राज्यासोबतच जिल्ह्याचाही क्राइम रेट घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST2021-03-16T04:30:56+5:302021-03-16T04:30:56+5:30

राज्यासह देशात वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. पैशांची चणचण भासत असल्याने कौटुंबिक कलह निर्माण ...

Along with the state, the crime rate of the district also decreased | राज्यासोबतच जिल्ह्याचाही क्राइम रेट घटला

राज्यासोबतच जिल्ह्याचाही क्राइम रेट घटला

राज्यासह देशात वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. पैशांची चणचण भासत असल्याने कौटुंबिक कलह निर्माण होत आहेत. यातूनच महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मात्र, पोलिसांच्या वतीने वेळीच मार्गदर्शन केले जात असल्याने कौटुंबिक कलह रोखण्यास मदत झाली आहे. येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात भरोसा सेल स्थापन करून येथे महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. जोडप्यांमध्ये झालेले वाद मिटविण्यात भरोसा सेल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळेच कोरोनासारख्या काळातही महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला अत्याचार प्रकरणी सर्व हेडखाली २०१९ मध्ये २६२ गुन्हे दाखल झाले. त्यानंतर २०२० मध्ये यात घट होत १९५ गुन्ह्यांची नोंद झाली. तर २०२१ मधील मार्च महिन्यात आजपर्यंत १४ गुन्ह्याची नोंद झाली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात पोलिसांना यश आले तसेच गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासह अत्याचार झालेल्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला आहे.

गृहमंत्री म्हणतात, राज्याचा क्राइम रेट घटला

१३ टक्क्यांनी वाढला गुन्हे सिद्ध होण्याचा दर

३२०० ने घट झाली पोक्सोअंतर्गंत गुन्ह्यात

९५९ ने घट महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात

११ टक्क्यांनी घट बलात्काराच्या गुन्ह्यात

जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे विनयभंगाचे

हिंगोली जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी सर्वाधिक गुन्हे हे महिला विनयभंगाचे आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यात विनयभंगाचे ८९ गुन्हे दाखल झाले होते. त्यात २०२० मध्ये एकने घट होत ८८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर २०२१ मध्ये मार्च महिन्यात आजपर्यंत १३ गुन्हे दाखल झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यांत महाराष्ट्र देशात २२ वा तर जिल्हा...

बलात्काराच्या घटनात महाराष्ट्राचा देशात २२ वा क्रमांक लागतो. जिल्ह्यात मात्र बलात्काराच्या घटनांत घट झाल्याचे पाहावयास मिळते. २०१९ मध्ये बलात्काराच्या ४६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ३१ गुन्हे नोंदविले गेले. मार्च महिन्यात आजपर्यंत ३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात काय?

२०१९ २०२० २०२१

गुन्हे सिद्ध होण्याचा दर ३२% ३६%

पोक्सोअंतर्गंत गुन्हे ०० ०० ००

बलात्कार ४६ ३१ ०३

विनयभंग ८९ ८८ १३

Web Title: Along with the state, the crime rate of the district also decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.