शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने काय होतं? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:38 IST

Bathing after meal : घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं.

Bathing after meal : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्या ब्रश करणे, नैसर्गिक विधी, नाश्ता, जेवण, झोप या अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पण अनेकांच्या काही चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडत असतं. अशाच एका चुकीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंघोळ आणि जेवण या दोन गोष्टींचाही महत्वाचा संबंध आहे. अनेकांना नेहमीच असा प्रश्न पडत असतो की, जेवण केल्यावर आंघोळ करावी की नाही? घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. दैनंदिन गोष्टी करण्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. ना जेवणाची वेळ फिक्स आहे ना झोपण्याची. अर्थात याचा प्रभाव आपल्या एकंदर आरोग्यावर पडतो आहे. जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर रूटीन लाइफमध्ये संतुलन ठेवावं लागेल तेव्हा तुम्ही फिट आणि निरोगी राहू शकता. अशात जेवणानंतर आंघोळ करावी की नाही याबाबत आयुर्वेद काय सांगतं हे जाणून घेऊया...

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य?

आयुर्वेदात आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहे. वर्षानुवर्षे आयुर्वेदातील गोष्टींचा वापर करून अनेक आजारांवर उपचार केले जातात. रोजच्या गोष्टींबाबतही यात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आयुर्वेदानुसार, कोणतंही काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो. यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. 

जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

मेडिकल सायन्स काय सांगतं?

आयुर्वेदासोबत मेडिकल सायन्स याबाबत सांगतं की, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.

जेवण केल्यावर किती वेळाने करावी आंघोळ?

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ करणं नुकसानकारक ठरतं. याने अ‍ॅसिडिटी, उलटी अशा समस्या होतात. इतकंच नाही तर तुमचा लठ्ठपणाही वाढू शकतो. नियमानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याचे सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य