शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कोरोना काळात बाल मृत्यूचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

हिंगोली: जिल्ह्यात २०१९ मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण २३९ तर २०२० मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण हे २०८ एवढे होते. ...

हिंगोली: जिल्ह्यात २०१९ मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण २३९ तर २०२० मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण हे २०८ एवढे होते. कोरोना काळात मातांनी काळजी घेतल्यामुळे ० ते ५ वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली

जिल्ह्यात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या काळात ० ते १ वर्ष वयोगटातील २१५ आणि १ ते ५ वयोगटातील २४ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षात ० ते १ वर्ष वयोगटातील १८५ आणि १ ते ५ वर्ष वयोगटातील २३ बालकांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात २४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून उपकेंद्र १३२ सद्यस्थितीत कार्यरत आहेत. याचबरोबर सेनगाव, वसमत आणि कळमनुरी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण व मार्गदर्शन शिबिरे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी व शुक्रवारी घेतले जातात. मातांची तसेच बाळाची योग्य ती काळजीही घेतली जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत २५ ते ३० बालके आहेत. यामध्ये ४ ऑक्सिजनवर आहेत तर १९ बेडवर आहेत. ० ते २९ दिवसापर्यंतच्या सर्व बाळांना औषधोपचार वेळेवर दिला जातो. तसेच बाळांची योग्य ती दखलही घेतली जाते. सध्या जिल्हा रुग्णालयातील बाळांची स्थिती चांगली आहे. शिशू विभागात आलेल्या मातांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात येत असून सर्व माता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.

बाॅक्स

कोरोना काळात माता, बालकांनी मास्कचा वापर पुरेपूर केला होता. कोरोना काळात कोणीही बाहेर पडल्याचे आढळून आले नाही. मातांनी आपल्या बालकांची पुरेपूर काळजी घेतली होती. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने माता-बालकांची काळजी घेण्यात आली. माता-बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्राला सूचनाही करण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया

गरोदर मातांनी बाल मृत्यू रोखण्यासाठी प्रथम नोंदणी करुन तपासणी करुन घ्यावी. सकस आहार घ्यावा. लसीकरणाचा लाभ घेत दोन तरी डोस घेणे आवश्यक आहेत. रक्तक्षय तपासणी वेळेवर करुन घेणे. या काळात जास्त वजन उचलू नये. हलके काम करणे. गरोदरपणामध्ये मातांनी बाळाची काळजी घेत आरोग्य विभागाचा सल्ला घ्यावा.

- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. हिंगोली

मातांनी कोणत्याची प्रकारची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुपोषण, काही व्यंग, अपघात झाल्यास लगेच रुग्णालयात जाऊन बाळाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला वेळेच्यावेळी औषधोपचार करणेही तितकेच गरजेचे आहे.

-डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंगोली