शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

२४ बालकांना काढले कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:08 IST

महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे.जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल ग्रामविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी १0८९ अंगणवाड्यांमधून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४४४ बालके कुपोषित आढळली होती.त्यांना बालकविकास केंद्रात दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांअंतर्गत बालविकास केंद्रात दाखल प्रकल्पनिहाय मुले हिंगोली -६१, वसमत १३४, कळमनुरी २३, आखाडा बाळापूर २६, औंढा नागनाथ १०९, सेनगाव ९१ असे चित्र आहे. या बालकांना दिवसातून आठवेळा पोषण आहार व आरोग्य सेवा दिली जात आहे. यापैकी २४ बालकांना कुपोषणाबाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये हिंगोली-४, वसमत-१५, औंढा-३ व सेनगाव २ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. कळमनुरी व औंढ्यात अजून एकही बालक कुपोषणाबाहेर आले नाही.२२३ बालके कमी कुपोषित गटात आली आहेत. यामध्ये हिंगोली-२५, वसमत-७५, कळमनुरी-१४, आखाडा बाळापूर-९, औंढा नागनाथ-६0 व सेनगावातील ४0 बालके आहेत.एका महिन्यात श्रेणीवर्धनाचे आव्हानबालविकास केंद्र आणखी महिनाभर सुरू राहणार आहेत. या काळात सर्वच बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्याचे आव्हान आगंणवाडीताई, मदतनीस, पर्यवेक्षिकांना पेलावे लागणार आहे. ही बालके कुपोषणाबाहेर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिल्या.या बालविकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित बालकाला पूरक पोषण आहार दिला जातो.या आहारमध्ये दूध,केळी, अंडी असे पोषण आहार दिले जाते. त्याच बरोबर वेगवेगळया लसीकरण सुध्दा दिल्या जाते. तसेच यादरम्यान त्याला आरोग्यविषयक समस्या असल्यास त्यावर उपचारही केले जातात.त्यामुळे या केंद्रामध्ये कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन होण्यास मदत होते. तर बालकांना घरीही योग्य प्रकारचा आहार मिळण्यासाठी त्यांच्या पालकांना जागरुक केले जात आहे. ही बालके पुन्हा कुपोषणाच्या गर्तेत सापडू नये, याची काळजी घेतली जात आहे.या उपक्रमावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि.प. सीईओ एच.पी.तुम्मोड, महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव लक्ष ठेवून आहेत. यातील काहींनी केंद्रांना भेटीही दिल्या.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य