शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

आजारपणात पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय आहे? जरा थांबा; 'हे' वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:04 IST

अनेकांना आजारी पडल्यावर पाण्याशिवायच औषधाच्या गोळ्या घेण्याची सवय असते. परंतु असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

मुंबई - अनेकांना आजारी पडल्यावर पाण्याशिवायच औषधाच्या गोळ्या घेण्याची सवय असते. परंतु असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एका रिसर्चमध्ये असे सिद्ध झाले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ति पाण्याशिवाय गोळ्या खाते त्यावेळी त्याच्या अन्ननलिकेला नुकसान पोहोचते.

आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेमार्फत आपल्या पोटात जातं. रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, पाण्याशिवाय गोळ्या घेतल्याने त्या अन्ननलिकेतून जात असताना अन्ननलिकेला चिटकतात. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका असतो, असे झाल्यास छातीत जळजळ किंवा छातीत दुखणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते. 

पाण्याशिवाय औषधाच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचदा त्रास जाणवतही नाही अशावेळी अंतर्गत रक्तस्रावाचा धोका अधिक असतो. जर एखाद्या व्यक्तीला पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची सवय असेल तर अन्ननलिकेमध्ये अल्सर होण्याचाही धोका उद्भवतो. टर्किश जर्नल ऑफ गेस्ट्रोअंथ्रोलॉजीच्या एका रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. रिचर्समध्ये सांगण्यात आल्यानुसार, व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्स ज्या सहज पाण्याशिवाय घेता येतात त्याही पाण्यासोबतच घेणे गरजेचे आहे. 

पाण्याशिवाय गोळ्या घेण्याचे टाळणे हेच आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. त्यामुळे गोळ्या घेताना त्या पाण्यासोबतच घेतल्या पाहिजेत. याव्यतिरिक्त झोपून गोळ्या घेणेही टाळावे. कारण झोपून गोळ्या घेतल्याने गोळ्यांची अन्ननलिकेस चिकटण्याची शक्यता जास्त असते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य