शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी झाल्यानंतर शरीरावर काय होतात परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 15:05 IST

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत करत असतात. वजन कमी केल्यानंतर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करणं शक्य होतं.

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत करत असतात. वजन कमी केल्यानंतर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करणं शक्य होतं. त्याचबरोबर याचा आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणामही दिसून येतो. तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएट प्लान फॉलो करता त्यावेळी आपलं वजन जवळपास 4 ते 5 किलो कमी होतं. पण कधी विचार केलाय का? याचा शरीरावर कसा परिणाम होतो. वजन कमी केल्यानंतर शरीराची कोलेस्ट्रॉल लेव्हल, ब्लड प्रेशर कमी राहते. 

वजन वाढल्यानंतर उद्भवलेल्या सर्व समस्या दूर होतात. शरीरावरील अतिरिक्त वजन कमी झाल्यानंतर तुमच्या लूकसोबतच आरोग्यही हेल्दी राहतं. जाणून घ्या यामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात...? 

झोपेच्या समस्या होतात दूर... 

जेव्हा वजन जास्त वाढतं त्यावेळी झोपल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरामध्ये असलेल्या फॅट्समुळे श्वास घेताना समस्यांचा सामना करावा लागतो. 4 ते 5 किलो वजन कमी झाल्यानंतर तुम्ही पहिल्यापेक्षा उत्तम आणि शांत झोप घेऊ शकता. शरीरातील कार्टिसोल हार्मोन्स कमी होतात. ज्यामुळे अजिबात तणाव राहत नाही. तुमच्यामध्ये गोड पदार्थ खाण्याची सतत होणारी इच्छा म्हणजेच, क्रेविंगही कमी होते. परिणामी शांत झोप लागते. 

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी... 

जेव्हा तुम्ही अनेक महिने वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असता आणि 4 ते 5 किलो वजन कमी करता. त्यावेळी मानसिकरित्या आनंद आणि शांतता जाणवते. यामुळे तुम्ही मोटिवेटेड होतात. तणाव कमी होतो. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढतो. या सर्व गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 

हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 

वजन कमी केल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. शरीरामध्ये फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. ज्यामुळे तुम्ही हृदयरोगांपासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच वजन कमी केल्यानंतर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. 

डायबिटीसपासून बचाव होतो

ज्या लोकांचं वजन जास्त असतं. त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता अधिक असते. ब्लड शुगर लेव्हलही वाढते. जेव्हा तुमचं वजन 4 ते 5 किलो कमी असतं. तेव्हा ब्लड शुगर लेव्हल कमी होतं. तसेच इन्सुलिन लेव्हलही नियंत्रणात राहतं. 

आर्थरायटिसपासून बचाव

जेव्हा तुमच्या शरीराचं वजन अधिक असतं. तेव्हा हाडं आणि शरीराच्या सांध्यांवर जास्त प्रेशर येतं. जसं शरीराचं वजन कमी होतं. त्यावेळी सांध्यांवरील दबाव कमी होतो. वजन कमी झाल्यामुळे सांध्यांच्या समस्याही दूर होतात. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स