शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:19 IST

आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपात मोठा फटका बसला. तर आता रबीची आशाही माळवली आहे. पाणी नसल्याने कोरडवाहू शेतीतील शेतकºयांना तर हरभरा, करडईसारख्या पिकांनाही मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पावसाळी हंगामात म्हणजे जून ते आॅक्टोबरदरम्यान ८८४ मिमी सर्वसाधारण पावसाचे प्रमाण असते. मात्र ६८४ मिमी पर्जन्य झाले. हे प्रमाण ७७.३0 टक्के आहे. गतवर्षीही ६३९ मिमीच पाऊस झाला होता. हे प्रमाण ७१ टक्के होते. त्यामुळे सतत दुसºया वर्षी पावसाने जिल्ह्याला दगा दिलेला आहे. असे असले तरीही आॅगस्ट महिन्यात तेवढा एकदाच मोठा पाऊस झाला होता. या पावसामुळे पहिल्यांदाच नदी-नाले दुथडी ओसंडून वाहात होते. तर बहुतांश लघुप्रकल्प याच पावसामुळे तुडुंब झाले. मात्र नंतर पावसाचा पत्ता नसल्याने असाच ३0 टक्क्यांपर्यंत अनेक ठिकाणचा जलसाठा घटला आहे. तर काही ठिकाणी उपशाचा परिणाम दिसून येत आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात पारोळा-७४ टक्के, वडद-७0 टक्के, चोरजवळा-७४ टक्के, हिरडी-५२ टक्के, सवड-७0 टक्के, पेडगाव-७२ टक्के, हातगाव-६७ टक्के एवढा जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यात सवना ७५, पिंपरी-५५, बाभूळगाव-७६, घोडदरी-२५, औंढा तालुक्यातील वाळकी- ६३, सुरेगाव-४६, औंढा-९२, सेंदूरसना-७४, पुरजळ-६८, वंजारवाडी-७७, पिंपळदरी-७७, काकडदाभा-७३, केळी-६६ टक्के तर कळमनुरी तालुक्यात कळमनुरी-७0, बोथी-९२, दांडेगाव-८४, देवधरी-७४, वसमत तालुक्यातील राजवाडी-७६ तर पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावात ८७ टक्के जलसाठा असल्याचे अहवालात दिसते.चार कोल्हापुरी बंधाºयांमध्ये एकूण ५६ टक्के जलसाठा आहे. यात चिंचखेडा-५७ टक्के, खेर्डा-२२ टक्के, खोलगाडगा-४२ टक्के तर राहाटीत वरच्या धरणातून पाणी सोडल्यामुळे सध्या १00 टक्के जलसाठ्याची नोंद असल्याचे दिसून येत आहे.यंदा धरणांचे चित्र मात्र विदारक आहे. इसापूर धरणात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा असला तरीही येलदरी धरणात ८.८0 टक्केच जलसाठा उरला. सिद्धेश्वरमध्ये तर अवघा २.७४ टक्के जलसाठा असून हे धरण मृतसाठ्यात जाण्यात आहे.पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर लघुप्रकल्पांसह कोणत्याही जलसाठ्यात पाणीउपसा करू नये, यासाठी जिल्हा प्रशासनास आदेश दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प