शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Women's Day Special : महिलांच्या आरोग्यावर सतत असते 'या' आजारांची टांगती तलवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 10:35 IST

महिला या परिवाराचं केंद्र असतात. पण नेहमीच स्वत: त्या आणि इतरही लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. हे चित्र केवळ भारतातच नाही तर जगभरात बघायला मिळतं.

(Image Credit : www.mydr.com.au)

महिला या परिवाराचं केंद्र असतात. पण नेहमीच स्वत: त्या आणि इतरही लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. हे चित्र केवळ भारतातच नाही तर जगभरात बघायला मिळतं. महिलांच्या आरोग्याला प्राथमिकता न दिलं जाण्याला अनेक कारणे आहेत. यात सामाजिक व्यवस्था, आर्थिक स्वातंत्र्य, माहितीचा अभाव या गोष्टी सांगता येतील. त्यामुळे महिलांना नेहमीच काही आजारांचा सामना करावा लागतो. अशाच काही आजारांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सामना कराव्या लागणाऱ्या आजारांची माहिती घेऊया.

मासिक पाळीसंबंधी समस्या

(Image Credit : Women's Health.gov)

मासिक पाळी स्त्रियांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. याची सुरूवात किशोरावस्थेत होते. यादरम्यान मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि नंतर महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाचा याकडे बघण्याचा संकुचित दृष्टीकोन आणि याबाबतचं अज्ञान यामुळे या वेदना अधिक वाढतात. यामुळे महिलांना अनेक गंभीर आजारांचा आणि इन्फेक्शनचा सामना करावा लागतो. 

प्रेग्नेंसी डिप्रेशन

(Image Credit : Babble)

ही सृष्टी पुढे नेण्याची जबाबदारी सुद्धा स्त्रियांवर आहे, त्यामुळे आई होण्याचा आनंद आणि त्रास दोन्हींचा सामना त्यांना करावा लागतो. प्रेग्नेंसी आणि डिलिव्हरीचा त्रास कदाचित इतका होत नसेल पण त्यानंतर येणारं डिप्रेशन फार त्रासदायक ठरतं. जर परिवाराचा पाठींबा आणि वेळेवर उपचार मिळाले नाही तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

सर्वाइकल कॅन्सर

(Image Credit : HealthyWomen)

सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरवातीला निदान होणे कठिण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. अशा परिस्थितीत उपचारपद्धती अयशस्वी होऊन काही काळातच रुग्ण दगावतो. एका रिसर्चनुसार, जगभरात दरवर्षी ५ लाख या कॅन्सरची प्रकरणे समोर येतात. यात २७ टक्के केवळ भारतातील महिलांचा समावेश आहे. 

ब्रेस्ट कॅन्सर

(Image Credit : Seniority.in)

एनबीटीने एका  सर्व्हेचा हवाला देत माहिती दिली की, भारतात प्रत्येक आठपैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग आहेय तज्ज्ञांनी इशारा दिली आहे की, हा आजार होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वय वाढण्यासोबतच या समस्येचा धोका अधिक वाढतो. यासाठी आनुवांशिक कारण मुख्य मानलं जातं. या आजाराचं योग्यवेळी निदान झालं तर सर्जरी आणि कीमोथेरपीने उपचार शक्य आहे. मात्र जागरूकतेची कमतरता यामुळे महिलांसाठी हा जीवघेणा कॅन्सर आहे. 

मेनॉपॉज

(Image Credit : Verywell Health)

सामान्यपणे ५० वर्ष पार केलेल्या महिलांमध्ये आई होण्याची क्षमता राहत नाही आणि त्यांच्यात मासिक पाळीची प्रक्रिया सुद्धा बंद होते. या स्थितीला मेनॉपॉज म्हणतात. पण ही स्थिती सुरू होण्यापूर्वी आणि नंतर महिलांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. यात अनियमित रक्तस्त्राव, झोप न होणे, चिडचिडपणा, वजन वाढणे, केसगळती यांचा समावेश आहे. वेळेवर योग्य उपाय केले गेले नाही तर महिलांना हृदयासोबतच इतरही गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

व्हिटॅमिन डी ची कमतरता

एका सर्व्हेनुसार, भारतातील ७४ टक्के महिलांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. याचं मुख्य कारण योग्य आहार न घेणे आणि खराब जीवनशैली आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे महिलांना ऑस्टियोपोरोसिस, डायबिटीज, पायांना सूज या समस्यांचा सामना करावा लागतो. 

प्रमाणापेक्षा जास्त तणाव

(Image Credit : KQED)

ही विकसित आणि विकसनशील समाजाची समस्या आहे. जास्तीत जास्त महिला घरात आणि बाहेर दोन्हीकडे काम करतात. घरातील काम केवळ त्यांचीच जबाबदारी मानली जाते. बाहेरचं काम इतरांच्या दबावामुळे त्यांना करावं लागतं. यामुळे त्यांना डिप्रेशन, एंग्जायटी, डायबिटीजसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनHealth Tipsहेल्थ टिप्सWomenमहिला