शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ शिजवण्याची 'ही' पद्धत तुमच्या वजनावर ठेवेल कंट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 11:24 IST

अनेकांचा असा समज असतो की, भात अधिक खाल्लाने वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढलेले लोक किंवा वजन वाढण्याची भिती असणारे लोक भातापासून दोन हात दूरच राहणे पसंत करतात.

(Image Credit : www.olgasflavorfactory.com)

अनेकांचा असा समज असतो की, भात अधिक खाल्लाने वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढलेले लोक किंवा वजन वाढण्याची भिती असणारे लोक भातापासून दोन हात दूरच राहणे पसंत करतात. पण मुळात असं नाहीये. योग्य पद्धतीने भात शिजवला तर भाताने वजन वाढत नाही. तज्ज्ञांनुसार, भातामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी असतात. ज्यामुळे वजन वाढतं. भात हा भारतात आवडीने खाल्ला जाणार पदार्थ आहे. पण अनेकजण यापासून दूर राहतात. जगभरात तांदळाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे हे दिसून येतं की, जगभरातील लोक भाताचे दिवाने आहेत. पण जर तुम्हाला वजनही कमी करायचंय आणि भातही खायचाय, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास पद्धत सांगणार आहोत. 

अशा कमी करा भातातील कॅलरी

प्रश्न हा आहे की, कशाप्रकारे तांदूळ शिजवल्यावर त्यातील कॅलरी कमी केल्या जातील? अभ्यासकांनुसार, यासाठी कोणत्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरीच हे काम करू शकता. त्यासाठी अर्धी वाटी पांढरे तांदूळ घ्या, त्यात एक चमचा खोबऱ्याचं तेल टाका. त्यानंतर हे उकडलेल्या पाण्यात टाका. नंतर उकडलेल्या पाण्यात हे तांदूळ ४० मिनिटे शिजवा. तांदूळ शिजल्यावर भात १२ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर तुम्ही हा भात थंड किंवा हलका गरम करून खाऊ शकता. 

(Image Credit : themom100.com)

कशा कमी झाल्या कॅलरी?

वर सांगितल्या प्रमाणे तांदूळ शिजवल्यास भातातील कॅलरी कमी होतात. तज्ज्ञ सांगतात की, अशाप्रकारे तांदूळ शिजवून जेव्हा थंड केले जातात तेव्हा यातील ग्लूकोज मोलिक्यूल्स टाइट बॉंड्स तयार करतात. यालाच रेसिस्टेंट स्टार्च म्हटले जाते. म्हणजे अशाप्रकारे तांदूळ शिजवल्याने आपली पचन संस्था याला पूर्णपणे शोषूण घेत नाही, म्हणजे सर्वच कॅलरी ग्रहण होत नाहीत. म्हणजे एकंदर काय होतं की, यात असलेल्या तत्त्वांचा स्विकार आपलं शरीर करत नाही. अशाप्रकारे हा भात आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

(Image Credit : foodal.com)

खोबऱ्याच्या तेलाची भूमिका

अशाप्रकारे शिजवण्यात आलेल्या तांदूळामध्ये खोबऱ्याच्या तेलाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. खरंतर खोबऱ्याच्या तेलामध्ये मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिड असतं. हे इतर फॅटी पदार्थांच्या तुलनेत चांगलं असतं. 

किती फायदेशीर?

तांदूळ शिजवण्याची ही पद्धत सामान्य पद्धतीपेक्षा १० पटीने चांगली आणि फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या पद्धतीने तुमच्या शरीरातील ६० टक्के कॅलरी कमी होतात. अभ्यासकांच्या टीमने सांगितले की, हा शिजवलेला भात पुन्हा गरम केला तरी सुद्धा यात कॅलरीची संख्या वाढत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार