शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘बालरक्षक’ घेणार बालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 11:59 PM

जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. आरटीई कायद्याची प्रभावीपणे अंमजबावणीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु आजघडीला जिल्ह्यात हजारो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे बंधनकार आहे. जास्तीत जास्त शाळाबाह्य मुलांना शाळेत कसे दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता येईल यासाठी धडपड सुरू आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी बालरक्षक संकल्पना पुढे आली. इतर जिल्ह्यात ही संकल्पा यशस्वी होत आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात बालरक्षकांच्या मदतीने शाळेत न येणाºया मुलांची शोध मोहिम घेण्यात येणार आहे. हिंगोली तालुक्यात २४ बालरक्षक आहेत. तर कळमनुरी ८८, वसमत ८४, औंढा नागनाथ ४० बालरक्षक शिक्षक आहेत.जिल्ह्यातून काही कुटुंबाचे सहा महिन्या करीता तर काही ३ व २ महिन्याकरीता स्थलांतर होते. कुटुंबासोबत मुलांचेही स्थलांतर होऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. ही मुले अभ्यासातही मागे पडतात, त्यानंतर शाळाबाह्य होतात. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठवेण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. बालरक्षकामार्फत शाळेत न जाणाºया मुलांना थेट जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. बालरक्षकाची चळवळ गतिमान करून जिल्ह्यात एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मोहिम राबविली जाणार आहे.बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याची दखल घेत तालुकास्तराव कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. ६ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, उप शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी आदेश देताच शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम प्रभाविपणे राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. सेनगाव येथील गटसाधन केंद्रात ९ आॅक्टोबर रोजी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तर वसमत ११ आॅक्टोबर कळमनुरी १७ आॅक्टोबर औंढा नागनाथ १५ आॅक्टोबर. अधिव्याख्याता देठे, जिल्हा समन्वयक सुदाम गायकवाड मार्गदर्शन करतील.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा