शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:12 IST

उतारवयात म्हणजे वयाच्या साठीनंतर होणारे हृदयाचे विकार सध्या ३० ते ४० वयोगटांतील तरुणांना जडलेले दिसत आहेत. त्यामुळे हृदयविकार तज्ज्ञांनी ३० ते ३५ वयात हृदयाची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : ‘कांटा लगा’फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन प्रथम दर्शनी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तरुण वयातील हृदयविकाराचा मुद्दा  पुन्हा चर्चेत आला आहे. उतारवयात म्हणजे वयाच्या साठीनंतर होणारे हृदयाचे विकार सध्या ३० ते ४० वयोगटांतील तरुणांना जडलेले दिसत आहेत. त्यामुळे हृदयविकार तज्ज्ञांनी ३० ते ३५ वयात हृदयाची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आधुनिक जीवनशैलीमुळे तरुणांच्या खाण्या-पाण्यापासूनच्या सर्वच सवयी बदलल्या आहेत. दररोज रात्री उशिरापर्यंत जागरण, झोप पूर्ण न होणे,  कौटुंबिक आणि व्यावसायिक ताणतणाव ही काही प्रमुख कारणे हृदयाच्या आरोग्याला बाधा पोहोचवत आहेत, असे हृदयरोग तज्ज्ञ सांगत आहेत.

अनेक वर्षांपासून मुंबईत होणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयरोग ‘नंबर वन’वर आहे. अनेक हृदयविकार तज्ज्ञांच्या ओपीडीमध्ये तरुण रुग्ण उपचारासाठी येताना दिसत आहेत.

हृदय रोगाची लक्षणे

छातीत कळ आल्यास ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करू नका.

छातीत दुखणे.

श्वास घेण्यास त्रास होणे.

थोडा वेळ चालले, तरी दम लागणे, घाम येणे.

हृदयाचे ठोके वाढणे.

उपाय असे...

हृदयरोगाला प्रतिबंध करणे प्रत्येकाच्या हातात आहे. धूम्रपान, अवेळी जेवण, विशेषत: प्रक्रिया केलेले पदार्थ, जंकफूड, तेलकट आणि फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे ‘ट्रायग्लिसराइड्स’ची पातळी वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो. चांगल्या आहाराने हे टाळणे  शक्य आहे. आठवड्याला १५० मिनिटे चालले पाहिजे. ज्यांना व्यायाम करायला जमत नाही त्यांनी योगासने करावीत.

व्हिसेरा केला जतन

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेला होता. तेथे व्हिसेरा जतन करून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

औषधांचा परिणाम?

जरीवाला हिच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूबाबत दिवसभरात विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यात वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणून ती अँटी एजिंगची (लवकर वृद्धत्व येऊ नये) औषधे घेत असल्याचे सांगण्यात येत होते. त्याचा परिणाम झाला असण्याची शक्यता असावी, अशी जोरदार चर्चा होती. मात्र याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

आमच्या ओपीडीमध्ये दिवसाला हृदयविकाराच्या तक्रारीचे दोन ते तीन तरुण येतात. अनेक जणांना अँजिओग्राफीनंतर अँजिओप्लास्टीची गरज असल्याचे दिसून आले आहे. तर, काहींची थेट बायपास शस्त्रक्रिया करावी लागत आहे. त्यामुळे ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांनी हृदय तपासणी करून घ्यावी. अनेक तरुण शरीरयष्टी आकर्षक राहावी म्हणून वैद्यकीय सल्ल्याशिवाय अतिरिक्त प्रमाणात  प्रोटीन, कॅल्शियम, सप्लिमेंट्स घेता. त्यामुळे देखील हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

डॉ. अजय चौरासिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य