शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने काय होतं? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:38 IST

Bathing after meal : घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं.

Bathing after meal : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्या ब्रश करणे, नैसर्गिक विधी, नाश्ता, जेवण, झोप या अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पण अनेकांच्या काही चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडत असतं. अशाच एका चुकीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंघोळ आणि जेवण या दोन गोष्टींचाही महत्वाचा संबंध आहे. अनेकांना नेहमीच असा प्रश्न पडत असतो की, जेवण केल्यावर आंघोळ करावी की नाही? घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. दैनंदिन गोष्टी करण्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. ना जेवणाची वेळ फिक्स आहे ना झोपण्याची. अर्थात याचा प्रभाव आपल्या एकंदर आरोग्यावर पडतो आहे. जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर रूटीन लाइफमध्ये संतुलन ठेवावं लागेल तेव्हा तुम्ही फिट आणि निरोगी राहू शकता. अशात जेवणानंतर आंघोळ करावी की नाही याबाबत आयुर्वेद काय सांगतं हे जाणून घेऊया...

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य?

आयुर्वेदात आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहे. वर्षानुवर्षे आयुर्वेदातील गोष्टींचा वापर करून अनेक आजारांवर उपचार केले जातात. रोजच्या गोष्टींबाबतही यात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आयुर्वेदानुसार, कोणतंही काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो. यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. 

जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

मेडिकल सायन्स काय सांगतं?

आयुर्वेदासोबत मेडिकल सायन्स याबाबत सांगतं की, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.

जेवण केल्यावर किती वेळाने करावी आंघोळ?

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ करणं नुकसानकारक ठरतं. याने अ‍ॅसिडिटी, उलटी अशा समस्या होतात. इतकंच नाही तर तुमचा लठ्ठपणाही वाढू शकतो. नियमानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याचे सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य