शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

कोरोना काळात बाल मृत्यूचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

हिंगोली: जिल्ह्यात २०१९ मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण २३९ तर २०२० मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण हे २०८ एवढे होते. ...

हिंगोली: जिल्ह्यात २०१९ मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण २३९ तर २०२० मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण हे २०८ एवढे होते. कोरोना काळात मातांनी काळजी घेतल्यामुळे ० ते ५ वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली

जिल्ह्यात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या काळात ० ते १ वर्ष वयोगटातील २१५ आणि १ ते ५ वयोगटातील २४ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षात ० ते १ वर्ष वयोगटातील १८५ आणि १ ते ५ वर्ष वयोगटातील २३ बालकांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात २४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून उपकेंद्र १३२ सद्यस्थितीत कार्यरत आहेत. याचबरोबर सेनगाव, वसमत आणि कळमनुरी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण व मार्गदर्शन शिबिरे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी व शुक्रवारी घेतले जातात. मातांची तसेच बाळाची योग्य ती काळजीही घेतली जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत २५ ते ३० बालके आहेत. यामध्ये ४ ऑक्सिजनवर आहेत तर १९ बेडवर आहेत. ० ते २९ दिवसापर्यंतच्या सर्व बाळांना औषधोपचार वेळेवर दिला जातो. तसेच बाळांची योग्य ती दखलही घेतली जाते. सध्या जिल्हा रुग्णालयातील बाळांची स्थिती चांगली आहे. शिशू विभागात आलेल्या मातांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात येत असून सर्व माता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.

बाॅक्स

कोरोना काळात माता, बालकांनी मास्कचा वापर पुरेपूर केला होता. कोरोना काळात कोणीही बाहेर पडल्याचे आढळून आले नाही. मातांनी आपल्या बालकांची पुरेपूर काळजी घेतली होती. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने माता-बालकांची काळजी घेण्यात आली. माता-बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्राला सूचनाही करण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया

गरोदर मातांनी बाल मृत्यू रोखण्यासाठी प्रथम नोंदणी करुन तपासणी करुन घ्यावी. सकस आहार घ्यावा. लसीकरणाचा लाभ घेत दोन तरी डोस घेणे आवश्यक आहेत. रक्तक्षय तपासणी वेळेवर करुन घेणे. या काळात जास्त वजन उचलू नये. हलके काम करणे. गरोदरपणामध्ये मातांनी बाळाची काळजी घेत आरोग्य विभागाचा सल्ला घ्यावा.

- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. हिंगोली

मातांनी कोणत्याची प्रकारची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुपोषण, काही व्यंग, अपघात झाल्यास लगेच रुग्णालयात जाऊन बाळाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला वेळेच्यावेळी औषधोपचार करणेही तितकेच गरजेचे आहे.

-डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंगोली