शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

छत्रपती संभाजीनगर १२ हजार पथदिव्यांनी उजाळणार; पुढील चार महिन्यांत होणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:13 IST

सातारा परिसरात आठ वर्षांनंतर ७,५५० अन् शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावणार

छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाईचे मनपाकडे हस्तांतरणास ८ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका या भागात पथदिवे लावणार आहे. या भागात ७,५०० तर उर्वरित शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावण्याचे आदेश प्रशासक जी.श्रीकांत यांनी विद्युत विभागाला दिले. ३१ मार्च, २०२४ पर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी डेडलाइनही त्यांनी दिली.

स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासकांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत पथदिव्यांचा मुद्दा चर्चेला आला. नवीन वसाहतींमध्ये पथदिवे लावावेत, अशी सातत्याने मागणी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. प्रशासक स्वत: जेव्हा विविध वसाहतींमध्ये पाहणीसाठी जातात, तेव्हाही नागरिक पथदिव्यांचा मुद्दा उपस्थित करतात. ज्या भागात पथदिवे लावलेले नाहीत, अशा भागात पथदिवे लावावेत. सातारा-देवळाई येथे नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ड्रेनेजलाइनच्या कामाला सुरुवात झाली. बहुतांश रस्त्यांवर पथदिवे नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्री अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे लावण्यासाठी विद्युत विभागाने योग्य नियोजन करावे. सातारा-देवळाई भागात ७,५०० तर नो नेटवर्क भागातही ४,५०० पथदिवे लावावेत. शहर प्रकाशमय करण्याच्या दृष्टीने १२ हजार पथदिवे लावण्यासाठी प्रशासकांनी मान्यता दिली.

६० हजार पथदिवे आतापर्यंतशहरात ४० हजार पथदिवे असावेत,असे गृहीत धरून दिल्लीच्या इलेक्ट्रॉन कंपनीला एलईडी दिवे लावण्याचे काम दिले. दहा वर्षांसाठी हे काम दिले. कंपनीने ४० हजारांचा टप्पा पूर्ण केल्यावर अनेक भागांत जुनेच चायनामेड दिवे होते. त्यामुळे २० हजार आणखी दिवे लावले. कंपनीने यासाठी अतिरिक्त पैसे घेतले नाहीत. एलईडी पथदिव्यांमुळे दरमहा सव्वाकोटी रुपयांचे विद्युत बिल कमी येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका