शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

वजन कमी करायचं असेल तर पाणी पिण्याची 'ही' खास पद्धत वापरा, तरच होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 10:17 IST

एका रिसर्चनुसार, जर तुम्ही रोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते.

(Image Credit : express.co.uk)

एका रिसर्चनुसार, जर तुम्ही रोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते. १२०० लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये भरपूर पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये ३ महिन्यात ४४ टक्के वजन कमी आढळलं. पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतात, जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतं. तसेच पाण्यामुळे शरीरात चरबी सुद्धा एकत्र राहत नाही. चला जाणून घेऊ पाण्याने वजन कमी कसं होतं.

पाण्याने वजन कमी कसं होतं?

भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होते. सोबतच याने शरीरात चरबी जमा होत नाही. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणं महत्वाचं ठरतं. जर तुम्ही पाणी कमी प्याल तर पचनासंबंधी समस्या होतात आणि आरोग्यही बिघडतं. पाणी दोनप्रकारे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतं. एक म्हणजे पाणी शरीराला बर्न करणारी ऊर्जा किंवा कॅलरीचं प्रमाण वाढवतं. दुसरं म्हणजे पाणी पित राहिल्याने भूक कमी लागते किंवा सतत खाण्याची सवय कमी होते. पाणी कमी प्यायल्याने फॅट बर्न करण्याची क्षमता कमी होते.

जेवणाआधी प्यावं पाणी

जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्ही जेवण हवं तेवढंच कराल, ओव्हरइटिंग करणार नाही. यानेही वजन कमी करण्यास मदत मिळते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, रोज दोन लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यावं.  पण रिसर्चनुसार, काही लोकांसाठी हे पाणी पिण्याचं प्रमाण ५ लिटर असू शकतं. 

लिपोलिसिस आणि थर्मोजेनेसिसला वाढवतं पाणी

(Image Credit : health.harvard.edu)

पाणी लिपोलिसिसच्या प्रोसेसचा वेग वाढवतं. लिपोलिसिस एक चयापचन प्रक्रिया आहे. ज्याच्या माध्यमातून लिपिड ट्रायग्लिसराइड्सला ग्लिसरॉल आणि फॅटी अॅसिड हायड्रोलाइज केलं जातं. बीएमआय हे व्यक्तीतील कमी वजन, जास्त वजन आणि लठ्ठपणा या स्थितीबाबत ठरवतं. पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतं. थर्मोजेनेसिस एक अशी प्रोसेस आहे, ज्याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते.

पाणी कमी कॅलरी डाएटमध्ये 

पाणी नैसर्गिक रूपाने कॅलरी मुक्त असतं. त्यामुळे सामान्यपणे कमी कॅलरी डाएटमध्ये याचा समावेश केला जातो. जेवणाआधी पाणी प्यायल्याने मध्यम वयातील आणि वृद्ध व्यक्तींना भूक कमी लागते. याचाच परिणाम म्हणजे कॅलरीचं प्रमाण कमी होतं आणि वजनही कमी होतं. रोज जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि १२ आठवड्यात २ किलो वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे वजन कमी करणार असाल तर जेवण करण्याच्या २० ते ३० मिनिटांआधी पाणी प्यावे. नाश्त्याआधी पाण्याचं सेवन केल्याने कॅलरी १३ टक्के कमी होतात.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

आयुर्वेदानुसार, पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून पाणी पिणे. जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जाईल. उभे पाहून पाणी प्यायल्याने शरीराला योग्य प्रमाणात पोषत तत्व मिळत नाहीत. सोबतच पाणी एकदाच घाईने पिण्याऐवजी एक एक घोट घेऊन आणि हळूहळू प्यावं. याचं कारण जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स