शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

ग्रा.पं.ना पुन्हा वित्तचे १६ कोटी; पीएफएमएसचे घोडे अडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:32 IST

हिंगोली जिल्ह्यात आधीच ग्रामपंचायतींना मिळालेल्या जवळपास ५० कोटींच्या निधीच्या खर्चाला पीएफएमएसप्रणाली विकसित न केल्याने ब्रेक लागलेला आहे. यापैकी २५ ...

हिंगोली जिल्ह्यात आधीच ग्रामपंचायतींना मिळालेल्या जवळपास ५० कोटींच्या निधीच्या खर्चाला पीएफएमएसप्रणाली विकसित न केल्याने ब्रेक लागलेला आहे. यापैकी २५ टक्के ग्रामपंचायतींनीही ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित केली नाही. त्यातच काही ग्रामपंचायतींना या प्रणालीतील काहीच कळत नसल्याने या प्रणालीसाठी प्रशासन सूचना देऊन थकले तरीही काहीच व्हायला तयार नाही. काही ग्रामपंचायतींनी जुन्या नोंदणीचे काम ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण केले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, १०० टक्के ग्रामपंचायती या प्रणालीवर आल्याशिवाय वित्त आयोगासह ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या कोणत्याच निधीच्या खर्चाची शाश्वती नाही.

वित्त आयोगाच्या निधीतील १० टक्के जि.प., १० टक्के पं.स., तर ८० टक्के निधी ग्रामपंचायतींना जातो. आता आयसीआयसीआय बँकेत खाते उघडल्यास त्यांच्याकडूनच पीएफएमएसप्रणालीसाठी मदत केली जाणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा निधी आता या बँकेकडे वर्ग करावा लागणार असल्याचे दिसत आहे. बंधित अनुदानातून स्वच्छता व हगणदारीमुक्तीसाठीच्या उपाययोजनांची देखभाल व दुरुस्ती, तसेच पेयजल पाणीपुरवठा, जलपुनर्भरण/ जलपुन: प्रक्रिया या दोन बाबींसाठी प्रत्येकी ५० टक्क्यांच्या प्रमाणात खर्च करावयाचा आहे.

असा मिळणार निधी

यामध्ये हिंगोली जि.प.ला २० कोटी ९२ लाख रुपये मिळणार आहेत. यापैकी २.०९ कोटी जि.प.ला, तर तेवढेच पंचायत समितीलाही मिळतील. उर्वरित १६.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यांवर निकषाप्रमाणे वितरित केला जाणार आहे.