शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

थंडी पडली, भूक वाढली; वजन आटोक्यात ठेवा! खाण्यावर नियंत्रणाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 05:51 IST

शरीराचे तापमान वाढविण्यासाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी अन्नाचे सेवन हा एकमेव मार्ग असतो.

मुंबई - सध्या थंडीचे दिवस आहेत. या काळात मुलांसह अनेकांची भूक वाढते. त्यामुळे नियमित आहाराबरोबरच अन्य खाद्यपदार्थ अतिरिक्त खाल्ले जातात. वातावरण चांगले असल्यामुळे विविध पदार्थांवर ताव मारला जातो. खाताना कुठल्या पदार्थात किती फॅट्स आणि कॅलरीज आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची भीती असते आणि भविष्यात व्याधींना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.   

हिवाळ्यात तापमान घसरल्यामुळे शरीराचे तापमानही कमी होते. शरीराचे तापमान वाढविण्यासाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी अन्नाचे सेवन हा एकमेव मार्ग असतो. शरीराची गरज म्हणून भूक वाढते. ती शमविण्यासाठी अतिरिक्त अन्नाचे सेवन केले जाते. परिणामी वजन वाढते. त्यामुळे या काळात कोणता आहार आपण घेत आहोत आणि आपण शरीराची किती हालचाल करत आहोत, या बाबी महत्त्वाच्या असतात, असे डॉक्टर सांगतात.

हिवाळ्यात गोड खाण्याची इच्छा होतेहिवाळ्यात अनेकवेळा कर्बोदके खाण्याची इच्छा होते. गोड खाणे वजनवाढीसाठी कारणीभूत असतात. काही वेळा गोड पदार्थ खूप खाल्ले जातात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्या प्रमाणात वाढते तशी ती कमीही होते. मात्र इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले असते, त्यामुळे अनेकवेळा भूक लागते. 

काय करावे?खाण्याच्या वेळा ठरवून घ्या अन्नात प्रोटीनचा वापर करा  नियमित व्यायाम करा पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे   

हिवाळ्यातच असे का घडते?हिवाळ्यात शरीराची ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र ती मिळविण्यासाठी अनेकवेळा खाण्याची इच्छा होते. काही कुटुंबांत थंडीचे आगमन झाल्यावर विविध पदार्थ बनविण्याची परंपरा आहे. थंडीत डिंकाचे, मेथीचे लाडू खाणे आरोग्यदायी असते, असे समजले जाते. तीळपोळी, गुळपोळीचे सेवन सुद्धा या काळात अधिक प्रमाणात होते.  

हिवाळ्यात भूक अधिक लागते, त्यामागे शास्त्रीय आणि सामाजिक अशी दोन्ही कारणे आहेत. ऊर्जानिर्मितीसाठी अधिक खाल्ले जाते. तसेच हिवाळ्यात सण येतात, लग्नसराई असते. त्यामुळे गोड पदार्थ अधिक खाल्ले जातात. वजनवाढीस ते कारणीभूत ठरतात. त्याचे दुष्परिणाम नंतर दिसतात. त्यामुळे हिवाळ्यात अशा पदार्थांची चव घ्यावी, मात्र ते अधिक प्रमाणात खाऊ नयेत. आपला नियमित पौष्टिक आहार घ्यावा. विशेष म्हणजे या काळात व्यायाम करावा. आहारावर नियंत्रण हाच खरा मंत्र आहे.  - डॉ. प्रवीण राठी, विभागप्रमुख गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, नायर रुग्णालय

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स