शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

'या' वयात आई होणं आवश्यक, नाहीतर...; आई-बाबा होण्याचे योग्य वय कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 07:47 IST

अंबाजोगाई : शिक्षण आणि करिअर या दोन्हींमध्ये स्पर्धेच्या युगात आता लग्न उशिरा करणाऱ्या मुलामुलींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ...

अंबाजोगाई : शिक्षण आणि करिअर या दोन्हींमध्ये स्पर्धेच्या युगात आता लग्न उशिरा करणाऱ्या मुलामुलींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपोआपच त्यांच्याकडून मुलं होऊ देण्याचे वय देखील वाढत जाते. यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचा सामनाही भविष्यात त्या दोघांना करावा लागतो. या समस्यांचा सामना टाळण्यासाठी मुला-मुलींचे लग्न अगदी योग्य वयात होऊन आई-बाबा होण्यासाठी जन्माला येणारी मुलेही त्यांच्या वयाच्या २२ ते ३५ वर्षांच्या दरम्यानच जन्माला आली पाहिजेत, असे डॉक्टर्स सांगतात.

२५-२६ पासून सुरू होतो लग्नाचा विचार

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ही आपल्या शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर पदवी, पदव्युत्तर किंवा इतर विविध विभागातील कोर्सेसच्या शिक्षणाकडे वळून ते एखादी कायमस्वरूपी किंवा खासगी नोकरी मिळविण्यासाठी वयातील २५ ते २६ वर्षे खर्च करतात. यादरम्यान त्यांना फक्त शिक्षणाची व नोकरीचीच ओढ लागलेली असते. त्यामुळे ते लग्नाचे वय विसरून जातात. या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर ते आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात.

आधी करियर मग मूल

सध्या प्रत्येक गोष्टीत स्पर्धा वाढली आहे. दोघेही पती-पत्नी नोकरी करतात. आजच्या पिढीला गाडी, बंगला, सर्व भौतिक सुविधा तत्काळ आवश्यक आहेत. या सर्व सोयी, सुविधा उपलब्ध झाल्यास मुलांचा विचार ही नवी जीवन पद्धती अस्तित्वात येत आहे.

आई होण्यासाठी २२ ते ३२ वय योग्य

मुलींचे लग्न हे वयाच्या अठराव्या वर्षी केले तरी चालते. त्यानंतर मात्र तिचे आई होण्याचे वय हे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते २२ ते जास्तीत जास्त ३२ इतके असते. यादरम्यान तिने आई होणे आवश्यक असते. नाही तर इतर महाभयंकर समस्यांना तिला सामोरे जावे लागते.

बाबा होण्यासाठी २२ ते ३५ योग्य वय

मुलांचे लग्नाचे वय हे २१ वर्षे असून ते त्याच्यासाठी योग्य असते. त्यालाही बाबा होण्यासाठी २२ ते ३५ वय वर्षांपर्यंत उत्कृष्ट असते. त्यानंतर होणाऱ्या मुलांना अपंगत्वाचा धोका निर्माण होतो. ते पालकांसाठी योग्य नसते व परवडणारे नसते.

वय वाढले तर?

शिक्षण, करिअर इतर व कोणत्याही कारणाने लग्न उशिरा होऊन आई-वडील होण्याचेही स्वप्नही उशिरा झालेच तर याचा मोठा फटका बसतो. त्यांना सिझरिंग, रक्तस्राव, अनुवंशिक रोगाचा सामना, बाळाला अपंगत्व, बाळ मतिमंद होण्याचा धोका, ब्लड प्रेशर वाढणे, साखर वाढणे, बाळ पोटात दगावणे, गर्भपात होणे, जन्माला येणाऱ्या मुलाचे वय कमी असणे यासह तिच्या मानसिक, शारीरिक घटकांवर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. याचबरोबर संबंधित मुलांना देखील अशा प्रकारच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

डॉक्टर काय म्हणतात?

मुला-मुलींनी योग्य वयातच लग्न करावे. अन्यथा अनेक समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागते. लग्न उशिरा होऊन मुलांना उशिरा जन्म दिल्यास त्याचा फटका हा दोघांनाही बसतो. सर्व बाबी उशिराने झाल्यास त्या मुलांनाही अनेक समस्यांचा सामना कायम करावा लागतो. -डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, मेडिसिन विभागप्रमुख, अंबाजोगाई.

मुलींचे लग्न उशिराने होऊन बाळही उशिरा झाले तर तिला रक्तस्राव, रक्तदाब, सिझर, बाळाला अपंगत्व अशा अनेक गोष्टींचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मुला-मुलींचे लग्न हे योग्य वयातच होणारे आवश्यक आहे. -डॉ. ज्योती डावळे, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, अंबाजोगाई.