शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

चिंताजनक! कुटुंबापासून दूर राहणारे तरुण होताहेत उच्च रक्तदाबाचे शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 09:49 IST

अनेक तरुणांना शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मात्र अशा प्रकारे कुटुंबापासून दूर राहणे तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे.

लखनौ -  बदलत्या काळाबरोबर शैक्षणिक आणि व्यावसायिक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मात्र अशा प्रकारे कुटुंबापासून दूर राहणे तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. कुटुंबापासून दूर राहत असलेले अनेक तरुण हायपरटेन्शनची शिकार होत असल्याचे एका अभ्यासामधून समोर आले आहे. अति तणाव आणि खाण्यापिण्याचे बदललेले चक्र यामुळे रक्तदाबाचा ताळमेळ बिघडत असून, त्यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर उच्च रक्तदाबाची (हायपरटेन्शन) शिकार होत आहेत.आतापर्यंत 45 वर्षांपलीकडील व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा त्रास होत होता. मात्र आता 30 वर्षे वयोगटातील तरुणही या आजाराची शिकार होत आहेत.  चिंताजनक बाब म्हणजे हायपरटेन्शनची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे जेव्हा असा रुग्ण तपासणीसाठी दवाखान्यात येतो तेव्हाच त्याला हायपरटेन्शनची बाधा झाल्याचे निदान होते. यासंदर्भात अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियॉलॉजीने हायपरटेन्शनचे मानदंडही कमी केले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. याआधी रक्तदाब हा 140-90 एमएमएचजी असल्यासच हायपरटेन्शनची शिकार मानले जात असे. मात्र आता रक्तदाब 130-80 एमएमएचजी असेल तरीही रुग्णाला हारपरटेन्शनची शिकार मानली जाते.  हायपरटेन्शन दोन प्रकारचे असते. एक इसेंशियल जे वयासोबत होते. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे हायपरटेन्शनची शिकार झालेले असतात. मात्र त्यांना हृदयविकाराचा त्रास का सुरू झालाय. याचे कारण समजत नाही.  तर दुसरे सेकंड्री जे मुलांमध्ये कमी वयात किंवा वृद्धांमध्ये होते. मात्र आता दुसऱ्या प्रकारामधील रुग्ण अधिक प्रमाणात येत आहेत. त्यामुळे जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक असेल तर नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करा. तसेच तुम्हाला किडनी आणि डोकेदुखीचा त्रास असेल तर काही महिन्यांनी नियमितपणे रक्तदाब तपासा, असा सल्ला डॉक्टर देतात.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFamilyपरिवार