शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'हे' गंभीर नुकसान वाचाल तर पुन्हा कधीच उभे राहून पिणार नाही पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 10:35 IST

Water Drinking Tips : बरेच लोक उभं राहून गटा गटा पाणी पितात. पण असं करणं खरंच योग्य असतं का? हे किती नुकसानकारक आहे हे अनेकांना माहीत नसतं. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Water Drinking Tips : पाणी पिणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहीत आहेच. सगळेच लोक रोज पाणी पिपात. पण पाणी पिण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते. पाणी योग्य पद्धतीने प्यायले नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. बरेच लोक उभं राहून गटा गटा पाणी पितात. पण असं करणं खरंच योग्य असतं का? हे किती नुकसानकारक आहे हे अनेकांना माहीत नसतं. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उभं राहून पाणी प्यायल्याने इसोफेगसवर दबाव पडतो, पाणी वेगाने पोटात आणि मग ओटी पोटात पोहोचतं. यामुळे आपल्या पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. आयुर्वेदातही उभं राहून पाणी पिण्याला नुकसानकारक सांगितलं आहे. डॉक्टरही नेहमीच बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.

बसून पाणी पिण्याचे फायदे!

पाणी पिण्यासाठी बसण्याची पोजिशन सर्वात योग्य आहे. अशाप्रकारे पाणी प्यायलात तर पचन योग्यप्रकारे होतं. जेव्हा कुणी बसून पाणी पितं तेव्हा ते आपल्या शरीरातील कोशिकांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचतं. पाणी कोशिकांपर्यंत पोहोचून टॉक्सिन शरीरातून बाहेर काढतं. तसेच पाण्याचं अवशोषण चांगल्याप्रकारे झालं तर रक्तही साफ होतं. शरीर फीट राहतं.

किडनीची समस्या

उभं राहून पाणी पिणं आपल्या किडनीसाठी नुकसानकारक आहे. कारण उभं राहून पाणी पिलात तर ते ब्लड सेल्सपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचत नाही आणि रक्तात विषारी पदार्थ वाढतात. किडनी रक्तातील विषारी आणि अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यासाठी लघवी तयार करते. जास्त अशुद्धी असल्याने किडनीचं काम वाढतं. त्यामुळे किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.

पचनक्रिया प्रभावित होते

उभं राहून पाणी प्यायल्याने डायजेशन सिस्टीमला नुकसान पोहोचतं. याने ग्रासनळीत समस्या होऊ शकते. अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या होऊ शकते. बसून पाणी प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम मजबूत राहते. याने पचनासंबंधी समस्या होत नाहीत.

श्वसनावर वाईट परिणाम

उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या अन्ननलिकेवर परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या श्वासनलिकेत ऑक्सिजन योग्यप्रकारे पोहोचू शकत नाही. त्यामुळे श्वसन तंत्र आणि फुप्फुसांवर वाईट प्रभाव पडतो. याने हार्ट प्रॉब्लेम होण्याचीही शक्यता असते.

संधीवाताची समस्या

उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्याचं प्रेशर पोटाच्याही खाली जाऊन थांबतं. ज्यामुळे हाडं आणि जॉइंट्सवर वाईट परिणाम होतो. सोबतच हाडे कमजोर होणं सुरू होतं. अशात कमजोर हाडांमुळे संधिवातसारखी समस्या होण्याचीही शक्यता असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य