शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:19 IST

आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपात मोठा फटका बसला. तर आता रबीची आशाही माळवली आहे. पाणी नसल्याने कोरडवाहू शेतीतील शेतकºयांना तर हरभरा, करडईसारख्या पिकांनाही मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पावसाळी हंगामात म्हणजे जून ते आॅक्टोबरदरम्यान ८८४ मिमी सर्वसाधारण पावसाचे प्रमाण असते. मात्र ६८४ मिमी पर्जन्य झाले. हे प्रमाण ७७.३0 टक्के आहे. गतवर्षीही ६३९ मिमीच पाऊस झाला होता. हे प्रमाण ७१ टक्के होते. त्यामुळे सतत दुसºया वर्षी पावसाने जिल्ह्याला दगा दिलेला आहे. असे असले तरीही आॅगस्ट महिन्यात तेवढा एकदाच मोठा पाऊस झाला होता. या पावसामुळे पहिल्यांदाच नदी-नाले दुथडी ओसंडून वाहात होते. तर बहुतांश लघुप्रकल्प याच पावसामुळे तुडुंब झाले. मात्र नंतर पावसाचा पत्ता नसल्याने असाच ३0 टक्क्यांपर्यंत अनेक ठिकाणचा जलसाठा घटला आहे. तर काही ठिकाणी उपशाचा परिणाम दिसून येत आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात पारोळा-७४ टक्के, वडद-७0 टक्के, चोरजवळा-७४ टक्के, हिरडी-५२ टक्के, सवड-७0 टक्के, पेडगाव-७२ टक्के, हातगाव-६७ टक्के एवढा जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यात सवना ७५, पिंपरी-५५, बाभूळगाव-७६, घोडदरी-२५, औंढा तालुक्यातील वाळकी- ६३, सुरेगाव-४६, औंढा-९२, सेंदूरसना-७४, पुरजळ-६८, वंजारवाडी-७७, पिंपळदरी-७७, काकडदाभा-७३, केळी-६६ टक्के तर कळमनुरी तालुक्यात कळमनुरी-७0, बोथी-९२, दांडेगाव-८४, देवधरी-७४, वसमत तालुक्यातील राजवाडी-७६ तर पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावात ८७ टक्के जलसाठा असल्याचे अहवालात दिसते.चार कोल्हापुरी बंधाºयांमध्ये एकूण ५६ टक्के जलसाठा आहे. यात चिंचखेडा-५७ टक्के, खेर्डा-२२ टक्के, खोलगाडगा-४२ टक्के तर राहाटीत वरच्या धरणातून पाणी सोडल्यामुळे सध्या १00 टक्के जलसाठ्याची नोंद असल्याचे दिसून येत आहे.यंदा धरणांचे चित्र मात्र विदारक आहे. इसापूर धरणात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा असला तरीही येलदरी धरणात ८.८0 टक्केच जलसाठा उरला. सिद्धेश्वरमध्ये तर अवघा २.७४ टक्के जलसाठा असून हे धरण मृतसाठ्यात जाण्यात आहे.पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर लघुप्रकल्पांसह कोणत्याही जलसाठ्यात पाणीउपसा करू नये, यासाठी जिल्हा प्रशासनास आदेश दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प