शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

वन्य प्राण्यांकडून नुकसानीची शेतकऱ्यांना ६२ लाख भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:01 IST

सर्वेक्षणात आढळले १३५३ वन्य प्राणी

ठळक मुद्देनुकसान टाळण्यास केले २00 किमी प्रतिबंधक चरहिंगोली जिल्ह्यात तीन तरसांचे वास्तव्य

हिंगोली : जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांना ३ कोटी रुपयांची भरपाई प्रदान केली आहे. यात वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यातील जखमी, मृत झाल्यास वारसांना, पीकहानी व पशुहानीबाबत दिलेल्या मदतीचा समावेश आहे. हे हल्ले दिवसेंदिवस वाढत चाले आहेत.

२0१७-१८ मध्ये माणसांवर हल्ल्याच्या १५ घटना घडल्या होत्या. यात १२ लाख ९७ हजार ९५९ रुपयांची भरपाई दिली. २0१८-१९ मध्ये ३४ हल्ले झाले होते. यात १७.६९ लाखांची मदत दिली. तर चालू आर्थिक वर्षात १३ हल्ल्यांतील नुकसानग्रस्तांना ४.८८ लाखांची मदत दिली. पीकहानीची प्रकरणेही तीन वर्षांत ६१८ एवढी निकाली निघाली. यात २0१७-१८ मध्ये ९६ प्रकरणांत २.९१ लाख, २0१८-१९ मध्ये ४0२ प्रकरणांत ११.७६ लाख तर चालू आर्थिक वर्षात १२0 प्रकरणांत २.२५ लाखांची भरपाई वाटप करण्यात आली आहे. पशुधन हानीच्या एकूण ७१ प्रकरणांत १0 लाखांची भरपाई दिली. यात २0१७-१८ मध्ये २२ प्रकरणांत २.४२ लाख, २0१८-१९ मध्ये ३७ प्रकरणांत ४.0८ लाख तर चालू आर्थिक वर्षातील १२ प्रकरणांत ३.५२ लाखांची मदत प्रदान केली आहे. 

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानीपासून बचावासाठी उपायही वन विभागाकडून आखले जात आहेत. जंगलाशेजारील गावात अथवा शेतात वन्यप्राणी येवू नये यासाठी गुरे प्रतिबंधक चर खोदकाम करण्यात आले आहे. यात २0 किमीची चर खोदल्याचे वन विभागाच्या अहवालात म्हटले. तर वन्य प्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध होण्यासाठी १२२ वनतळी घेतली आहेत. खोल सलग समतल चराचे ५0८ गट निर्माण केले. याशिवाय माती नाला बांधांची १८२ कामे, अनघड दगडी बांधांची १४२ तर सिमेंट नाला बांधांची १५ कामे घेऊन जंगलवाढीस पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्नही केला.

३३ ठिकाणी टँकरचे पाणीजंगलात वन्य प्राण्यांसाठी नैसर्गिक जलसाठे उपलब्ध असतीलच, असे नाही. वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ३४ ठिकाणी नैसर्गिक जलस्त्रोतावर वन्यप्राण्यांची तहान भागते, असे सांगण्यात येते. मात्र कृत्रिम स्त्रोतांची संख्याही ३३ आहे. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. अनेकदा याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हे पाणवठे कोरडे पडतात. मात्र त्यात कायम पाणी उपलब्ध राहील, याकडे वन विभागाचा कटाक्ष असतो, असे सांगण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात तीन तरसांचे वास्तव्यवन विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वन्य जैवविविधतेची माहिती गोळा करण्यात आली होती. यात ११ प्रकारचे १३५३ वन्य प्राणी असल्याचे आढळून आले होते. मात्र यातील काही वन्य प्राण्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.यात तरस ३, रानमांजर ६, मोर १२७, काळवीट २१, भेंडकी १0, चितळ ८१, नीलगायी ६२७, वानरे ८६, कोल्हा ३0, रानडुक्कर ३२३, ससा व इतर ३0 अशी संख्या असल्याचे म्हटले आहे. तर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ४५२६ चौरस किमी असून यापैकी २९0.८१ चौ. किमीचे वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र जिल्ह्यातील ७0८ पैकी १३६ गावांत विभागले आहे.

टॅग्स :forestजंगलHingoliहिंगोलीforest departmentवनविभागfundsनिधीFarmerशेतकरी