शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

सिद्धेश्वर धरणातून पाणी उपसा करणाऱ्या २११ शेतकऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:29 IST

येथील  शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणावर असलेल्या तीन गेटवरून अवैध पाणी उपसा करणाऱ्या २११ शेतकऱ्यांवर  कारवाई करण्यात आली आहे. 

धरणातून पाणी उपसा करू नये, असे वारंवार सांगूनही शेतकरी ऐकत नसल्याने ढेगज शिवार, वडचुना व दुरचुना येथील  शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सिद्धेश्वर तलावातून अवैधरीत्या पाणी उपसा करणारे पंपसेट व साहित्यांचे कनेक्शन तोडल्याची कार्यवाही अवैध पाणी उपसा प्रतिबंध पथकाचे प्रमुख तथा औंढा येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव व कनिष्ठ अभियंता अंकित तिवारी यांनी केली. तीन गेट परिसरातील ढेगज शिवार, वडचुना व दूरचुना तलाव क्षेत्रातील अवैध मोटारीची पाहणी केली असता यावेळी त्यांना कनेक्शन दिसून आले.

मात्र सदरील शेतकऱ्यांनी त्यांचे केबल व स्टार्टर जवळपास बऱ्याच जणांनी कनेक्शन कट होण्याचा अंदाज येताच ते घेवून गेले. तसेच महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे सिद्धेश्वर तीन गेटजवळील १६ (एक डीपी), ढेगज शिवरातील ८० (दहा डीपी) व वडचुना शिवारातील ७५ (दहा डीपी), दुरचूना शिवारातील ४० (६ डीपी) एकूण २११ शेतकऱ्यांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळेपर्यंत सुरू करण्यात येऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

धरणात मृत साठा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार  पांडुरंग माचेवाड, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अंकित  तिवारी, महावितरणचे अभियंता जैन, ए.आर. मेश्राम यांनी संयुक्त कार्यवाही केली आहे.  सिद्धेश्वर धरणातील पाणी पिण्यासाठी  राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या धरणातील पाणीसाठा मृत साठ्यात आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्याविरुद्ध जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी वसमत व तहसीलदार औंढा नागनाथ यांनी दिले होते.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी