शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

तुम्हाला घाम येत नसेल तर करावा लागू शकतो 'या' रोगांचा सामना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 13:59 IST

आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे.

आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, घामासोबतच शरीरातील अशुद्ध घटक त्वचेच्या रोमछिद्रांमधून शरीराबाहेर टाकले जातात. यामुळे त्वचेला फायदा होतो. तसेच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांना घाम येतो. त्या व्यक्ती घाम न येणाऱ्या व्यक्तिंच्या तुलनेत जास्त निरोगी असतात. घाम येणं ही एक महत्त्वाची जैविक क्रिया आहे. ज्यामुळे शरीराच्या इतर क्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. पण ज्या व्यक्तिंना घाम येत नाही त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. 

1. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुमच्या शरीराला ऊन लागण्याचा धोका अधिक संभवतो. तसेच या लोकांच्या शरीराचे तापमान कमी होत नाही. घाम आल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

2. घाम आल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील घातक घटक घामाबरोबर शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण होते. पण ज्या व्यक्तींना घाम येत नाही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. 

3. जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुम्हाला त्वचेचे विकार होण्याची शक्याता असते. जसे घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये अडकलेले धूळीचे कणही घामासोबत बाहेर टाकले जातात. त्यामुळे पिंम्पल्सची समस्या होत नाही. 

4. घामाद्वारे आपल्या शरीरातील अतिरिक्त मीठ शरीराबाहेर टाकले जाते. ज्या लोकांना घाम येत नाही त्यांच्या शरीरात मीठ आणि कॅल्शिअमचे प्रामाण वाढते. असातच त्यांना किडनी स्टोनचा धोकाही संभवतो.

5. घाम येत नसेल तर शरीरावर झालेल्या जखमा भरून येण्यासही वेळ लागतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य