादनात घट झाली. त्यामुळे भाव तरी समाधानकारक मिळेल, अशी आशा होती. किमान सहा हजार रुपयांचा भाव अपेक्षित असताना सोयाबीनने पाच हजारांचाही पल्ला गाठला नाही. डिसेंबरमध्ये ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० दरम्यान भाव मिळत होता. भाव वाढतील, अशी अशा असताना घसरण झाली. मागील पंधरवड्यापासून सोयाबीनचे भाव गडगडले असून, १ फेब्रुवारी रोजी सरासरी केवळ ४ हजार २०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत होती.

तर तुरीला सध्या समाधानकारक भाव मिळत असला तरी यंदा उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. ज्या काही शेतकऱ्यांकडे तूर आहे, ते विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, मोंढ्यात अपेक्षित आवक होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी मोंढ्यात दररोज किमान ५०० ते ६०० क्विंटल तूर विक्रीसाठी येते. यंदा मात्र ३०० क्विंटलवर आवक होत नसल्याचे चित्र आहे. सध्या मोंढ्यात तुरीला ९ हजार ९०० ते १० हजार ६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. भाव समाधानकारक असला तरी उत्पादन घटल्याने विक्रीसाठी तूर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गव्हाची आवक मंदावली...नवीन गहू येण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे जो काही गहू शिल्लक आहे. तो विक्रीसाठी येत आहे. परंतु, आवक मंदावली असून, गुरुवारी जवळपास ६० क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. १ हजार ६०० ते ३ हजार १५५ रुपये भाव मिळाला.

हळद वधारली...ऑक्टोबरपासून घसरलेले हळदीचे भाव मागील चार दिवसांपासून वधारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान ११ हजारांपर्यंत भाव घसरले होते. जानेवारीअखेर भावात वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी एक हजार क्विंटलची आवक झाली होती. ११ हजार ५०० ते १४ हजार १०० रुपये भाव मिळाला. हळदीचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हरभऱ्याला मिळाला ५५०० चा भाव...येथील मोंढ्यात हरभऱ्याची आवक अत्यल्प आहे. त्यामुळे भावात किंचित वाढ झाली असून, ४ हजार ७०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडे नवीन हरभरा येण्यासाठी किमान एक महिना लागणार आहे. नवीन हरभऱ्यालाही समाधानकारक भाव मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली