शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

'या' वयात आई होणं आवश्यक, नाहीतर...; आई-बाबा होण्याचे योग्य वय कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 07:47 IST

अंबाजोगाई : शिक्षण आणि करिअर या दोन्हींमध्ये स्पर्धेच्या युगात आता लग्न उशिरा करणाऱ्या मुलामुलींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ...

अंबाजोगाई : शिक्षण आणि करिअर या दोन्हींमध्ये स्पर्धेच्या युगात आता लग्न उशिरा करणाऱ्या मुलामुलींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपोआपच त्यांच्याकडून मुलं होऊ देण्याचे वय देखील वाढत जाते. यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचा सामनाही भविष्यात त्या दोघांना करावा लागतो. या समस्यांचा सामना टाळण्यासाठी मुला-मुलींचे लग्न अगदी योग्य वयात होऊन आई-बाबा होण्यासाठी जन्माला येणारी मुलेही त्यांच्या वयाच्या २२ ते ३५ वर्षांच्या दरम्यानच जन्माला आली पाहिजेत, असे डॉक्टर्स सांगतात.

२५-२६ पासून सुरू होतो लग्नाचा विचार

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ही आपल्या शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर पदवी, पदव्युत्तर किंवा इतर विविध विभागातील कोर्सेसच्या शिक्षणाकडे वळून ते एखादी कायमस्वरूपी किंवा खासगी नोकरी मिळविण्यासाठी वयातील २५ ते २६ वर्षे खर्च करतात. यादरम्यान त्यांना फक्त शिक्षणाची व नोकरीचीच ओढ लागलेली असते. त्यामुळे ते लग्नाचे वय विसरून जातात. या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर ते आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात.

आधी करियर मग मूल

सध्या प्रत्येक गोष्टीत स्पर्धा वाढली आहे. दोघेही पती-पत्नी नोकरी करतात. आजच्या पिढीला गाडी, बंगला, सर्व भौतिक सुविधा तत्काळ आवश्यक आहेत. या सर्व सोयी, सुविधा उपलब्ध झाल्यास मुलांचा विचार ही नवी जीवन पद्धती अस्तित्वात येत आहे.

आई होण्यासाठी २२ ते ३२ वय योग्य

मुलींचे लग्न हे वयाच्या अठराव्या वर्षी केले तरी चालते. त्यानंतर मात्र तिचे आई होण्याचे वय हे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते २२ ते जास्तीत जास्त ३२ इतके असते. यादरम्यान तिने आई होणे आवश्यक असते. नाही तर इतर महाभयंकर समस्यांना तिला सामोरे जावे लागते.

बाबा होण्यासाठी २२ ते ३५ योग्य वय

मुलांचे लग्नाचे वय हे २१ वर्षे असून ते त्याच्यासाठी योग्य असते. त्यालाही बाबा होण्यासाठी २२ ते ३५ वय वर्षांपर्यंत उत्कृष्ट असते. त्यानंतर होणाऱ्या मुलांना अपंगत्वाचा धोका निर्माण होतो. ते पालकांसाठी योग्य नसते व परवडणारे नसते.

वय वाढले तर?

शिक्षण, करिअर इतर व कोणत्याही कारणाने लग्न उशिरा होऊन आई-वडील होण्याचेही स्वप्नही उशिरा झालेच तर याचा मोठा फटका बसतो. त्यांना सिझरिंग, रक्तस्राव, अनुवंशिक रोगाचा सामना, बाळाला अपंगत्व, बाळ मतिमंद होण्याचा धोका, ब्लड प्रेशर वाढणे, साखर वाढणे, बाळ पोटात दगावणे, गर्भपात होणे, जन्माला येणाऱ्या मुलाचे वय कमी असणे यासह तिच्या मानसिक, शारीरिक घटकांवर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. याचबरोबर संबंधित मुलांना देखील अशा प्रकारच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

डॉक्टर काय म्हणतात?

मुला-मुलींनी योग्य वयातच लग्न करावे. अन्यथा अनेक समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागते. लग्न उशिरा होऊन मुलांना उशिरा जन्म दिल्यास त्याचा फटका हा दोघांनाही बसतो. सर्व बाबी उशिराने झाल्यास त्या मुलांनाही अनेक समस्यांचा सामना कायम करावा लागतो. -डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, मेडिसिन विभागप्रमुख, अंबाजोगाई.

मुलींचे लग्न उशिराने होऊन बाळही उशिरा झाले तर तिला रक्तस्राव, रक्तदाब, सिझर, बाळाला अपंगत्व अशा अनेक गोष्टींचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मुला-मुलींचे लग्न हे योग्य वयातच होणारे आवश्यक आहे. -डॉ. ज्योती डावळे, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, अंबाजोगाई.