शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘स्वच्छता हीच सेवा’अभियान; १०१ समित्यांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:04 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत अंतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत ११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचºयाच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असून यासाठी ग्रामपातळीवर निरीक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जगदीश साहु यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत अंतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत ११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचºयाच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असून यासाठी ग्रामपातळीवर निरीक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जगदीश साहु यांनी दिली आहे.भारत सरकारने २ आॅक्टोबर रोजी संपुर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुचित केल्याप्र्रमाणे ‘स्वच्छता हिच सेवा’ हे अभियान राबविण्यासाठी निर्देश दिले आहेत. ग्रामपातळीवर प्लास्टिक कचºयाचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका यांच्या सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांनी समित्या स्थापन केल्यानंतर गावात गृृहभेटी, आंतरव्यक्तीसंवाद आदी मोहिम राबवावी अशी माहिती गावात प्रभावीपणे देण्यात आली. गावात असलेला कचरा, प्लास्टिक याचे विघटन करून हा जमा झालेला कचरा ग्रामपंचायत स्तरावर जमा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना अभियानात सहभागी करून ‘स्वच्छता हिच सेवा’ विषयाची दिंडी काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामसभा, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत जागृती करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामधुन ही मोहिम राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.ग्रामपंचायतीमध्ये जमा केलेला कचरा पंचायत समिती स्तरावर पाठविला जाणार असुन यासाठी पंचायत समिती येथे प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या अनुषंगाने या मोहिमेंतर्गत संपुर्ण तालुका प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिक, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन तालुका प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी जगदीश साहु यांनी केले आहे.मोहिमेंतर्गत २ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार असुन या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमधुन कचरा गोळा करण्यासाठी शपथ दिली जाणार आहे. तर ३ आॅक्टोबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान जमा झालेल्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी याचा पुनर्वापर, सिमेंट कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र व रस्ते बांधकामासाठी याचा वापर करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी प्लास्टिक कचºयाचे संकलन व वाहतुक करण्यासाठी खाजगी उद्योजकांची मदत या अभियानांतर्गत घेतली जाणार आहे. अशी माहितीही औंढा नागनाथ येथील गटविकास अधिकारी साहु यांनी दिली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य