शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कोरोना काळात बाल मृत्यूचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

हिंगोली: जिल्ह्यात २०१९ मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण २३९ तर २०२० मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण हे २०८ एवढे होते. ...

हिंगोली: जिल्ह्यात २०१९ मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण २३९ तर २०२० मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण हे २०८ एवढे होते. कोरोना काळात मातांनी काळजी घेतल्यामुळे ० ते ५ वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली

जिल्ह्यात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या काळात ० ते १ वर्ष वयोगटातील २१५ आणि १ ते ५ वयोगटातील २४ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षात ० ते १ वर्ष वयोगटातील १८५ आणि १ ते ५ वर्ष वयोगटातील २३ बालकांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात २४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून उपकेंद्र १३२ सद्यस्थितीत कार्यरत आहेत. याचबरोबर सेनगाव, वसमत आणि कळमनुरी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण व मार्गदर्शन शिबिरे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी व शुक्रवारी घेतले जातात. मातांची तसेच बाळाची योग्य ती काळजीही घेतली जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत २५ ते ३० बालके आहेत. यामध्ये ४ ऑक्सिजनवर आहेत तर १९ बेडवर आहेत. ० ते २९ दिवसापर्यंतच्या सर्व बाळांना औषधोपचार वेळेवर दिला जातो. तसेच बाळांची योग्य ती दखलही घेतली जाते. सध्या जिल्हा रुग्णालयातील बाळांची स्थिती चांगली आहे. शिशू विभागात आलेल्या मातांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात येत असून सर्व माता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.

बाॅक्स

कोरोना काळात माता, बालकांनी मास्कचा वापर पुरेपूर केला होता. कोरोना काळात कोणीही बाहेर पडल्याचे आढळून आले नाही. मातांनी आपल्या बालकांची पुरेपूर काळजी घेतली होती. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने माता-बालकांची काळजी घेण्यात आली. माता-बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्राला सूचनाही करण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया

गरोदर मातांनी बाल मृत्यू रोखण्यासाठी प्रथम नोंदणी करुन तपासणी करुन घ्यावी. सकस आहार घ्यावा. लसीकरणाचा लाभ घेत दोन तरी डोस घेणे आवश्यक आहेत. रक्तक्षय तपासणी वेळेवर करुन घेणे. या काळात जास्त वजन उचलू नये. हलके काम करणे. गरोदरपणामध्ये मातांनी बाळाची काळजी घेत आरोग्य विभागाचा सल्ला घ्यावा.

- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. हिंगोली

मातांनी कोणत्याची प्रकारची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुपोषण, काही व्यंग, अपघात झाल्यास लगेच रुग्णालयात जाऊन बाळाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला वेळेच्यावेळी औषधोपचार करणेही तितकेच गरजेचे आहे.

-डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंगोली