शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

छत्रपती संभाजीनगर १२ हजार पथदिव्यांनी उजाळणार; पुढील चार महिन्यांत होणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:13 IST

सातारा परिसरात आठ वर्षांनंतर ७,५५० अन् शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावणार

छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाईचे मनपाकडे हस्तांतरणास ८ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका या भागात पथदिवे लावणार आहे. या भागात ७,५०० तर उर्वरित शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावण्याचे आदेश प्रशासक जी.श्रीकांत यांनी विद्युत विभागाला दिले. ३१ मार्च, २०२४ पर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी डेडलाइनही त्यांनी दिली.

स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासकांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत पथदिव्यांचा मुद्दा चर्चेला आला. नवीन वसाहतींमध्ये पथदिवे लावावेत, अशी सातत्याने मागणी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. प्रशासक स्वत: जेव्हा विविध वसाहतींमध्ये पाहणीसाठी जातात, तेव्हाही नागरिक पथदिव्यांचा मुद्दा उपस्थित करतात. ज्या भागात पथदिवे लावलेले नाहीत, अशा भागात पथदिवे लावावेत. सातारा-देवळाई येथे नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ड्रेनेजलाइनच्या कामाला सुरुवात झाली. बहुतांश रस्त्यांवर पथदिवे नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्री अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे लावण्यासाठी विद्युत विभागाने योग्य नियोजन करावे. सातारा-देवळाई भागात ७,५०० तर नो नेटवर्क भागातही ४,५०० पथदिवे लावावेत. शहर प्रकाशमय करण्याच्या दृष्टीने १२ हजार पथदिवे लावण्यासाठी प्रशासकांनी मान्यता दिली.

६० हजार पथदिवे आतापर्यंतशहरात ४० हजार पथदिवे असावेत,असे गृहीत धरून दिल्लीच्या इलेक्ट्रॉन कंपनीला एलईडी दिवे लावण्याचे काम दिले. दहा वर्षांसाठी हे काम दिले. कंपनीने ४० हजारांचा टप्पा पूर्ण केल्यावर अनेक भागांत जुनेच चायनामेड दिवे होते. त्यामुळे २० हजार आणखी दिवे लावले. कंपनीने यासाठी अतिरिक्त पैसे घेतले नाहीत. एलईडी पथदिव्यांमुळे दरमहा सव्वाकोटी रुपयांचे विद्युत बिल कमी येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका