शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

वजन कमी झाल्यानंतर शरीरावर काय होतात परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 15:05 IST

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत करत असतात. वजन कमी केल्यानंतर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करणं शक्य होतं.

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत करत असतात. वजन कमी केल्यानंतर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करणं शक्य होतं. त्याचबरोबर याचा आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणामही दिसून येतो. तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएट प्लान फॉलो करता त्यावेळी आपलं वजन जवळपास 4 ते 5 किलो कमी होतं. पण कधी विचार केलाय का? याचा शरीरावर कसा परिणाम होतो. वजन कमी केल्यानंतर शरीराची कोलेस्ट्रॉल लेव्हल, ब्लड प्रेशर कमी राहते. 

वजन वाढल्यानंतर उद्भवलेल्या सर्व समस्या दूर होतात. शरीरावरील अतिरिक्त वजन कमी झाल्यानंतर तुमच्या लूकसोबतच आरोग्यही हेल्दी राहतं. जाणून घ्या यामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात...? 

झोपेच्या समस्या होतात दूर... 

जेव्हा वजन जास्त वाढतं त्यावेळी झोपल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरामध्ये असलेल्या फॅट्समुळे श्वास घेताना समस्यांचा सामना करावा लागतो. 4 ते 5 किलो वजन कमी झाल्यानंतर तुम्ही पहिल्यापेक्षा उत्तम आणि शांत झोप घेऊ शकता. शरीरातील कार्टिसोल हार्मोन्स कमी होतात. ज्यामुळे अजिबात तणाव राहत नाही. तुमच्यामध्ये गोड पदार्थ खाण्याची सतत होणारी इच्छा म्हणजेच, क्रेविंगही कमी होते. परिणामी शांत झोप लागते. 

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी... 

जेव्हा तुम्ही अनेक महिने वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असता आणि 4 ते 5 किलो वजन कमी करता. त्यावेळी मानसिकरित्या आनंद आणि शांतता जाणवते. यामुळे तुम्ही मोटिवेटेड होतात. तणाव कमी होतो. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढतो. या सर्व गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 

हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 

वजन कमी केल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. शरीरामध्ये फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. ज्यामुळे तुम्ही हृदयरोगांपासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच वजन कमी केल्यानंतर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. 

डायबिटीसपासून बचाव होतो

ज्या लोकांचं वजन जास्त असतं. त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता अधिक असते. ब्लड शुगर लेव्हलही वाढते. जेव्हा तुमचं वजन 4 ते 5 किलो कमी असतं. तेव्हा ब्लड शुगर लेव्हल कमी होतं. तसेच इन्सुलिन लेव्हलही नियंत्रणात राहतं. 

आर्थरायटिसपासून बचाव

जेव्हा तुमच्या शरीराचं वजन अधिक असतं. तेव्हा हाडं आणि शरीराच्या सांध्यांवर जास्त प्रेशर येतं. जसं शरीराचं वजन कमी होतं. त्यावेळी सांध्यांवरील दबाव कमी होतो. वजन कमी झाल्यामुळे सांध्यांच्या समस्याही दूर होतात. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स