शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद डॉक्टरांनुसार भात शिजवण्याची योग्य पद्धत, कितीही खाल्ला तरी वाढणार नाही वजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 09:35 IST

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, भात शिजवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असेल तर भात खाऊनही तुमचं वजन वाढणार नाही.

अलिकडे चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लोक वजन खूप जास्त वाढत असलेल्या समस्येने हैराण आहेत. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. कुणी एक्सरसाइज, योगा करतात तर कुणी एक वेळचं जेवण बंद करतात. तसेच काही लोक भात खाणंही बंद करतात. कारण त्यांचा असा समज होतो की, भात खाल्ल्याने त्यांचं वजन आणखी वाढतं. पण खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? अशात आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, भात शिजवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असेल तर भात खाऊनही तुमचं वजन वाढणार नाही.

वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक उपाय सांगणारे डॉक्टर शिंदे यांनी भाज शिजवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी सांगितलं की, या पद्धतीने जर तुम्ही भात शिजवला आणि तो खाल्ला तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही. 

भात शिजवण्याची योग्य पद्धत

डॉक्टर विलास शिंदे म्हणाले की, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करायचा नाही. पातेल्यात भात शिजवा. आधी प्रेशर कुकर नव्हते. लोक पातेल्यात भात शिजवत होते. भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो काढून टाका. भात शिजवत असताना तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.

साऊथमधील लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?

काही दिवसांआधी एका एक्सपर्टनी सांगितलं की, साऊथमधील लोक भरपूर भात खातात तरीही त्यांना काही होत नाही किंवा ते लठ्ठही होत नाहीत. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य