कोरोनावरील पुस्तक म्हणजे मानवी गुलामगिरीची उकलपेरणी - भ. मा. परसवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:52+5:302021-02-05T07:54:52+5:30
संजय टाकळगव्हाणकर लिखित कोरोना - गुलामगिरीचे नवे पर्व : टाळेबंदी-पर्यावरण रक्षणाचा नवा मार्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हिंगोली येथील ...

कोरोनावरील पुस्तक म्हणजे मानवी गुलामगिरीची उकलपेरणी - भ. मा. परसवाळे
संजय टाकळगव्हाणकर लिखित कोरोना - गुलामगिरीचे नवे पर्व : टाळेबंदी-पर्यावरण रक्षणाचा नवा मार्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हिंगोली येथील राष्ट्रवादी भवनात २४ जानेवारी रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, ज्येष्ठ कवी विलास वैद्य, सैनिक फेडरेशनचे राज्य कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, माजी जि. प. सदस्य संजय दराडे, डॉ. एम. आर. क्यातमवार, कुंडलिक निर्मले, ॲड. सुकेशिनी ढवळे आणि भूषण स्वामी आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्गाचे भय व लादण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जगभरात सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करून जागतिक सत्ता व अर्थकेंद्रे मूठभरांच्या हातात एकवटली जात असल्याने हे जागतिक स्थित्यंतर अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लेखक संजय टाकळगव्हाणकर यांनी प्रस्तुत पुस्तकात मांडले असल्याचे भ. मा. परसवाळे यांनी सांगितले.
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले की, या पुस्तकात जागतिकीकरणाच्या रेट्यात देशासमोर अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, राजकीय नेतृत्व हे हतबल झाल्याचे दिसून येते. ही बाब पुस्तकातील काही भाग वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. या पुस्तकावर देशस्तरावर विचारमंथन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सोळंके तर आभारप्रदर्शन मुरलीधर जायभाये यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुरलीधर गोडबोले, अशोक पवार, वामन टाकळगव्हाणकर, गुणाजी नलगे, गंगाप्रसाद भिसे, गजानन पायघन, विठ्ठल कानोडे आदींनी परिश्रम घेतले.