शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

सतत विसरत आहात; तुम्हाला अल्झायमर तर नाही ना? जाणून घ्या लक्षणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 13:02 IST

अनेकदा वृद्धापकाळात किंवा वयाची पासष्टी ओलांडल्यानंतर काही जणांना गोष्टींचा विसर पडू लागतो.

Health Tips : अनेकदा वृद्धापकाळात किंवा वयाची पासष्टी ओलांडल्यानंतर काही जणांना गोष्टींचा विसर पडू लागतो. त्याला स्मृतिभ्रंश असेही म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला अल्झायमर असेही संबोधले जाते. ज्या व्यक्तींना हा आजार होतो, त्यांना नियमित भेटणाऱ्या व्यक्तींची नावेसुद्धा लक्षात राहत  नाहीत. अल्झायमर या आजारात मज्जातंतूला हानी पोहोचते. जगभरात या आजराचे रुग्ण असून, यावर ठोस असा उपचार मिळालेला नाही. 

या आजाराचे निदान होताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. औषधोपचाराने या आजाराची काही लक्षणे कमी करण्यास मदत होते. तसेच गरज पडल्यास निवडक चाचण्या करून त्यांना योग्य उपचार करता येऊ शकतात.- डॉ. निर्मल सूर्या, न्यूरो फिजिशियन, बॉम्बे हॉस्पिटल

लक्षणे कोणती? 

घरातील नियमित वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते लक्षात राहत नाही. पूर्वी एखाद्या ठिकाणी जाऊन आलो तरी त्या व्यक्तीला काहीच आठवत नाही. संवाद साधताना अचूक शब्द सुचत नाहीत, व्यक्ती अडखळत बोलू लागते. काहींना स्वत:चे नावही लक्षात राहत नाही. वय झाले असे समजून अनेकदा या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते.

कारणे काय? 

 काही वेळेला हा आजार आनुवंशिक असण्याची शक्यता वर्तविली जाते.

 वयोमानानुसार हा आजार ६५ वयानंतर होण्यास सुरुवात होते. तर मधुमेह, रक्तदाबाच्या तक्रारीमुळेसुद्धा हा आजार होतो. 

 आधुनिक जीवनशैली त्यासोबत धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून दूर राहून दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून  संतुलित आहार आणि दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. 

या आजाराचा तीन टप्प्यांतून प्रवास...

१) अल्झायमर आजाराचा प्रवास हा विविध टप्प्यांतून होत असतो. सुरुवातीच्या टप्प्यात स्मरणशक्ती कमी होते.

२) एखाद्या कामाचे नियोजन करताना अडचणी निर्माण होतात. तसेच काम करताना मनस्थिती ठीक नसते, तर त्याच्या पुढच्या टप्प्यात दैनंदिन कामाकरिता त्या व्यक्तीला घरातील अन्य सदस्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते.

३) तिसऱ्या टप्प्यात त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे गमावली जाते. त्यांना अन्न गिळण्यासही त्रास होतो. या टप्प्यात रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स