शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

मुंबईकरांभोवती क्षयरोगाचा घट्ट विळखा, पूर्ण उपचारांकडे फिरविली पाठ, निराशाजनक चित्र

By स्नेहा मोरे | Updated: March 24, 2023 13:17 IST

शहर उपनगरांत मागील तीन वर्षांत निदान होणाऱ्या एकूण क्षय रुग्णांपैकी केवळ २० टक्के रुग्णच उपचार पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई :  एकीकडे केंद्र सरकारने २०२५ मध्ये क्षय निर्मूलनाचे उद्दिष्ट जाहीर केले असले तरी दुसरीकडे क्षयाचे धक्कादायक वास्तव वेगळे आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांमध्ये क्षयरोगाचा धोका वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, दुसरीकडे क्षयरोगाचे उपचार पूर्ण करण्याकडे मात्र रुग्णांनी पाठ केल्याचे निराशाजनक चित्र आहे. याखेरीज, मुंबईतील एकूण क्षय रुग्णांमध्ये औषधास दाद न देणाऱ्या डीआरटीबी क्षयाचे प्रमाण वाढत आहे. 

शहर उपनगरांत मागील तीन वर्षांत निदान होणाऱ्या एकूण क्षय रुग्णांपैकी केवळ २० टक्के रुग्णच उपचार पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, महिला, पुरुषांमध्ये २०२० ते २०२२ या काळात क्षयाची तीव्रता वाढत आहे.   क्षयरोग हा जगातील सर्वांत प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. जगात दररोज या रोगाचे २८ हजार रुग्ण आढळून येतात.

अर्धवट उपचार अधिक जीवघेणे गेल्या तीन वर्षांंत निदान झालेल्या क्षय रुग्णांपैकी अत्यल्प रुग्णांनी उपचार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मात्र, क्षयाचे उपचार अर्धवट सोडणे अधिक जीवघेणे ठरत असल्याचेही डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.  थोडे बरे वाटल्यानंतर रुग्णांनी औषध घेणे थांबविणे किंवा औषधांचा प्रभाव कमी झाल्याने एमडीआर-क्षय होण्याची शक्यता असते, त्यामुळे पालिकेकडूनही सातत्याने या रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांना उपचारांच्या प्रवाहात ठेवणे, पोषण आहाराची काळजी घेणे, अशा विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

डीआरटीबी ठरतोय अधिक घातकमुंबईत औषधांना प्रतिरोधी क्षयरोगाची (डीआर टीबी) बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. औषध प्रतिरोधी क्षयाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाची नियमित औषधेही काम करत नाहीत. त्यामुळे अतितीव्र प्रतिजैविकांचा वापर यांच्या उपचारांमध्ये केला जातो. मुंबईत २०२० मध्ये डीआरटीबी रुग्णांची संख्या ४ हजार ७७५ होती, आता हे प्रमाण ५ हजार ६२५ वर गेले आहे.

११ हजारांहून अधिक लहानग्यांना क्षयलहान मुलांमध्ये टीबीचे प्रमाण वाढत असल्याचे पालिकेच्या माहितीतून दिसून येते. नवजात बालक ते सात वर्षांतील वयोगटातील मुलांमध्ये हे टीबीची लागण होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. २०२० ते २०२२ या कालवधीत ११ हजार ७२७ लहान मुलांना टीबीची लागण झाली आहे. औषधोपचार पद्धतीत सुधारणा झाल्याने आता हा आजार बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य