शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालणं गरजेचं? अजिबात करू नका या चुका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 14:28 IST

Weight Loss Tips : अनेकजण वजन कमी करण्याचा विषय निघाला की, सर्वातआधी जिम जॉईन करण्याचा विचार करतात. पण तिथे वेळी देऊन घाम गाळण्यासाठी इच्छाशक्ती फार चांगली असणे गरजेचे आहे.

Weight Loss Tips :  वजन कमी करणे ही सध्या जभरातील अनेकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली आहे. मात्र अनेकजण वजन कमी करण्यासाठी आवश्यक गोष्टींची सुरूवात तर मोठ्या जोशाने करतात, पण नंतर त्यांचा इंटरेस्ट कमी होतो. आणि पुन्हा परिस्थिती जैसे थी होते. इतकं नक्की की, वजन कमी करण्यासाठी अपार इच्छाशक्ती आणि भरपूर मेहनत लागते. 

अनेकजण वजन कमी करण्याचा विषय निघाला की, सर्वातआधी जिम जॉईन करण्याचा विचार करतात. पण तिथे वेळी देऊन घाम गाळण्यासाठी इच्छाशक्ती फार चांगली असणे गरजेचे आहे. मात्र असं नाही की, जिमला गेले नाही तर वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी आणखीही अनेक पर्याय आहेत. त्यातील सर्वात जास्त फॉलो केला जाणारा आणि सोपा पर्याय म्हणजे वॉकिंग म्हणजेच पायी चालणे. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, वजन कमी करण्यासाठी पायी चालणे फार महत्त्वाचे आहे. सोबतच याने हृदयासंबंधी आजारांचाही धोका कमी होतो.

चालणे आणि वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी पायी चालणे हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागत नाहीत. तसेच याला वेळीची कोणतीही बंधने नाहीत. तुम्ही सकाळी, दुपारच्या जेवणानंतर आणि डिनरनंतरही चालू शकता. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी म्हणून किती पावले चालावी? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

किती पायी चालावं?

तुम्ही जर नुकतंच वजन कमी करण्यासाठी पायी चालणे सुरू केले असेल तर तुम्ही तुमचं स्वत:चं एक लक्ष्य ठरवा. सुरूवातीला तुम्ही दररजो १० हजार पावले चालू शकता. एकदा तुम्हाला इतकं चालण्याची सवय झाली की, मग तुम्ही हे वाढवा. नंतर तुम्ही १२ हजार, १५ हजार पावले चालू शकता. 

पायी चालण्यासाठी काही टिप्स

जर तुम्ही दिवसभर डेस्क जॉबमध्ये व्यस्त राहत असाल तर तुमच्यासाठी वजन कमी करणे फारच मोठं आव्हान आहे. त्यामुळे कामाच्या अधेमधे छोटे ब्रेक घ्या आणि चालत रहा. तुम्ही लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर कराल तर तुम्हाला चालण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज पडणार नाही. ऑफिस जवळ असेल तर गाडीने जाण्याऐवजी चालत गेले तर तेवढाच फायदा तुमचा. 

वयानुसार कुणी किती पावले चालावी?

एका रिसर्चनुसार, ६ ते १७ वयोगटातील मुलांनी दररोज १५ हजार पावले चालावीत. तर या वयोगटातील मुलींनी १२ हजार पावले चालावीत. तर १८ ते ४० वयोगटातील महिला आणि पुरूषांनी १२ हजार पावले चालावे. ४० ते ५० वयोगटातील महिलांनी दररोज ११ हजार पावले चालले पाहिजे. तर ५० पेक्षा जास्त वय असलेल्या पुरूषांनी ११ हजार पावले चालावीत.   

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य