शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

२४ बालकांना काढले कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:08 IST

महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे.जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल ग्रामविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी १0८९ अंगणवाड्यांमधून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४४४ बालके कुपोषित आढळली होती.त्यांना बालकविकास केंद्रात दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांअंतर्गत बालविकास केंद्रात दाखल प्रकल्पनिहाय मुले हिंगोली -६१, वसमत १३४, कळमनुरी २३, आखाडा बाळापूर २६, औंढा नागनाथ १०९, सेनगाव ९१ असे चित्र आहे. या बालकांना दिवसातून आठवेळा पोषण आहार व आरोग्य सेवा दिली जात आहे. यापैकी २४ बालकांना कुपोषणाबाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये हिंगोली-४, वसमत-१५, औंढा-३ व सेनगाव २ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. कळमनुरी व औंढ्यात अजून एकही बालक कुपोषणाबाहेर आले नाही.२२३ बालके कमी कुपोषित गटात आली आहेत. यामध्ये हिंगोली-२५, वसमत-७५, कळमनुरी-१४, आखाडा बाळापूर-९, औंढा नागनाथ-६0 व सेनगावातील ४0 बालके आहेत.एका महिन्यात श्रेणीवर्धनाचे आव्हानबालविकास केंद्र आणखी महिनाभर सुरू राहणार आहेत. या काळात सर्वच बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्याचे आव्हान आगंणवाडीताई, मदतनीस, पर्यवेक्षिकांना पेलावे लागणार आहे. ही बालके कुपोषणाबाहेर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिल्या.या बालविकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित बालकाला पूरक पोषण आहार दिला जातो.या आहारमध्ये दूध,केळी, अंडी असे पोषण आहार दिले जाते. त्याच बरोबर वेगवेगळया लसीकरण सुध्दा दिल्या जाते. तसेच यादरम्यान त्याला आरोग्यविषयक समस्या असल्यास त्यावर उपचारही केले जातात.त्यामुळे या केंद्रामध्ये कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन होण्यास मदत होते. तर बालकांना घरीही योग्य प्रकारचा आहार मिळण्यासाठी त्यांच्या पालकांना जागरुक केले जात आहे. ही बालके पुन्हा कुपोषणाच्या गर्तेत सापडू नये, याची काळजी घेतली जात आहे.या उपक्रमावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि.प. सीईओ एच.पी.तुम्मोड, महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव लक्ष ठेवून आहेत. यातील काहींनी केंद्रांना भेटीही दिल्या.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य