शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांभोवती क्षयरोगाचा घट्ट विळखा, पूर्ण उपचारांकडे फिरविली पाठ, निराशाजनक चित्र

By स्नेहा मोरे | Updated: March 24, 2023 13:17 IST

शहर उपनगरांत मागील तीन वर्षांत निदान होणाऱ्या एकूण क्षय रुग्णांपैकी केवळ २० टक्के रुग्णच उपचार पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई :  एकीकडे केंद्र सरकारने २०२५ मध्ये क्षय निर्मूलनाचे उद्दिष्ट जाहीर केले असले तरी दुसरीकडे क्षयाचे धक्कादायक वास्तव वेगळे आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांमध्ये क्षयरोगाचा धोका वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, दुसरीकडे क्षयरोगाचे उपचार पूर्ण करण्याकडे मात्र रुग्णांनी पाठ केल्याचे निराशाजनक चित्र आहे. याखेरीज, मुंबईतील एकूण क्षय रुग्णांमध्ये औषधास दाद न देणाऱ्या डीआरटीबी क्षयाचे प्रमाण वाढत आहे. 

शहर उपनगरांत मागील तीन वर्षांत निदान होणाऱ्या एकूण क्षय रुग्णांपैकी केवळ २० टक्के रुग्णच उपचार पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, महिला, पुरुषांमध्ये २०२० ते २०२२ या काळात क्षयाची तीव्रता वाढत आहे.   क्षयरोग हा जगातील सर्वांत प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. जगात दररोज या रोगाचे २८ हजार रुग्ण आढळून येतात.

अर्धवट उपचार अधिक जीवघेणे गेल्या तीन वर्षांंत निदान झालेल्या क्षय रुग्णांपैकी अत्यल्प रुग्णांनी उपचार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मात्र, क्षयाचे उपचार अर्धवट सोडणे अधिक जीवघेणे ठरत असल्याचेही डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.  थोडे बरे वाटल्यानंतर रुग्णांनी औषध घेणे थांबविणे किंवा औषधांचा प्रभाव कमी झाल्याने एमडीआर-क्षय होण्याची शक्यता असते, त्यामुळे पालिकेकडूनही सातत्याने या रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांना उपचारांच्या प्रवाहात ठेवणे, पोषण आहाराची काळजी घेणे, अशा विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

डीआरटीबी ठरतोय अधिक घातकमुंबईत औषधांना प्रतिरोधी क्षयरोगाची (डीआर टीबी) बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. औषध प्रतिरोधी क्षयाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाची नियमित औषधेही काम करत नाहीत. त्यामुळे अतितीव्र प्रतिजैविकांचा वापर यांच्या उपचारांमध्ये केला जातो. मुंबईत २०२० मध्ये डीआरटीबी रुग्णांची संख्या ४ हजार ७७५ होती, आता हे प्रमाण ५ हजार ६२५ वर गेले आहे.

११ हजारांहून अधिक लहानग्यांना क्षयलहान मुलांमध्ये टीबीचे प्रमाण वाढत असल्याचे पालिकेच्या माहितीतून दिसून येते. नवजात बालक ते सात वर्षांतील वयोगटातील मुलांमध्ये हे टीबीची लागण होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. २०२० ते २०२२ या कालवधीत ११ हजार ७२७ लहान मुलांना टीबीची लागण झाली आहे. औषधोपचार पद्धतीत सुधारणा झाल्याने आता हा आजार बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य