शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

हिंगोली जिल्ह्यातून कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत २३३ लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 6:51 PM

हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

ठळक मुद्देमहात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना

हिंगोली : कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांची सोमवारी पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन गावे २४ फेब्रुवारी निवडली जाणार होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची यादी जाहिर करण्यात आली असून यामध्ये हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे. एकूण २३३ लाभार्थ्यांची नावे पहिल्या यादीत आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजने अंतर्गत आजपर्यंत १ लाख ५ हजार ६९० शेतकऱ्यांचे कर्जखात्याशी आधार जोडणी झालेली आहे. त्यापैकी ९६ हजार ९९५ शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. अद्याप ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी आपले आधार ओळखपत्र आणून न दिल्याने त्यांची आधार जोडणीचे काम प्रलंबीत आहे. आधार जोडणीचे काम शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी विनाविलंब त्यांचे आधार ओळखपत्र संबंधीत बँक शाखेत देवून आधार जोडणीचे काम पुर्ण करावे असे आवाहन जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत पायलट प्रमाणिकरणासाठी हिंगोली तालुक्यातील मौजे समगा व खरबी या दोन गावांची निवड केली होती. मौजे समगा गावातील १४७ तर खरबी येथील ८६ असे एकूण २३३ लाभार्थ्यांची यादी सोमवारी संबंधीत गावात प्रसिध्द केली. त्यानंतर या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणांचे काम सुरुळीतपणे सुरु झाले आहे. समगा व खांबाळा येथील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक यंत्राद्वारे हे आधार प्रमाणिकरणाचे काम करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण नोंद पावती देवून सोमवारी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसिलदार खंडागळे, सहाय्यक निबंधक जितेंद्र भालेराव आदी उपस्थितत होते. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली भेटकर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहिर झाली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी समगा याठिकाणी भेट देऊन प्रत्येक्ष पाहणी केली. यावेळी आपले सरकार सेवा केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तर समगा व खरबी याठिकाणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनीही भेटी देऊन पाहणी केली.४२३३ लाभार्थ्यांची बँक निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. यात हिंगोली तालुक्यातील समगा गावातील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अलाहाबाद बँक -१, बँक आॅफ इंडिया-२८, स्टेट बँक आॅफ इंडिया-२२, युनियन बँक आॅफ इंडिया-९६ असे एकूण १४७ लाभार्थी शेतकरी तर खरबी येथील बँक आॅफ बडोदा या बँकेमध्ये एकूण ८६ लाभार्थी शेतकरी आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfundsनिधीState Governmentराज्य सरकार