शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

२४ बालकांना काढले कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:08 IST

महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे.जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल ग्रामविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी १0८९ अंगणवाड्यांमधून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४४४ बालके कुपोषित आढळली होती.त्यांना बालकविकास केंद्रात दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांअंतर्गत बालविकास केंद्रात दाखल प्रकल्पनिहाय मुले हिंगोली -६१, वसमत १३४, कळमनुरी २३, आखाडा बाळापूर २६, औंढा नागनाथ १०९, सेनगाव ९१ असे चित्र आहे. या बालकांना दिवसातून आठवेळा पोषण आहार व आरोग्य सेवा दिली जात आहे. यापैकी २४ बालकांना कुपोषणाबाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये हिंगोली-४, वसमत-१५, औंढा-३ व सेनगाव २ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. कळमनुरी व औंढ्यात अजून एकही बालक कुपोषणाबाहेर आले नाही.२२३ बालके कमी कुपोषित गटात आली आहेत. यामध्ये हिंगोली-२५, वसमत-७५, कळमनुरी-१४, आखाडा बाळापूर-९, औंढा नागनाथ-६0 व सेनगावातील ४0 बालके आहेत.एका महिन्यात श्रेणीवर्धनाचे आव्हानबालविकास केंद्र आणखी महिनाभर सुरू राहणार आहेत. या काळात सर्वच बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्याचे आव्हान आगंणवाडीताई, मदतनीस, पर्यवेक्षिकांना पेलावे लागणार आहे. ही बालके कुपोषणाबाहेर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिल्या.या बालविकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित बालकाला पूरक पोषण आहार दिला जातो.या आहारमध्ये दूध,केळी, अंडी असे पोषण आहार दिले जाते. त्याच बरोबर वेगवेगळया लसीकरण सुध्दा दिल्या जाते. तसेच यादरम्यान त्याला आरोग्यविषयक समस्या असल्यास त्यावर उपचारही केले जातात.त्यामुळे या केंद्रामध्ये कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन होण्यास मदत होते. तर बालकांना घरीही योग्य प्रकारचा आहार मिळण्यासाठी त्यांच्या पालकांना जागरुक केले जात आहे. ही बालके पुन्हा कुपोषणाच्या गर्तेत सापडू नये, याची काळजी घेतली जात आहे.या उपक्रमावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि.प. सीईओ एच.पी.तुम्मोड, महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव लक्ष ठेवून आहेत. यातील काहींनी केंद्रांना भेटीही दिल्या.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य