शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

उघड्यावरचे पदार्थ चवीनं खाताय? पण या गंभीर आजारांची माहिती मिळाल्यावर जाल विसरुन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:36 IST

पावसाळ्यात रस्त्यावरचे चमचमीत पदार्थ दिसले की खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र हे पदार्थ म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण असते. या पदार्थांवर घाण, विषाणू, जीवजंतू, माश्या बसलेल्या असतात. त्यांच्यापासून आपणास खालील आजार होतात. या आजारांपासून कसे वाचावे याचे उपाय.

पावसाळ्यात रस्त्यावरचे चमचमीत पदार्थ दिसले की खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र हे पदार्थ म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण असते. या पदार्थांवर घाण, विषाणू, जीवजंतू, माश्या बसलेल्या असतात. त्यांच्यापासून आपणास खालील आजार होतात. या आजारांपासून कसे वाचावे याचे उपाय.

जुलाबजुलाब हा पावसाळ्यात उघड्यावरील दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. पोटात गुबारा धरणे / पोट फुगणेपोटात वात होणे, शौचास घाई होणे, पोट पूर्ण साफ झाले नाही असे वाटणे, शौचाच्या वेळी चिकट स्त्राव येणे ही याची लक्षणे आहेत.उपाय-शुद्ध पाणी, नारळपाणी, फळांचे रस, डाळीचे पाणी, लिंबूपाणी असे भरपूर दवपदार्थ प्यावेत. त्याचबरोबर 'ओआरएस'चाही आसरा घेता येतो. 'ओआरएस' म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन.

कावीळपावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे कावीळ होते. या आजारात डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. काविळीची लागण झाली की यकृतामध्ये बिघाड होतो. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते.उपाय-काविळीमध्ये काहीही खाण्याची आणि पिण्याची इच्छा मरुन जाते. पण या दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी तुम्हाला चांगला आहार घेण्याची देखील गरज असते. पण या दिवसात भूक लागत नाही. म्हणूनच तुम्ही मुळ्याचा रस आहारात घेणे आवश्यक असते. मुळ्याची पाने खुडून त्याचा रस प्यायलाने तुमचे पोट साफ होते आणि तुम्हाला भूक लागते. त्यामुळे किमान एक ग्लासभर तरी मुळ्याचा रस प्यावा.

फुड पॉईजनिंगपावसाळ्यात उघड्यावरील अरबट चरबट, चुकीचे, अनहेल्दी आणि अस्वच्छ पदार्थ खाल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे फायदेशीर ठरेल. गरम पाणी पिणे तर अधिक उत्तम. उपाय-जिऱ्याचा वापर पदार्थ स्वादिष्ट आणि सुगंधित बनवण्यासाठी केला जातो. रोज एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खाल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल. जिऱ्यामुळे पचनक्रीया सुधारते.

पावसाळ्यात अशी घ्याल पोटाची काळजीआपल्या आहारात फळे, पालेभाज्या या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल. ब्रोकोली, गाजर,  हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हळद ही औषधी वनस्पती असून यात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा. सर्दी व खोकल्यासाठी लसून अतिशय गुणकारी आहे. लसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत.ज्यामुळे अ‍ॅलर्जीला दूर पळविता येते.लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स