शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

थंडी पडली, भूक वाढली; वजन आटोक्यात ठेवा! खाण्यावर नियंत्रणाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 05:51 IST

शरीराचे तापमान वाढविण्यासाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी अन्नाचे सेवन हा एकमेव मार्ग असतो.

मुंबई - सध्या थंडीचे दिवस आहेत. या काळात मुलांसह अनेकांची भूक वाढते. त्यामुळे नियमित आहाराबरोबरच अन्य खाद्यपदार्थ अतिरिक्त खाल्ले जातात. वातावरण चांगले असल्यामुळे विविध पदार्थांवर ताव मारला जातो. खाताना कुठल्या पदार्थात किती फॅट्स आणि कॅलरीज आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची भीती असते आणि भविष्यात व्याधींना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.   

हिवाळ्यात तापमान घसरल्यामुळे शरीराचे तापमानही कमी होते. शरीराचे तापमान वाढविण्यासाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी अन्नाचे सेवन हा एकमेव मार्ग असतो. शरीराची गरज म्हणून भूक वाढते. ती शमविण्यासाठी अतिरिक्त अन्नाचे सेवन केले जाते. परिणामी वजन वाढते. त्यामुळे या काळात कोणता आहार आपण घेत आहोत आणि आपण शरीराची किती हालचाल करत आहोत, या बाबी महत्त्वाच्या असतात, असे डॉक्टर सांगतात.

हिवाळ्यात गोड खाण्याची इच्छा होतेहिवाळ्यात अनेकवेळा कर्बोदके खाण्याची इच्छा होते. गोड खाणे वजनवाढीसाठी कारणीभूत असतात. काही वेळा गोड पदार्थ खूप खाल्ले जातात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्या प्रमाणात वाढते तशी ती कमीही होते. मात्र इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले असते, त्यामुळे अनेकवेळा भूक लागते. 

काय करावे?खाण्याच्या वेळा ठरवून घ्या अन्नात प्रोटीनचा वापर करा  नियमित व्यायाम करा पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे   

हिवाळ्यातच असे का घडते?हिवाळ्यात शरीराची ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र ती मिळविण्यासाठी अनेकवेळा खाण्याची इच्छा होते. काही कुटुंबांत थंडीचे आगमन झाल्यावर विविध पदार्थ बनविण्याची परंपरा आहे. थंडीत डिंकाचे, मेथीचे लाडू खाणे आरोग्यदायी असते, असे समजले जाते. तीळपोळी, गुळपोळीचे सेवन सुद्धा या काळात अधिक प्रमाणात होते.  

हिवाळ्यात भूक अधिक लागते, त्यामागे शास्त्रीय आणि सामाजिक अशी दोन्ही कारणे आहेत. ऊर्जानिर्मितीसाठी अधिक खाल्ले जाते. तसेच हिवाळ्यात सण येतात, लग्नसराई असते. त्यामुळे गोड पदार्थ अधिक खाल्ले जातात. वजनवाढीस ते कारणीभूत ठरतात. त्याचे दुष्परिणाम नंतर दिसतात. त्यामुळे हिवाळ्यात अशा पदार्थांची चव घ्यावी, मात्र ते अधिक प्रमाणात खाऊ नयेत. आपला नियमित पौष्टिक आहार घ्यावा. विशेष म्हणजे या काळात व्यायाम करावा. आहारावर नियंत्रण हाच खरा मंत्र आहे.  - डॉ. प्रवीण राठी, विभागप्रमुख गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, नायर रुग्णालय

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स