शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:12 IST

छिंदवाडा येथील घटना आरोग्य व्यवस्थेतील दोष आणि शिथिलता स्पष्ट करते. यातून धडा घेऊन, सरकारने तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. 

- सुमेध वाघमारेउपमुख्य-उपसंपादकध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात घडलेली कफ सिरपमुळे लहानग्यांच्या मृत्यूची घटना ही केवळ एक वैद्यकीय अपघात नाही ती आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या निष्ठुरतेचा, औषध उद्योगाच्या बेजबाबदार लोभाचा आणि सरकारच्या घोर निष्काळजीपणाचा काळा आरसा आहे. दोन ते नऊ वर्षांच्या वयातील १४ बालकांपैकी आठ चिमुकल्यांचे मृत्यू झाले आणि त्यातील चारजण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. या निष्पाप जीवांचा श्वास कधी थांबला, याची जबाबदारी कोण घेणार? आणि सर्वात महत्त्वाचे हे या भयावह प्रकरणातून आपल्याला अजून किती मुलांच्या बळीनंतर धडा घ्यायचा आहे? हे प्रश्न आहेत.

छिंदवाड्यातील परासीया तालुक्यातील ही घटना केवळ औषधातील दोषाची कथा नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ अवस्थेची साक्ष देते. विषबाधेची प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतरही स्थानिक रुग्णालयांमध्ये कोणतीही तातडीची सुविधा नव्हती. दीड ते नऊ वर्षांच्या गंभीर अवस्थेतील बालकांना ५-६ तासांचा जीवघेणा प्रवास करून नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. हा प्रवास म्हणजे ‘उपचार यंत्रणा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या असहायतेचा जिवंत पुरावा आहे. जी यंत्रणा या मुलांना वाचवू शकली असती, तीच त्यांच्या किडन्या निकामी करणारी ठरली. ग्रामीण आरोग्य केंद्रे औषध साठा, तज्ज्ञ डॉक्टर आणि निदान सुविधा यांपासून वंचित आहेत. अनेक ठिकाणी तर बालरोगतज्ज्ञ उपलब्धच नाहीत. अशा स्थितीत  उपचाराची जबाबदारी ‘नशिबावर’ सोडली गेली आहे. 

डॉक्टर आणि पालकांकडून कोणत्या चुका होतातया प्रकरणात डॉक्टर आणि पालकांची   बेपर्वाई जबाबदार आहे. २ वर्षांखालील बालकांना कफ सिरप देऊ नये, अशी शिफारस असूनही डॉक्टर हे औषध लिहून देतात. पालक सांगितलेला डोस पाळत नाहीत. चमचा, बाटलीचे बूच किंवा अंदाजाने औषध दिले जाते.  चिंताजनक बाब म्हणजे भारतात कफ सिरपमध्ये विषारी रसायनांची भेसळ ही नवीन नाही. डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलसारखी घातक रसायने अनेकदा कफ सिरपमध्ये आढळली आहेत आणि जगभरात शेकडो बालकांचे जीव घेतले आहेत. छिंदवाडा प्रकरणातील नमुन्यांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा असली तरी इतिहास सांगतो की हा ‘अपघात’ नाही. ही लोभी औषध कंपन्यांची सवय आहे.

फक्त ‘ॲडव्हायझरी’ नव्हे, कायदाच करायला हवा!आरोग्य विभागाने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याबद्दल ‘ॲडव्हायझरी’ जारी केली. पण या गंभीर परिस्थितीत ‘सल्ला’ पुरेसा आहे का? निष्पापांचे प्राण वाचवायचे असतील, तर या सल्ल्याचे कायद्यात रूपांतर करावे लागेल. औषध विक्रीसाठी कडक परवाना धोरण, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विकणाऱ्यांवर थेट परवाना रद्द करणे आवश्यक आहे.  

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बालकांना कफ सिरप द्यावे. स्वतःहून औषधी घेऊन देऊ नये. डोसचे काटेकोर पालन करावे. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विक्री करणाऱ्यांवर कारवाई आणि औषधांच्या गुणवत्तेवर सतत नियंत्रण असावे.डॉ. वसंत खळतकर, नागपूर, राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बालरोग तज्ञांची संघटना, (आयपीए)

जबाबदारी ठरवा, शिक्षा द्याऔषधात विषारी भेसळ करणाऱ्या कंपन्यांना खटल्यात खेचले पाहिजे.प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विकणाऱ्या दुकानांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत.अशा औषधांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे.स्थानिक आरोग्य यंत्रणेची पुनर्रचना करून जबाबदारीचे गणित ठरवावे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cough Syrup Deaths Expose Toxic Systemic Failures, Negligence

Web Summary : Cough syrup deaths in Madhya Pradesh reveal systemic failures and negligence. Children died due to inadequate healthcare, medicine adulteration. Accountability, strict laws, and quality control are crucial to prevent future tragedies; doctors and parents must be more vigilant.
टॅग्स :Rajasthanराजस्थान