शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Weight loss tips: जेवताना तुम्हीही करत असाल 'या' चूका तर वजन वाढणं नक्की, वेळीच आवरा या सवयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 16:53 IST

आपण आपल्या आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता.

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे तर असते, पण अनेकांना त्यासाठी हार्ड वर्क करायचे नसते. कित्येकांना वजन कमी करायचं असतं पण वर्कआउट्सचा कंटाळा येतो किंवा विविध कारणांनी करता येत नाही. अशा परिस्थितीत वजन कमी करणं हे स्वप्नवत वाटतं. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, जर आपण हार्ड वर्क न करता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ते प्रत्यक्षात शक्य आहे. यासाठी आपण खाण्याच्या सवयी सुधारू शकत असाल तर तुम्ही हे करू शकता. ExactDiteने दिलेल्या माहितीनुसार, आपण आपल्या आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता.

गोडाची लालसा –वास्तविक, जेव्हा आपण काहीतरी गोड खातो तेव्हा आपल्याला छान वाटते आणि आपण ते २ ऐवजी ४ खातो. यामुळे तुमची जेवणाची लालसा वाढते, त्यामुळे तुमच्या कंबरेचा आकारही वाढतो. जर तुम्ही गोड खाण्याची सवय बदलली तर तुमचे वजन आपोआप कमी होईल.

स्ट्रेस ईटिंग –तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्ट्रेस ईटिंगच्या आहारी जातात आणि भूक लागलेली नसतानाही खात राहतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, ताणतणावात हेल्दी फूड्सऐवजी लोक फास्टफूड आणि अस्वास्थ्यकर पदार्थ जसे की आइस्क्रीम, कुकीज, चॉकलेट, चिप्स, फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा खातात. हे पदार्थ वजन वाढवण्याचे काम करतात. हे पदार्थ टाळल्यास आपण वजन झपाट्याने कमी करू शकतो.

निष्काळजीपणे खाणे –अनेकदा कंटाळा येतो आणि मग काही करायचं नसतं, अशावेळी लोकांना खायला आवडते. बरेच लोक विशेषतः टीव्ही पाहताना, फोन कॉल इत्यादींमध्ये निष्काळजीपणे खात राहतात. वास्तविक, आपल्या बेफिकीर खाण्याच्या सवयींमुळे आपले वजन वाढते. आजच या सवयी सोडा.

फास्ट खाणं –काही लोक चावल्या-चघळल्याशिवाय अन्न पटकन गिळतात आणि जेवणाचं काम पटकन फिन्निश झाल्याचं समजतात. वास्तविक, मेंदूला आपले पोट भरले आहे हे समजण्यासाठी 20 मिनिटे लागतात, पण काहीजण 5 मिनिटांत जेवतात, असे केल्याने पुन्हा पुन्हा भूक लागते.

नाश्ता न करणं –बरेच लोक सकाळी लवकर काही खात नाहीत. असं करणं चुकीचं आहे, सकाळी वेळेत खाल्ल्याने आपले चयापचय सुधारते आणि आपली रक्तातील साखर सुरळीत राहते. वजन कमी करण्यासाठीदेखील ते आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स