शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Shivsena: काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं ते गद्दार, संतोष बांगर शिवसेना समर्थकावर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 12:56 IST

धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला.

मुंबई/हिंगोली - आम्ही बंडखोर, गद्दार नाही, कुणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करू, असा इशारा कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला होता. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या आव्हानानंतर आता शिवसेना समर्थकांकडून त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तुम्हाला लाखवेळा गद्दार म्हणणार, हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्या कानाखाली मारून दाखवावीच, असं आव्हान शिवसेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांना दिले होते. त्यानंतर, आता आणखी दोन शिवसेना समर्थकांनी फोन करुन बांगर यांची फिरकी घेतल्याचं दिसून आलं आहे. सध्या हे कॉल रेकॉर्डींग व्हायरल झालं आहे. 

धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला. गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा हे तुमचं विधान ऐकून फोन केल्याचे सांगितले. तसेच, तुम्ही स्वत: कानाखाली आवाज काढायला पाहिजे, गोरगरीब लोकांच्या मुलांना चेतावणी देऊन कशाला सांगतात, असा सवाल मुंढे यांनी केला. त्यावेळी, संतोष बांगर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणारेच गद्दार आहेत, असे म्हटले. तसेच, फोन ठेवा म्हणत फोन कट केला. भाऊ बेरड नावाच्या कळमनुरी मतदारसंघातील मतदारानेही बांगर यांना फोन केला होता. मी नगरला नोकरीसाठी असतो, तुमचं अभिनंदन करायचं होतं. जाता-जाता नगरमार्गे आलात तर सत्कार करायचा होता, असे बेरड यांनी म्हटले. त्यानंतर, तुम्हाला 50 कोटी मिळालेत, मला गरज आहे मला 50 लाख रुपये द्या, मी सहा महिन्यात परत करतो, अशी मागणीही बेरड यांनी फोनद्वारे केली. त्यावर, या ना देतो... उद्याच या... असे म्हणत बांगर यांनी फोनवरील व्यक्तीला प्रतिसाद दिला. सध्या हे कॉल रेकॉर्डींग चांगलंच व्हायरल झालं आहे. 

अयोध्या पौळचा बांगर यांना इशारा

संतोष बांगर म्हणताहेत की, आम्हाला गद्दार म्हणायचं नाही, बंडखोर म्हणायचं नाही. तसं म्हटल्यास आमचे शिवसैनिक तिथे जाऊन त्यांच्या कानाखाली आवाज काढतील. मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना जेवढं ओळखते, ते असं लोकांच्या पाठीत खंजिर खुपसणारे नाही आहेत. मला केवळ बांगर यांच्याकडून धमक्या आलेल्या नाहीत तर मला स्थानिक पातळीवरूनही धमक्या आल्या आहेत, अशी माहिती अयोध्या पौळ यांनी दिली. 

मला धमक्या आल्या, मी आदित्य ठाकरेंना सांगितलं

मी आधी सर्वांच्या पोस्ट लिहायचे. मात्र जेव्हा मी बालाजी कल्याणकर यांच नाव घेऊन पोस्ट लिहिल्या. त्यानंतर मला भायखळ्यातून पोस्ट लिहिल्या तेव्हा मला भायखळ्यातून फोन आले. तुम्ही आमच्या मॅडमविरुद्ध लिहायचं नाही, अशी धमकी देण्यात आली. मात्र मी तोपर्यंत काहीच लिहिलं नव्हतं. मी अशी मुलगी आहे की, जी गोष्ट मला काही करू नको म्हणून सांगितलं जातं, ती गोष्ट मी आधी करते. काय करतील करून करून, पाय मोडतील, जीव घेतील. माझे आई-वडील म्हणतील की, लेकीने शिवसेनेसाठी स्वत:चा जीव दिला. तसं झालं तर माझ्यासारखं भाग्यवान कुणीच नसेल, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.

जेव्हा मला भायखळ्यातून धमक्या आल्या तेव्हा मी सर्वप्रथम सेनाभवनला गेले. तिथे महिलांची मिटिंग होती. तिथे आदित्य ठाकरेंच्या कानावर ही गोष्ट घातली. तसेच दोन दिवसांनंतर २०८,२०९ मध्ये आदित्य यांची मिटिंग होती तेव्हा तिथे एका महिलेनं तू इथे कशाला आलीस म्हणून विचारणा करत, गैरवर्तन केलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत जेव्हा मिटिंग झाली तेव्हा मी माझा जीव गेला तरी शिवसेनेची बाजू मांडणं थांबवणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं, असेही अयोध्या पौळ यांनी सांगितले. 

टॅग्स :MLAआमदारShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदे