शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

उघड्यावरचे पदार्थ चवीनं खाताय? पण या गंभीर आजारांची माहिती मिळाल्यावर जाल विसरुन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:36 IST

पावसाळ्यात रस्त्यावरचे चमचमीत पदार्थ दिसले की खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र हे पदार्थ म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण असते. या पदार्थांवर घाण, विषाणू, जीवजंतू, माश्या बसलेल्या असतात. त्यांच्यापासून आपणास खालील आजार होतात. या आजारांपासून कसे वाचावे याचे उपाय.

पावसाळ्यात रस्त्यावरचे चमचमीत पदार्थ दिसले की खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र हे पदार्थ म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण असते. या पदार्थांवर घाण, विषाणू, जीवजंतू, माश्या बसलेल्या असतात. त्यांच्यापासून आपणास खालील आजार होतात. या आजारांपासून कसे वाचावे याचे उपाय.

जुलाबजुलाब हा पावसाळ्यात उघड्यावरील दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. पोटात गुबारा धरणे / पोट फुगणेपोटात वात होणे, शौचास घाई होणे, पोट पूर्ण साफ झाले नाही असे वाटणे, शौचाच्या वेळी चिकट स्त्राव येणे ही याची लक्षणे आहेत.उपाय-शुद्ध पाणी, नारळपाणी, फळांचे रस, डाळीचे पाणी, लिंबूपाणी असे भरपूर दवपदार्थ प्यावेत. त्याचबरोबर 'ओआरएस'चाही आसरा घेता येतो. 'ओआरएस' म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन.

कावीळपावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे कावीळ होते. या आजारात डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. काविळीची लागण झाली की यकृतामध्ये बिघाड होतो. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते.उपाय-काविळीमध्ये काहीही खाण्याची आणि पिण्याची इच्छा मरुन जाते. पण या दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी तुम्हाला चांगला आहार घेण्याची देखील गरज असते. पण या दिवसात भूक लागत नाही. म्हणूनच तुम्ही मुळ्याचा रस आहारात घेणे आवश्यक असते. मुळ्याची पाने खुडून त्याचा रस प्यायलाने तुमचे पोट साफ होते आणि तुम्हाला भूक लागते. त्यामुळे किमान एक ग्लासभर तरी मुळ्याचा रस प्यावा.

फुड पॉईजनिंगपावसाळ्यात उघड्यावरील अरबट चरबट, चुकीचे, अनहेल्दी आणि अस्वच्छ पदार्थ खाल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे फायदेशीर ठरेल. गरम पाणी पिणे तर अधिक उत्तम. उपाय-जिऱ्याचा वापर पदार्थ स्वादिष्ट आणि सुगंधित बनवण्यासाठी केला जातो. रोज एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खाल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल. जिऱ्यामुळे पचनक्रीया सुधारते.

पावसाळ्यात अशी घ्याल पोटाची काळजीआपल्या आहारात फळे, पालेभाज्या या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल. ब्रोकोली, गाजर,  हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हळद ही औषधी वनस्पती असून यात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा. सर्दी व खोकल्यासाठी लसून अतिशय गुणकारी आहे. लसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत.ज्यामुळे अ‍ॅलर्जीला दूर पळविता येते.लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स