शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

जास्त मीठ खाल्ल्याने होते 'ही' गंभीर समस्या, तुम्ही कधी याबाबत विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:37 IST

मिठाशिवाय पदार्थाला चवच नाही. मात्र अनेकांना वरुन मीठ घेण्याची सवय असते जी अत्यंत चुकीची सवय आहे. याचा अर्थ तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खावे वाटते.

कोणत्याही पदार्थात मीठ असणे आवश्यक आहे. मिठाशिवाय त्या पदार्थाला चवच नाही. मात्र अनेकांना वरुन मीठ घेण्याची सवय असते जी अत्यंत चुकीची सवय आहे. याचा अर्थ तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खावे वाटते. अन्नात कधी  मीठ कमी जरी पडले तरी शक्यतो ते तसेच खावे. पदार्थ तयार झाल्यावर तो ताटात वाढल्यावर वरुन मीठ घेऊ नये. यामुळे हृदय, मुत्रपिंडाचे विकार होतात हे आपण ऐकलंच असेल. पण याचा मानसिक परिणामही होतो. एका संशोधनातुन हे सिद्ध झाले आहे.

संशोधनात काय म्हणले आहे ?

एडिनबर्गच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्स सेंटरमधील रेनल फिजिओलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू बेली यांनी केलेल्या रिसर्चनुसार अन्नातील मिठामुळे मानसिक आरोग्य बदलते. जास्त मीठ खाल्ल्याने मेंदुचा ताण वाढतो. यामुळे हार्मोन्समध्येही मोठे बदल होतात. यामुळे तणाव येऊ शकतो. तो तणाव कसा हाताळायचा हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबुन आहे. म्हणुनच काही जणांना खूप खारट सहन होत नाही. उच्च रक्तदाबाचा त्रासही होतो.

कार्डिओव्हॅस्क्युलर संशोधकांनी उंदरांवर प्रयोग करुन बघितला. जास्त मीठ सेवन केल्याने स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. कमी मीठ सेवन केलेल्या उंदरांपेक्षा जास्त मीठ खाल्लेल्या उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन पातळी ७५ टक्क्यांनी वाढली. 

मानसिक आणि शारीरीक त्रास

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तवाहिन्या, हृदय, आणि मुत्रपिंडावर परिणाम होतो. याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच स्ट्रेस हार्मोनच्या पातळीत वाढ झाली तर आपल्या वागण्यात फरक जाणवतो. नेमके व्यक्तीच्या स्वभावात काय फरक पडतो याचा अभ्यास अजुन सुरु आहे. ज्यांना बीपी, डायबिटिस आहे त्यांना कमी मीठ खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.  मीठ सोडियम क्लोराईडने बनले आहे ज्याचे अतिसेवन शरीरावर घातक परिणाम करतात.

टॅग्स :Healthy Diet Planआहार योजनाfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाMental Health Tipsमानसिक आरोग्य