शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तरुण राहायचं की वृद्ध, हे तुमच्याच हातात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 5:48 AM

जैवशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर मध्यम वयानंतर सर्वसाधारणपणे आपल्या कार्यक्षमता घटत जातात. मॉलिक्युलर आणि सेल्युलर डॅमेज यांची प्रक्रिया निरंतर सुरू असते.

आपण म्हातारे होतो म्हणजे आपल्या अनेक क्षमता कमी होत जातात. वय जसजसं वाढत जातं, तसतसं आपल्या क्षमतांमध्ये घट होत जाते. अर्थात याच्या उलट लहानपण आणि तरुणपण. या काळात आपल्या क्षमता वाढत असतात आणि निरंतर त्यात वाढही होत असते. तुमचा आहार, दिनचर्या आणि तुमची आरोग्यशैली, व्यायाम उत्तम असेल, तर या क्षमतेत आणखी वाढ होते; 

 

पण जैवशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर मध्यम वयानंतर सर्वसाधारणपणे आपल्या कार्यक्षमता घटत जातात. मॉलिक्युलर आणि सेल्युलर डॅमेज यांची प्रक्रिया निरंतर सुरू असते. व्यायाम, आनंदी राहणं आणि आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीच्या आधारावर आपल्या शरीराचा जो ऱ्हास होत असतो, तो आपण कमी करू शकतो; पणहा ऱ्हास सुरूच असतो. आपली शारीरिक क्षमता कमी होत असते, मेंदूची क्षमता कमी होत असते, आजारांचा आणि आजारांना बळी पडण्याचा धोका सातत्यानं वाढत असतो आणि आपल्या महत्त्वाच्या क्षमतांचा संक्षेप झाला की कालांतरानं आपला मृत्यू होतो; पण प्रत्येक वेळी हे बदल एकरेषीय आणि सातत्यानं होत असतात असं नाही. 

उदाहरणार्थ, समजा दोन सत्तर वर्षांचे वृद्ध घेतले तर त्या दोघांचीही शारीरिक आणि मानसिक क्षमता एकच असेल असं नाही. एखादा वृद्ध या वयातही एनर्जेटिक, उत्तम आरोग्य आणि तब्येत असलेला, उत्साही, कार्यतत्पर आणि वेगवेगळ्या आव्हानांना सतत सामोरा जाणारा असू शकतो. त्याचवेळी दुसरा वृद्ध मात्र अतिशय गर्भगळीत, आजारी, अनुत्साही, निराश, अगदी सहजपणे उठू-बसू न शकणारा तसंच इतरांच्या मदतीशिवाय काहीही करू न शकणारा असू शकतो. आपल्या आयुष्यात होणारे बदल, निवृत्त होणं, आपलं घर बदलणं, दुसऱ्या शहरात स्थलांतर करणं, ज्यांच्याबरोबर आपण उठलो-बसलो-खेळलो-वाढलो, त्या सोबत्यांचा मृत्यू होणं, आपला जीवनसाथीच आपल्याला सोडून जाणं... यासारख्या गोष्टीही तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात आणि त्यानुसारही वृद्धापकाळातलं आपलं वृद्धत्व आणि ‘तारुण्य’ अवलंबून असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसा प्रतिसाद देता, यावरच तुमचं आनंदी किंवा दु:खी वार्धक्य अवलंबून असतं. त्यामुळे आनंदी आणि ॲक्टिव्ह वृद्धत्वाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, तरुण राहायचं असेल, तर त्यासाठी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद द्यायला आपण शिकलं पाहिजे.