शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जास्त मीठ खाल्ल्याने होते 'ही' गंभीर समस्या, तुम्ही कधी याबाबत विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:37 IST

मिठाशिवाय पदार्थाला चवच नाही. मात्र अनेकांना वरुन मीठ घेण्याची सवय असते जी अत्यंत चुकीची सवय आहे. याचा अर्थ तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खावे वाटते.

कोणत्याही पदार्थात मीठ असणे आवश्यक आहे. मिठाशिवाय त्या पदार्थाला चवच नाही. मात्र अनेकांना वरुन मीठ घेण्याची सवय असते जी अत्यंत चुकीची सवय आहे. याचा अर्थ तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खावे वाटते. अन्नात कधी  मीठ कमी जरी पडले तरी शक्यतो ते तसेच खावे. पदार्थ तयार झाल्यावर तो ताटात वाढल्यावर वरुन मीठ घेऊ नये. यामुळे हृदय, मुत्रपिंडाचे विकार होतात हे आपण ऐकलंच असेल. पण याचा मानसिक परिणामही होतो. एका संशोधनातुन हे सिद्ध झाले आहे.

संशोधनात काय म्हणले आहे ?

एडिनबर्गच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्स सेंटरमधील रेनल फिजिओलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू बेली यांनी केलेल्या रिसर्चनुसार अन्नातील मिठामुळे मानसिक आरोग्य बदलते. जास्त मीठ खाल्ल्याने मेंदुचा ताण वाढतो. यामुळे हार्मोन्समध्येही मोठे बदल होतात. यामुळे तणाव येऊ शकतो. तो तणाव कसा हाताळायचा हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबुन आहे. म्हणुनच काही जणांना खूप खारट सहन होत नाही. उच्च रक्तदाबाचा त्रासही होतो.

कार्डिओव्हॅस्क्युलर संशोधकांनी उंदरांवर प्रयोग करुन बघितला. जास्त मीठ सेवन केल्याने स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. कमी मीठ सेवन केलेल्या उंदरांपेक्षा जास्त मीठ खाल्लेल्या उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन पातळी ७५ टक्क्यांनी वाढली. 

मानसिक आणि शारीरीक त्रास

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तवाहिन्या, हृदय, आणि मुत्रपिंडावर परिणाम होतो. याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच स्ट्रेस हार्मोनच्या पातळीत वाढ झाली तर आपल्या वागण्यात फरक जाणवतो. नेमके व्यक्तीच्या स्वभावात काय फरक पडतो याचा अभ्यास अजुन सुरु आहे. ज्यांना बीपी, डायबिटिस आहे त्यांना कमी मीठ खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.  मीठ सोडियम क्लोराईडने बनले आहे ज्याचे अतिसेवन शरीरावर घातक परिणाम करतात.

टॅग्स :Healthy Diet Planआहार योजनाfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाMental Health Tipsमानसिक आरोग्य