शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

वजन कमी झाल्यानंतर शरीरावर काय होतात परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 15:05 IST

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत करत असतात. वजन कमी केल्यानंतर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करणं शक्य होतं.

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत करत असतात. वजन कमी केल्यानंतर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करणं शक्य होतं. त्याचबरोबर याचा आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणामही दिसून येतो. तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएट प्लान फॉलो करता त्यावेळी आपलं वजन जवळपास 4 ते 5 किलो कमी होतं. पण कधी विचार केलाय का? याचा शरीरावर कसा परिणाम होतो. वजन कमी केल्यानंतर शरीराची कोलेस्ट्रॉल लेव्हल, ब्लड प्रेशर कमी राहते. 

वजन वाढल्यानंतर उद्भवलेल्या सर्व समस्या दूर होतात. शरीरावरील अतिरिक्त वजन कमी झाल्यानंतर तुमच्या लूकसोबतच आरोग्यही हेल्दी राहतं. जाणून घ्या यामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात...? 

झोपेच्या समस्या होतात दूर... 

जेव्हा वजन जास्त वाढतं त्यावेळी झोपल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरामध्ये असलेल्या फॅट्समुळे श्वास घेताना समस्यांचा सामना करावा लागतो. 4 ते 5 किलो वजन कमी झाल्यानंतर तुम्ही पहिल्यापेक्षा उत्तम आणि शांत झोप घेऊ शकता. शरीरातील कार्टिसोल हार्मोन्स कमी होतात. ज्यामुळे अजिबात तणाव राहत नाही. तुमच्यामध्ये गोड पदार्थ खाण्याची सतत होणारी इच्छा म्हणजेच, क्रेविंगही कमी होते. परिणामी शांत झोप लागते. 

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी... 

जेव्हा तुम्ही अनेक महिने वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असता आणि 4 ते 5 किलो वजन कमी करता. त्यावेळी मानसिकरित्या आनंद आणि शांतता जाणवते. यामुळे तुम्ही मोटिवेटेड होतात. तणाव कमी होतो. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढतो. या सर्व गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 

हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 

वजन कमी केल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. शरीरामध्ये फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. ज्यामुळे तुम्ही हृदयरोगांपासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच वजन कमी केल्यानंतर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. 

डायबिटीसपासून बचाव होतो

ज्या लोकांचं वजन जास्त असतं. त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता अधिक असते. ब्लड शुगर लेव्हलही वाढते. जेव्हा तुमचं वजन 4 ते 5 किलो कमी असतं. तेव्हा ब्लड शुगर लेव्हल कमी होतं. तसेच इन्सुलिन लेव्हलही नियंत्रणात राहतं. 

आर्थरायटिसपासून बचाव

जेव्हा तुमच्या शरीराचं वजन अधिक असतं. तेव्हा हाडं आणि शरीराच्या सांध्यांवर जास्त प्रेशर येतं. जसं शरीराचं वजन कमी होतं. त्यावेळी सांध्यांवरील दबाव कमी होतो. वजन कमी झाल्यामुळे सांध्यांच्या समस्याही दूर होतात. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स