शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

आजारपणात पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय आहे? जरा थांबा; 'हे' वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:04 IST

अनेकांना आजारी पडल्यावर पाण्याशिवायच औषधाच्या गोळ्या घेण्याची सवय असते. परंतु असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

मुंबई - अनेकांना आजारी पडल्यावर पाण्याशिवायच औषधाच्या गोळ्या घेण्याची सवय असते. परंतु असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एका रिसर्चमध्ये असे सिद्ध झाले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ति पाण्याशिवाय गोळ्या खाते त्यावेळी त्याच्या अन्ननलिकेला नुकसान पोहोचते.

आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेमार्फत आपल्या पोटात जातं. रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, पाण्याशिवाय गोळ्या घेतल्याने त्या अन्ननलिकेतून जात असताना अन्ननलिकेला चिटकतात. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका असतो, असे झाल्यास छातीत जळजळ किंवा छातीत दुखणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते. 

पाण्याशिवाय औषधाच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचदा त्रास जाणवतही नाही अशावेळी अंतर्गत रक्तस्रावाचा धोका अधिक असतो. जर एखाद्या व्यक्तीला पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय असेल तर अन्ननलिकेमध्ये अल्सर होण्याचाही धोका उद्भवतो. टर्किश जर्नल ऑफ गेस्ट्रोअंथ्रोलॉजीच्या एका रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. रिचर्समध्ये सांगण्यात आल्यानुसार, व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्स ज्या सहज पाण्याशिवाय घेता येतात त्याही पाण्यासोबतच घेणे गरजेचे आहे. 

पाण्याशिवाय गोळ्या घेण्याचे टाळणे हेच आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. त्यामुळे गोळ्या घेताना त्या पाण्यासोबतच घेतल्या पाहिजेत. याव्यतिरिक्त झोपून गोळ्या घेणेही टाळावे. कारण झोपून गोळ्या घेतल्याने गोळ्यांची अन्ननलिकेस चिकटण्याची शक्यता जास्त असते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य