शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

१०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:44 PM

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे.

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे.

मागील दोन वर्षांपासून रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवघ्या दोन वर्षांत तब्बल रस्त्यावरील अपघातात २६० जणांचा बळी गेलेला असला तरीही जखमींची संख्या सर्वाधिक जास्त आहे. केवळ वेळेवर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्यामुळे अनेक रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले आहेत. तर अनेक गोरगरीब रुग्णांना हिंगोली येथून नांदेडसह इतर रुग्णालयात रुग्णांना हलविण्यासाठीही ही रुग्णवाहिका अतिशय उपयेगाची ठरली आहे. विशेष करुन १०२ जननी शिशुच्या रुग्णवाहिकेला उतरती कळा आल्याने याच रुग्णवाहिकेवर गरोदरमांताची ने-आण करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेही रुग्ण समाधानी आहेत.

मात्र एखाद्यावेळी गरोदर मातेला आणण्यासाठी तर कधी प्रसुती मातांना नेऊन सोडण्यासाठी रुग्णवाहिका गेल्यास, अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे १०२ रुग्णवाहिकेचा ताण कमी करुन केवळ अपघातस्थळी जाण्यासाठीच या रुग्णवाहिकेचा वापर केल्यास खरोखरच अनेक रुग्णांना ही रुग्णवाहिका संजीवनी ठरणार आहे. सध्या दोन्हीकडेही रुग्णवाहिका धावत असल्याचे चित्र आहे. तर हिंगोलीतील यंत्राणाही रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याबाबत यंत्रणेला कडक सूचविले आहे. तर अनेकदा याबाबत तक्रार आल्यास स्वत: दखल घेवून संबंधितांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे कामाचा ताणजिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या १२ रूग्णवाहिका आहेत. प्रत्येक रूग्णवाहिकेत नियमाप्रमाणे तीन डॉक्टर असणे आवश्यक आहेत. परंतु १२ रूग्णवाहिकेवर केवळ २८ डॉक्टरच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रूग्णांची गैरसोय होऊ नये, वेळेत कॉल पूर्ण करता यावा यासाठी डॉक्टरांकडून नियोजन केले जाते. परंतु त्यामुळे मात्र अतिरिक्त कामाचा ताण येतो. लवकरच तीन डॉक्टरांची पदे भरली जाणार आहेत, असे जिल्हा व्यवस्थापक डॉ. ईनायतुल्ला खान यांनी सांगितले. तर १०२ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वाहने दुरूस्तीस पाठविली आहेत. तर ६ रूग्णवाहिका वापराविना धूळ खात पडून आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधंgovernment schemeसरकारी योजना