शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सतत विसरत आहात; तुम्हाला अल्झायमर तर नाही ना? जाणून घ्या लक्षणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 13:02 IST

अनेकदा वृद्धापकाळात किंवा वयाची पासष्टी ओलांडल्यानंतर काही जणांना गोष्टींचा विसर पडू लागतो.

Health Tips : अनेकदा वृद्धापकाळात किंवा वयाची पासष्टी ओलांडल्यानंतर काही जणांना गोष्टींचा विसर पडू लागतो. त्याला स्मृतिभ्रंश असेही म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला अल्झायमर असेही संबोधले जाते. ज्या व्यक्तींना हा आजार होतो, त्यांना नियमित भेटणाऱ्या व्यक्तींची नावेसुद्धा लक्षात राहत  नाहीत. अल्झायमर या आजारात मज्जातंतूला हानी पोहोचते. जगभरात या आजराचे रुग्ण असून, यावर ठोस असा उपचार मिळालेला नाही. 

या आजाराचे निदान होताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. औषधोपचाराने या आजाराची काही लक्षणे कमी करण्यास मदत होते. तसेच गरज पडल्यास निवडक चाचण्या करून त्यांना योग्य उपचार करता येऊ शकतात.- डॉ. निर्मल सूर्या, न्यूरो फिजिशियन, बॉम्बे हॉस्पिटल

लक्षणे कोणती? 

घरातील नियमित वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते लक्षात राहत नाही. पूर्वी एखाद्या ठिकाणी जाऊन आलो तरी त्या व्यक्तीला काहीच आठवत नाही. संवाद साधताना अचूक शब्द सुचत नाहीत, व्यक्ती अडखळत बोलू लागते. काहींना स्वत:चे नावही लक्षात राहत नाही. वय झाले असे समजून अनेकदा या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते.

कारणे काय? 

 काही वेळेला हा आजार आनुवंशिक असण्याची शक्यता वर्तविली जाते.

 वयोमानानुसार हा आजार ६५ वयानंतर होण्यास सुरुवात होते. तर मधुमेह, रक्तदाबाच्या तक्रारीमुळेसुद्धा हा आजार होतो. 

 आधुनिक जीवनशैली त्यासोबत धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून दूर राहून दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून  संतुलित आहार आणि दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. 

या आजाराचा तीन टप्प्यांतून प्रवास...

१) अल्झायमर आजाराचा प्रवास हा विविध टप्प्यांतून होत असतो. सुरुवातीच्या टप्प्यात स्मरणशक्ती कमी होते.

२) एखाद्या कामाचे नियोजन करताना अडचणी निर्माण होतात. तसेच काम करताना मनस्थिती ठीक नसते, तर त्याच्या पुढच्या टप्प्यात दैनंदिन कामाकरिता त्या व्यक्तीला घरातील अन्य सदस्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते.

३) तिसऱ्या टप्प्यात त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे गमावली जाते. त्यांना अन्न गिळण्यासही त्रास होतो. या टप्प्यात रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स