शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

‘जागतिक जल दिन’ चा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:33 PM

जागतिक जल दिनाचा प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. जलदिनानिमित्त इतर जिल्ह्यात जलजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर कुठे साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मात्र हिंगोली येथे जल जागृतीनिमित्त कुठल्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जागतिक जल दिनाचा प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. जलदिनानिमित्त इतर जिल्ह्यात जलजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर कुठे साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मात्र हिंगोली येथे जल जागृतीनिमित्त कुठल्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि त्याच्या वापराबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम किंवा योजनाही राबविल्या जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व नागरिकांना सांगितले जाते. परंतु जबाबदार प्रशासनाला जल जागृतीचा विसर पडल्याचे चित्र आहे. हिंगोली येथील जि. प. च्या ्रग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फेही जल दिनानिमित्त विशेष असे काही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले नाही. याबाबत संबधित अभियंता प्रशांत दासरवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी जल दिनानिमित्त अजून तरी काही जलजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली नसून याबाबत वरिष्ठांकडून माहिती मिळाल्यास कळविली, जाईल असे सांगितले. तसेच जि. प. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या विभागातर्फेही जलजागृतीसाठी विशेष काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. याबाबत तसे काही शासनाकडून सूचनांचे पत्रही आमच्या कार्यालयास प्राप्त झाले नाही, असे येथील कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.विशेष म्हणजे वन विभागामार्फतही जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, ते बैठकीत होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. संबधित विभागातर्फेच जर जल साक्षरता संदर्भात जलजागृतीचे कार्यक्रम होणार नसतील तर इतर विभागांचे जागतिक जल दिनानिमित्त काय नियोजन असेल, असा प्रश्न जलप्रेमींतून उपस्थित केला जात आहे.जलजागृतीचा जागर४२२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, तसेच जल साक्षरतेसाठी पाण्याचे नियोजन करणे, पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा काटकसरीने वापर करण्या संदर्भात विविध कार्यक्रम किंंवा उपक्रम राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जलजागृतीचा जागर व्हावा यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. परंतु इतर दिन जसे साजरे होतात, किंवा त्या दिवशी विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले जाते तसे मात्र जल दिनी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलजागृतीबाबत अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे.

टॅग्स :WaterपाणीSocialसामाजिक