शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आधीच पावसाची पाठ त्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव; डोळ्यादेखत कापसाच्या पिकाची नासाडी

By विजय पाटील | Updated: October 6, 2023 17:34 IST

वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी वैतागले; बोंडांनी लगडलेल्या कापसाची डोळ्यांदेखत केली नासाडी

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील कडोळी व परिसरात मागच्या काही दिवसांपासून रोहिंची संख्या वाढली असून खरीप पिकांचे नुकसान करत आहेत. याबाबत वन विभागाला अनेकवेळा सांगण्यात आले. परंतु अद्यापही वन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या एक एकरातील कापसाची नासाडी झाली आहे. या भागात रोहिंबरोबर अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेत शिवारात वावरत आहेत.

एकीकडे पावसाने पाठ फिरविली आहे तर दुसरीकडे वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगाम सुरु झाल्यापासून रोही, नीलगाय, वानरे, रानडुकरे आदी वन्यप्राणी कडोळी व परिसरातील पिकांची नासाडी करीत आहेत. वन्यप्राण्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धावून येवून हल्ला करत आहेत, असेही या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. कडोळी येथील अशोक ओंकार जिरवणकर यांच्या गट क्रमांक ३२४ मध्ये त्यांनी कापसाची लागवड केली. कमी-जास्त पावसामुळे कापूसही चांगले आले. परंतु बोंडांनी लगडलेल्या कापसाची नासाडी केली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एक एकरात केली नासाडी...यावर्षी कापसासाठी भरपूर प्रमाणात मशागत केली. परंतु रोहिंनी बोंडांनी लगडलेल्या कापसाची नासाडी केली. त्यामुळे खरीप हंगामात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मशागत केल्यामुळे कापसाचे पीकही चांगले उगवले होते. मागच्या काही दिवसांपासून कडोळी व परिसरात रोहिंची संख्या वाढली आहे. या रोहिंना हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येत आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पंतगे, संतोष माहोरकर आदींनी पाहणी करून वनविभागाना कळविले. तर वनविभागाने शेतकऱ्याला ऑनलाइन नुकसानीची तक्रार देण्यास सांगितली. यानंतर वनविभागाचे कर्मचारी येऊन पंचनामा करतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीforestजंगलHingoliहिंगोली