शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

'या' भाज्यांमुळे इम्युनिटी वाढते सुपरफास्ट, महत्व समजले तर दररोज खाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 14:38 IST

शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणत्या भाज्या खाणं आवश्यक आहे, याबद्दल जाणून घेऊ या.

सर्वसमावेशक आहार नियमित घेतल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवत नाहीत. तसंच आहारासोबत पुरेसा व्यायामही गरजेचा असतो. शरीरातली ऊर्जा टिकवण्यासाठी घरी शिजवलेलं अन्न उपयुक्त ठरते. डॉक्टरही नेहमीच घरी शिजवलेलं अन्न खाण्याचा सल्ला देतात. खाण्याच्या चांगल्या सवयी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. कुठलाही आजार रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटीच्या कमतरतेमुळेच होतो. यासाठीच पोषक आहार उपयुक्त ठरतो.

पर्यायाने, तब्येतीच्या तक्रारींना अटकाव होतो. शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणत्या भाज्या खाणं आवश्यक आहे, याबद्दल जाणून घेऊ या. सर्व प्रकारच्या भाज्या, कडधान्यं, डाळी तब्येतीसाठी उपयुक्त असतात. पण अनेकदा त्यातल्या पौष्टिक गुणधर्मांची पुरेशी माहिती नसते. पालेभाज्या, फळभाज्यांमुळे शरीराला मुबलक पोषक तत्त्वं मिळतात. दैनंदिन डाएटमध्ये या भाज्यांचा समावेश करावा.

ब्रोकोलीब्रोकोलीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, झिंक, फायबर आणि आयर्नचं प्रमाण जास्त असतं. रोजच्या जेवणात ब्रोकोलीचा समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. तसंच हाडही मजबूत राहतात. वजनवाढीवरदेखील नियंत्रण राहतं.

सिमला मिरची अर्थात ढोबळी मिरचीसिमला मिरची अर्थात ढोबळी मिरची रोजच्या आहारात असणं गरजेचं आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते. ढोबळी मिरचीत फायबर्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप असतं. हे घटक शरीराला निरोगी आणि मजबूत बनवतात.

पालकपालक खाणं तब्येतीसाठी उपयुक्त ठरतं. पालकमध्ये प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतं. पालकची भाजी खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी वाढते. परिणामी, आजार दूर राहण्यास मदत होते. आहारात पालकच्या भाजीचा समावेश केल्यास शरीरातली आयर्नची कमतरता भरून निघते. यासाठी पालक सूप किंवा पालकची भाजी आहारात कायम असावी.

फ्लॉवरफ्लॉवर खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे खूप आहेत. याचं कारण फ्लॉवरच्या भाजीत कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबर्सचं प्रमाण प्रचंड असतं. यामुळे फ्लॉवरची भाजी नियमितपणे खाणं उपकारक ठरतं. यासोबतच तब्येतीच्या तक्रारी दूर राहतात. तसंच शरीराची इम्युनिटी उत्तम राहते. पचनशक्तीदेखील सक्षम राहते.

विविध पालेभाज्या शरीराची इम्युनिटी वाढवतात. यामुळे जीवणू-विषाणूंचा शरीरात शिरकाव होत नाही. रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तब्येतीच्या तक्रारी उद्भवत नाहीत. यासाठीच अनहायजिनिक ठिकाणी खाणं टाळावं. आहारात जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. तसंच प्रकृतीनुसार डाएट ठरवताना डॉक्टरांचं मार्गदर्शन जरूर घ्यावं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स