शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बंद एसी सुरू करताय? थोडं थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 10:46 IST

धूलिकणांसह जंतूंमुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती

- सचिन लुंगसे मुंबई : पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने एसीचा वापर तुलनेने कमी केला जातो. किंवा एसी बंद ठेवला जातो. मात्र पावसाळा आणि हिवाळा संपल्यानंतर मार्च महिन्यातच उन्हाचा तडाखा बसू लागल्यानंतर मागील काही महिने बंद ठेवलेला एसी पुन्हा सुरू केला जातो. परंतु एवढे महिने बंद असलेला एसी सुरू करताना त्यातील जाळी स्वच्छ करण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी, त्यातील धूलिकणांसह जंतूंमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते, असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले.मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरुवात होते. या काळात दमा, अ‍ॅलर्जी, रेस्पेटरी इन्फेक्शन, श्वसनाचा त्रास आणि काही प्रमाणात निमोनियाचा त्रास होतो. याचे मूळ कोठे आहे, यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले की, आपल्याकडे उन्हाळा वगळता पावसाळा आणि हिवाळ्यात एसी बंद ठेवला जातो. पावसाळा आणि हिवाळा संपला की उन्हाळ्यादरम्यान गारव्यासाठी एवढे महिने बंद ठेवण्यात आलेला एसी सुरू केला जातो. उन्हाळ्यादरम्यान एसी सुरू करताना तो स्वच्छ केला जात नाही. एसीला एक फिल्टर असतो. त्यातून बाहेरची हवा आत येत असते. यात धूळीचे कण साचलेले असतात. जेव्हा तुम्ही एसी सुरू करता तेव्हा येणाऱ्या भपक्यात साचलेले सगळे कण बाहेर येतात. परिणामी, अ‍ॅलर्जी, खोकला, सर्दीचे प्रमाण वाढते. न्यूमोनियाचा धोका वाढतो.

अचानक आलेली आठवण देते अ‍ॅलर्जीस आमंत्रणउकडायला लागले की गारेगार हवा हवीहवीशी वाटते. साहजिकच पावसाळा, थंडीच्या दिवसांत बंद केलेल्या एसीची अचानक आठवण येते. काहीही विचार न करता बरेच महिने बंद असलेला एसी पटकन चालू केला जातो. पण बराच काळ तो बंद असल्याने एसीत बाहेरची हवी आत घेणाºया फिल्टरमध्ये धूळीचे कण साचलेले असतात. एसी सुरू करताच ते हवेत पसरतात आणि अ‍ॅलर्जीस आमंत्रण मिळते, असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जाळी साफ करणे गरजेचेएसीच्या माध्यमातून लीजनेल्ला आणि असीनॅटोबॅक्टर हे दोन जंतू पसरतात. ते एसीचेच जंतू आहेत. या जंतूंमुळे न्यूमोनियाची लागण होते. परिणामी, उन्हाळा सुरू झाल्यावर तुम्ही एसी सुरू करण्यापूर्वी त्यातली जाळी बाहेर काढा. ती पाण्यात टाका. एक ते दोन तास भिजत ठेवा. ब्रशच्या माध्यमातून जाळी स्वच्छ करा. त्यानंतर तिला उन्हात एक दिवस वाळवा, म्हणजे ती निर्जंतुक होईल. त्यानंतरच तिचा वापर करून एसी सुरू करा. महत्त्वाचे म्हणजे दर महिन्याला जाळी झटकून स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण एसीमुळे इन्फेक्शन होऊ शकते, असेही अन्नदाते यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स