शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:19 IST

आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपात मोठा फटका बसला. तर आता रबीची आशाही माळवली आहे. पाणी नसल्याने कोरडवाहू शेतीतील शेतकºयांना तर हरभरा, करडईसारख्या पिकांनाही मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पावसाळी हंगामात म्हणजे जून ते आॅक्टोबरदरम्यान ८८४ मिमी सर्वसाधारण पावसाचे प्रमाण असते. मात्र ६८४ मिमी पर्जन्य झाले. हे प्रमाण ७७.३0 टक्के आहे. गतवर्षीही ६३९ मिमीच पाऊस झाला होता. हे प्रमाण ७१ टक्के होते. त्यामुळे सतत दुसºया वर्षी पावसाने जिल्ह्याला दगा दिलेला आहे. असे असले तरीही आॅगस्ट महिन्यात तेवढा एकदाच मोठा पाऊस झाला होता. या पावसामुळे पहिल्यांदाच नदी-नाले दुथडी ओसंडून वाहात होते. तर बहुतांश लघुप्रकल्प याच पावसामुळे तुडुंब झाले. मात्र नंतर पावसाचा पत्ता नसल्याने असाच ३0 टक्क्यांपर्यंत अनेक ठिकाणचा जलसाठा घटला आहे. तर काही ठिकाणी उपशाचा परिणाम दिसून येत आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात पारोळा-७४ टक्के, वडद-७0 टक्के, चोरजवळा-७४ टक्के, हिरडी-५२ टक्के, सवड-७0 टक्के, पेडगाव-७२ टक्के, हातगाव-६७ टक्के एवढा जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यात सवना ७५, पिंपरी-५५, बाभूळगाव-७६, घोडदरी-२५, औंढा तालुक्यातील वाळकी- ६३, सुरेगाव-४६, औंढा-९२, सेंदूरसना-७४, पुरजळ-६८, वंजारवाडी-७७, पिंपळदरी-७७, काकडदाभा-७३, केळी-६६ टक्के तर कळमनुरी तालुक्यात कळमनुरी-७0, बोथी-९२, दांडेगाव-८४, देवधरी-७४, वसमत तालुक्यातील राजवाडी-७६ तर पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावात ८७ टक्के जलसाठा असल्याचे अहवालात दिसते.चार कोल्हापुरी बंधाºयांमध्ये एकूण ५६ टक्के जलसाठा आहे. यात चिंचखेडा-५७ टक्के, खेर्डा-२२ टक्के, खोलगाडगा-४२ टक्के तर राहाटीत वरच्या धरणातून पाणी सोडल्यामुळे सध्या १00 टक्के जलसाठ्याची नोंद असल्याचे दिसून येत आहे.यंदा धरणांचे चित्र मात्र विदारक आहे. इसापूर धरणात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा असला तरीही येलदरी धरणात ८.८0 टक्केच जलसाठा उरला. सिद्धेश्वरमध्ये तर अवघा २.७४ टक्के जलसाठा असून हे धरण मृतसाठ्यात जाण्यात आहे.पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर लघुप्रकल्पांसह कोणत्याही जलसाठ्यात पाणीउपसा करू नये, यासाठी जिल्हा प्रशासनास आदेश दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प