शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:04 AM

२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.

ठळक मुद्देसकल मराठा समाज हिंगोलीत झाली बैठकभविष्यात लढा सुरूच ठेवण्याचा इशारा

हिंगोली : राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच राज्य सरकारकडे मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे, ईएसबीसी ही आरक्षणाची पद्धत नसून ही केवळ सवलत आहे. त्यामुळे भविष्यातसुद्धा मराठा समाजाचा लढा सुरूच राहील. तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभरात ५८ च्यावर मोर्चे काढण्यात आले आहेत. अखेर शासनाने मराठा समाजाची आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थिती पाहण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्वे केला. यामध्ये मराठा समाज मागास असल्याचे स्पष्ट झाले असून तसा अहवालही आयोगाने राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच ईएसबीसी हा आरक्षणाचा प्रवर्ग नसून ती केवळ एक सवलत आहे, अशीही चर्चा या बैठकीत झाली. तसेच राज्यभरात मराठा जनसंवाद यात्रा काढण्यात आली असून २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधान भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर, सर्कलनिहाय यासंदर्भात बैठकाही घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील मराठा समाजातील हजारो बांधवांनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीला जिल्हाभरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षण